शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

यड्रावच्या जलस्रोताचे भूजल परीक्षण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST

घन:शाम कुंभार यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांतून येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील भूजलातील पाणी प्रदूषित ...

घन:शाम कुंभार

यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांतून येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील भूजलातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील भूजल परीक्षणाची गरज निर्माण झाली असून भविष्यात पाणी असूनही त्याचा वापर करता येणार नाही, अशी परिस्थिती उद्भवू शकते. याकरीता प्रदूषण नियंत्रण मंडळ व भूजल सर्वेक्षण विभागाने वेळीच लक्ष घालणे अत्यावश्यक आहे.

पार्वती औद्योगिक वसाहतीमधील काही ठिकाणच्या बोअरवेलमधील पाणी हे प्रदूषित असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जलप्रदूषण गुणवत्ता अहवाल २०१९-२० मध्ये आहे. पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये मनपसंद टेक्स्टाईल, जुबिली प्रोसेस, बीडला प्रोसेस, इचलकरंजी टेक्सटाईल्स व बाहुबली प्रोसेस या उद्योगांमधून कापडावर प्रक्रिया करण्यात येते. त्यांच्या पाणी प्रक्रिया प्रकल्पातून शुद्धिकरण झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करत असल्याचा दावा संबंधितांकडून केला जातो.

प्रक्रिया झालेल्या पाण्याचा पुनर्वापर साडेचार एकर जागेत बांबू लागवडीसाठी व वसाहतीमध्ये लावलेल्या २५०० वृक्ष जतनासाठी केला जातो. औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २५० उद्योग सुरू आहेत. त्यापैकी अंदाजे १५० हून अधिक उद्योगांनी स्वत: कूपनलिका खोदल्या आहेत. कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांनी रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया करून पुनर्वापर तर कोरड्या विहिरी व बिनपाण्याच्या कुपनलिकांमध्ये सोडून सांडपाण्याची विल्हेवाटही लावण्याचे प्रयोग उद्योजकांकडून झाले आहेत तसेच या पाण्याचा वापर शेती, इतर कारणांसाठी केला गेला. या सर्व कारणांमुळे परिसरातील कुपनलिका, विहिरी प्रदूषित बनण्यास कारणीभूत ठरल्याने तेथील सांडपाण्याचे नमुने वेळोवेळी परीक्षणासाठी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिद्ध केले आहे. या उद्योगाच्या परिसरातील कुपनलिका व विहिरीतील पाण्याचे परीक्षण करून ते पाणी शेतीसाठी, व सजीवांना पिण्यासाठी योग्य आहे का, याची प्रयोगशाळेमधून सिद्धता करावी लागेल. अन्यथा पाणी आहे पण त्याचा कोणासही उपयोग नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

सांडपाण्याने परिसर दूषित

‘इचलकरंजीच्या टेक्स्टाईल’ उद्योगांमध्ये ‘ज्युबिली’ वर्षापासून कापडावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू करून ‘बाहुबली’ बनलेल्या उद्योजकांनी परिसर दूषित केला आहे.

फोटो - २१०३२०२१-जेएवाय-०२, ०३-संग्रहित छायाचित्र