शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

पालकमंत्र्यांच्या घराकडे जाणाऱ्या आंदोलकांना रोखले

By admin | Updated: May 17, 2017 16:23 IST

‘अंकुश’ चे आंदोलन : कारखान्यांनी हिशोब निश्चित केल्याशिवाय ऊस दर नियामक मंडळाची बैठक नको

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १७ : अद्याप राज्यातील साखर कारखान्यांनी आपला हिशोब निश्चित केलेला नसल्याने अंतिम ऊस दर ठरविता येत नाही. पण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ऊस दर नियामक मंडळाची बैठक शनिवारी (दि. २०) होत आहे. त्यामुळे ऊस दरात कारखानदार मखलाशी करणार असल्याचा आरोप करत शिरोळ येथील ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानावर धडक मारण्याचा पर्यंत केला. पण तत्पुर्वीच राजेंद्र नगर येथील एस. एस. एस. बोर्ड नजीक ताब्यात घेतले.

कारखान्याच्या एकूण उत्पन्नापैकी ७५ टक्के (उपपदार्थ निर्मिती करणाऱ्यांकडून) शेतकऱ्यांना तर २५ टक्के व्यवस्थापनासाठी खर्च करावा, असा कायदा आहे. ७५ : २५ प्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दर किती द्यावा लागतो, याचा निर्णय ऊस दर नियामक मंडळाच्या बैठकीत निश्चित होतो. साखर कारखान्यांकडून आपला ताळेबंद निश्चित करून फार्मुल्याप्रमारे किती रक्कम शेतकऱ्यांना देय लागते, याची माहिती नियामक मंडळासमोर ठेवली जाते. पण यावर्षी अद्याप एकाही कारखान्यांचा ताळेबंद अंतिम झालेला नाही, अशी माहिती खुद्द साखर आयुक्तांनीच ‘आंदोलन अंकुश’ या संघटनेला दिली होती. त्यामुळे ऊस दर नियामक मंडळाची बैठक घेऊ नका, अशी मागणी या संघटनेने सरकारला केली होती. तरीही ही बैठक शनिवारी होत आहे.

बुधवारी ‘अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण जुना राजवाडा पोलीसांनी एस. एस. सी. बोर्ड जवळ त्यांना ताब्यात घेतले.संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, अविनाश पाटील, प्रभाकर बंडगर, सुनील सावंत, अक्षय पाटील, दत्ता मोरे, सत्यजीत सावंत आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या शिपायानेही विचारले नाही!

याच प्रश्नासाठी महिन्यापुर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात धरणे आंदोलन केले होते. दिवसभर आमचे कार्यकर्ते बसून होते, जिल्हाधिकारी सोडाच पण त्यांच्या शिपायांनेही शेतकऱ्यांना विचारले नाही. जर प्रशासनच असे बेदखल करत असेल तर दाद पालकमंत्र्यांच्या दारात जाऊन मागायची नाही तर कोठे मागायची? असा सवाल धनजी चुडमुंगे यांनी केला.

आता बैठकीच्या ठिकाणीच विरोध

आतापर्यंत शेतकऱ्यांना एफआरपी + १७५ रूपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. बाजारातील साखरेचे दर पाहता कारखाने अजून प्रतिटन ५५० ते ७५० रूपये देऊ शकतात. यासाठी शनिवारी (दि. २०) मंत्रालयात होत असलेल्या ऊस दर नियामक मंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी जाऊन विरोध करणार असल्याची माहिती चुडमुंगे यांनी दिली.