शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भूजल पातळी सव्वा दोन फुटांनी घसरली

By admin | Updated: February 15, 2016 01:07 IST

कोल्हापूर जिल्ह्यात टंचाई झळा : पाच वर्षांत पहिल्यांदाच पातळी खालावली; शाहूवाडीची भूजल पातळी साडेचार फुटांनी घसरली

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भूजल पातळी झपाट्याने खालावत चालली असून कोल्हापूर जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सरासरी सव्वा दोन फुटांनी घसरली आहे. पाऊस कमी पडल्याचा सर्वाधिक फटका शाहूवाडी तालुक्याला बसला असून येथील भूजल पातळी सर्वाधिक साडेचार फुटांनी खाली गेली आहे. त्यामुळे मार्चनंतर बहुतांशी विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडण्याची भीती व्यक्त होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळला तरी कोल्हापूरला आतापर्यंत त्याची झळ कधी पोहोचली नाही. येथे मुबलक पाऊस व धरणे असल्याने पाणीटंचाई कधी जाणवलीच नाही, पण यंंदा परिस्थिती काहीशी वेगळी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १७७२ मिलीमीटर पावसाची नोंद होते. यंदा सरासरीपेक्षा ४८ टक्केच म्हणजे केवळ ८५६.९३ मिलीमीटर पाऊस झाल्याने त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाचा पारा जसा वाढत आहे, तशी जमिनीची भूक वाढू लागली आहे. जिल्ह्याची भूगर्भातील पाणी पातळी घसरली असून गेल्या पाच वर्षांत एवढ्या खाली पाणी कधी गेलेच नाही. जिल्ह्याची सरासरी सव्वा दोन फुटांनी भूजल पातळीत घटली असून सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यात साडेचार फुटांनी भूजल पातळी खाली गेली आहे. शाहूवाडी तालुक्यात दरवर्षी सरासरी १५४२ मिलीमीटर पावसाची नोंद होते, पण यंदा १०८२.९० मिलीमीटरच पाऊस झाला आहे. शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड, भुदरगड तालुक्यात जांभा खडकाचा मोठा थर आहे. परिणामी जांभा खडकाच्या पोकळीतून पाणी कमी प्रमाणात खाली उतरते, येथे प्रत्येक वर्षी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच पाण्याची पातळी स्थिर राहते. उर्वरित तालुक्यांपेक्षा शाहूवाडीची पातळी घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शाहूवाडीपाठोपाठ करवीर तालुक्यातील पाण्याच्या पातळीत अडीच फुटांनी घसरण झाली आहे. पाणीटंचाईची दाहकता लक्षात येते. प्रत्येक महिन्याला पातळीत घट होत असून मार्च-एप्रिलमध्ये विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता जात आहे. जिल्ह्यात नदीच्या पाण्यावरील सिंचनापाठोपाठ विहिरीवर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी उपसा केला जातो. मात्र, विहीरीच्या पाण्यांची पातळी खालावल्याने अनेक बागायतदारही हवालदिल झाले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठीदेखील विहिरींचाच तसेच कूपनलिकांचा आधार घेतला जातो. मात्र, कूपनलिकांचे पाणीही गायब होत असल्याने नागरिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.