शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटी निधीचे श्रेय पालकमंत्र्यांनी घेऊ नये क्षीरसागर यांचे प्रत्युत्तर : शिवसेना नेत्यांमुळेच मिळाला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST

कोल्हापूर : काँग्रेसला जिल्हा नियोजन समितीमधून ११ कोटी आणि नगरविकास विभागाकडून १० कोटी, राष्ट्रवादीला २५ कोटी निधी दिला आहे. ...

कोल्हापूर : काँग्रेसला जिल्हा नियोजन समितीमधून ११ कोटी आणि नगरविकास विभागाकडून १० कोटी, राष्ट्रवादीला २५ कोटी निधी दिला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेसही १५ कोटींचा निधी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असून, त्याचे श्रेय पालकमंत्र्यांनी घेऊ नये. शिवसैनिकांना पदे आणि निधी मिळाल्याचे श्रेयही शिवसेना नेत्यांचेच असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी स्पष्ट केले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी नेहमीच संपर्कात असाल तर त्यांच्या माघारी शिवसेनेच्या नगरसेवकांना जेवणासाठी बोलवून त्यांच्याकडून समित्यांसाठी परस्पर नावे मागण्यामागचे कारण काय? अशी विचारणा क्षीरसागर यांनी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, यासह नगरविकासमंत्री हेदेखील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी १५ कोटींचा निधी मिळवण्यासाठी मी पाठपुरावा केला आणि निधी दिला गेला, याचे दु:ख पालकमंत्री पाटील यांना झाले. या निधीला विरोध करण्यासाठी पालकमंत्री पाटील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना का भेटले..? जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेच्या अनुसूचित जाती-जमातीच्या ११ मतदारसंघांसाठी ११ कोटींचा निधी मंजूर झाल्यावर तो निधी फक्त काँग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकारी यांना दिला गेला. यावेळी पालकमंत्री पाटील यांना महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीची आठवण का झाली नाही..?

राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी माझी व आमदार प्रकाश आबिटकर यांची कृषी संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती मुख्यमंत्र्यामुळेच झाली आहे. त्याचे श्रेय इतरांनी घेऊ नये. गोकुळमध्येही जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्तीचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनीच दिले असताना पुन्हा तांत्रिक बाबीचे कारण काढून नियुक्ती रखडत ठेवली आहे. दुजाभाव नसेल तर जाधव यांची नियुक्ती तात्काळ करावी.

दुधवडकर कसे लेखी देणार..?

शिवसेनेला डावलले असल्यास संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी लेखी द्यावे, हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. दुधवडकर हे शिवसेनेचे संपर्कप्रमुख असून ते लेखी द्यायचे असेल तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे आणि वरिष्ठ नेत्यांकडे देतील. पालकमंत्री पाटील यांनी शिवसेनेच्या आडवे येण्याची भूमिका टाळावी, असा सल्लाही क्षीरसागर यांनी दिला.