शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

अनुदानित बालगृहांतील बालकांच्या अनुदानात वाढ : राज्य सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:03 IST

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : बाल न्याय कायद्यानुसार राज्यात कार्यरत असणाºया बालगृहांतील बालकांच्या साहाय्यक अनुदानाच्या रकमेत राज्य सरकारने भरीव वाढ केलेली आहे. महागाईच्या तुलनेत यापूर्वी मिळणारे अनुदान तोकडे होते. याबाबत राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. राज्यातील ७७१ संस्थांतील सुमारे २0,000 विद्यार्थ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.महाराष्ट्र राज्यातील बाल न्याय कायद्यान्वये ...

ठळक मुद्देवीस हजार विद्यार्थ्यांना फायदाराज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : बाल न्याय कायद्यानुसार राज्यात कार्यरत असणाºया बालगृहांतील बालकांच्या साहाय्यक अनुदानाच्या रकमेत राज्य सरकारने भरीव वाढ केलेली आहे. महागाईच्या तुलनेत यापूर्वी मिळणारे अनुदान तोकडे होते. याबाबत राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. राज्यातील ७७१ संस्थांतील सुमारे २0,000 विद्यार्थ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील बाल न्याय कायद्यान्वये कार्यरत असलेल्या बालगृहांतील बालकांच्या साहाय्यक अनुदान रकमेत शासनाने दि. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार भरीव वाढ केली आहे. यापूर्वी १२५० रुपये इतके प्रतिबालक प्रतिमहिना मिळणारे अनुदान आता २००० रुपये इतके करण्यात आले आहे. हे अनुदान दि. १ एप्रिल २०१७ पासून लागू केले आहे.

बाल न्याय कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील बालगृहांची निर्मिती झाली. मात्र, या बालगृहांना नियमितपणे अनुदान मिळत नव्हते. सध्या मिळणारे साहाय्यक अनुदान वाढत्या महागाईच्या तुलनेत तोकडे असल्याने या अनुदान रकमेत वाढ करण्याची आवश्यकता होती. याबाबत कोल्हापुरातील आभास फौंडेशन या बालहक्कांविषयी काम करणाºया संस्थेने पाठपुरावा केला होता.

बाल न्याय कायद्यातील (२०१५) तरतुदीनुसार काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या उद्देशाने निवासी आणि अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना बालगृह चालविण्यास शासनमान्यता देत असते.दि. १३ सप्टेंबर २०१३ नुसार अशा अनुदानित बालगृहांतील विद्यार्थ्यांसाठी ९०० आणि प्रशासकीय खर्चासाठी ३१५ रुपये असे एकूण १२१५ रुपये इतके साहाय्यक अनुदान देण्यात येत होते. हे अनुदान वाढवून देण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची नियुक्ती झाली आहे; परंतु त्यांचा निर्णय होईपर्यंत प्रतिविद्यार्थी १५०० आणि इतर खर्चासाठी ५०० असे एकूण २००० रुपयांचे अनुदान देण्याचा शासननिर्णय झाला आहे.

राज्यातील २0,000 विद्यार्थ्यांना फायदामहिला आणि बालविकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाºया एकूण ९८४ अनुदानित बालगृहांपैकी ७७१ संस्थांच्या बालगृहांतील सुमारे २0,000 विद्यार्थ्यांना या वाढीव अनुदानाचा फायदा होणार आहे. राज्यात एकूण ९८४ संस्था पात्र होत्या. मात्र. २०१५ मधील तपासणीनुसार यातील २१३ संस्थांची मान्यता रद्द केली आहे. 

राज्यातील बाल न्याय कायद्यान्वये कार्यरत असलेल्या बालगृहांतील बालकांच्या साहाय्यक अनुदान रकमेत वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे आभास फौंडेशनतर्फे आभार मानतो. शासनाचा हा निर्णय बालविकास क्षेत्रात सकारात्मक विचार आहे. शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फाउंडेशन, कोल्हापूर

 

राज्य सरकारने सरकारच्या यादीतील बालगृहांतील बालकांसाठी देण्यात येणाºया अनुदानात वाढ केल्याबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे. त्यामुळे बाहेरच्या जगातील विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक आणि इतर सुविधा या विद्यार्थ्यांना मिळतील, त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकासच होईल.- संतोष गायकवाड, अधीक्षक,श्री दिलीपसिंहराजे घाटगे बालग्राम, (अ गट) पन्हाळा