शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पन्हाळ्यात गावगुंडांची वाढती दहशत चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर युवकाला अडवून दहा-बाराजणांनी अमानुषपणे मारहाण करणारा व्हिडिओ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर युवकाला अडवून दहा-बाराजणांनी अमानुषपणे मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तालुक्यातील गावगुंडांची दहशत नजरेसमोर आली.एकट्या-दुकट्याला गाठून मारण्याचे प्रकार तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने भाईगिरी आणि गुंडगिरीचा वाढता प्रभाव चिंताजनक आहे. दिवसाढवळ्या वाढणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तीला वेळीच पोलिसी खाक्या दाखविला नाही तर तालुक्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.

तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला असला तरी गावगुंडांनी त्याला मोगलशाही बनविली आहे. दोन- चार जणांचे टोळकं करायचे आणि एखाद्या मोडक्या कुपावर पाय देऊन हाणामारीतून आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची प्रवृत्ती गावागावांत फोफावत आहे. शिक्षणाला रामराम ठोकून अर्धवट, टवाळखोर, स्वयंघोषित गावगुंड यांच्या टगेगिरीमुळे सर्वसामान्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वराती, मिरवणुका, आणि निवडणुकादरम्यान होणाऱ्या बाचाबाचीतून गावगुंडगिरीला सुरुवात होत असल्याची चर्चा आहे.

लग्नाच्या वरातीतील ढकलाढकलीच्या कारणावरून झालेल्या भांडणातील पूर्ववैमनस्याची खुन्नस म्हणून काही तरुणांंनी त्या युवकाला भररस्त्यात अडवून बेदम मारले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना गावगुंडांच्या दहशतीची माहिती मिळाली. गावागावांत तरुणाईत झालेली हमरीतुमरी गावपुढारी आपापसात मिटवत असल्यामुळे पोलिसी खाक्या मिळत नव्हता. त्यामुळे तालुक्यात गावगुंडांची दहशत बळवत आहे. कुणाची वरात आणि कुणाची भांडणे निसतरण्याची वेळ मात्र मोठ्यांवर येते. याची जरासुद्धा भनक आजच्या तरुणाईला दिसून येत नाही. या गावगुंडांना राजकीय पाठबळ असल्यामुळे कुणालाही कधीही कुठेही कसंही मारलं आमचं काहीच बिघडत नाही, या मनोवृत्तीतून गावगुंडांची दहशत वाढत आहे. या भाईगिरीला वेळीच आवर घातला नाही तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होईल.

...........

झुंडशाहीला पोलिसी खाक्याची गरज

पन्हाळा, कोडोली, कळे या तीन ठिकाणी पोलीस चौक्या आहेत, तर कोडोली, आसुर्ले-पोर्ले, कोतोली, कळे या ठिकाणी शैक्षणिक उठाव बरोबरच गर्दीची आहे. याठिकाणी शायनिंग मारण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडतो आणि त्यातून वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकट्या-दुकट्याला गाठून मारण्याचे प्रकार दोन-चार महिन्याला घडत असतात. यासाठी नेमलेली पोलिसांची भरारी पथकं काय कामाचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्टेटसवरून खुन्नस

काही तरुण नामांकित गुंडांबरोबर आपला फोटो सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करून गावात आपली दहशत माजवण्यासाठी उपयोग करत आहेत, तसेच काही टवाळखोर सशस्त्र हत्यार हातात घेऊन स्टेटसद्वारे आपल्या गुंड प्रवत्तीची झलक दाखविण्याच्या प्रकाराकडे ग्रामीण पोलिसांचा कानाडोळा असतो. त्यामुळे असे प्रकार वाढत आहेत.