शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘जीएसटी’चा वर्षानंतरही संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:02 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला काहीशी गती मिळाली आहे. मात्र, ‘जीएसटी रिफंड’ (परतावा) वेळेत मिळत नसल्याची समस्या अद्यापही कायम आहे.‘जीएसटी’चा कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रावरील परिणामाबाबत गोकुळ शिरगाव मॅन्युुफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा) अध्यक्ष सूरजितसिंग पवार यांनी सांगितले की, ‘जीएसटी’मुळे उद्योगांवरील विविध ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला काहीशी गती मिळाली आहे. मात्र, ‘जीएसटी रिफंड’ (परतावा) वेळेत मिळत नसल्याची समस्या अद्यापही कायम आहे.‘जीएसटी’चा कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रावरील परिणामाबाबत गोकुळ शिरगाव मॅन्युुफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा) अध्यक्ष सूरजितसिंग पवार यांनी सांगितले की, ‘जीएसटी’मुळे उद्योगांवरील विविध करांचे ओझे कमी झाले आहे. त्यासह आर्थिक उलाढालीची खरी आकडेवारी समोर येत आहे. विविध उत्पादनांवर १८ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटीची आकारणी होते. उत्पादनांची किंमत स्पर्धात्मक झाली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केलेल्या कामाचे पैसे वेळेत मिळत आहेत. औद्योगिक क्षेत्राला काहीशी गती मिळाली आहे. मात्र, उत्पादकाने विकत घेतलेला कच्चा माल आणि विक्री करावयाचे उत्पादन त्यातील जीएसटी रिफंडमध्ये तफावत आहे. त्यासह हा रिफंड वेळेत मिळत नसल्याची समस्या कायम आहे. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कागल-हातकणंगलेचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे म्हणाले, उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी शासनाने जीएसटी ई-वे बिलची प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली दहा किलोमीटरच्या अंतराऐवजी ५० किलोमीटर आणि महाराष्ट्राबाहेर लागू करावी. जीएसटीचा कोल्हापूरच्या उद्योगक्षेत्रावर फारसा परिणाम झालेला नाही. ‘गोशिमा’चे माजी अध्यक्ष उदय दुधाणे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील विकासदरात वाढ झाली आहे. एकच करप्रणाली लागू झाल्याने इन्स्पेक्टर राज संपुष्टात आले आहे. पूर्वी ‘व्हॅट’ लागू असताना अनेक पुरवठादारांना सहा-सहा महिने बिल मिळत नव्हते. आता हे चित्र बदलले असून वेळेवर पैसे मिळत आहेत.निर्यातीत १५ टक्के वाढजीएसटीमुळे कोल्हापुरातील उत्पादन क्षेत्राला बूस्ट मिळाले आहे. येथील निर्यातीमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. जीएसटीचा परतावा मिळण्याच्या अडचणीबाबत महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांची मे महिन्यात भेट घेतली. त्यांनी परतावा देण्याबाबत विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यात शिबिरे घेण्यात आली आहेत. त्यातून परताव्याचा प्रश्न मार्गी लागत आहे.या क्षेत्रात समस्याऔद्योगिक क्षेत्रातील इंजिनिअरिंग,फौंड्री, आॅटो स्पेअर पार्टस, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील उत्पादक व निर्यातदारांना मोठ्या प्रमाणात कराची रक्कम सुरुवातीच्या टप्प्यात जमा करावी लागते. त्याचा परतावा वेळेवर न मिळाल्याने समस्या निर्माण होत आहेत.