शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

मंडलिक यांच्यामुळे कागलला हरितक्रांती

By admin | Updated: April 27, 2017 00:02 IST

संजय घाटगे : बेनिक्रेतील पाणी पूजन, कृतज्ञता सोहळा उत्साहात

म्हाकवे : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या आणि परिवर्तन घडविण्याची ताकद केवळ पाणी योजनेत आहे. कागलमधील इंच-इंच जमीन बागायती व्हावी हे ध्येय असणाऱ्या दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्यकर्तृत्वाचे उपकार कागलमधील जनता कधीच विसरणार नाही. बेनिक्रेतील शेतकऱ्यांची जमिनी गहाण ठेवून कर्जे घेतली असली तरी या कर्जाला थकहमी हमीदवाडा कारखान्याच्या माध्यमातून कै. मंडलिकांनी घेतल्यामुळे मंडलिकांचे फार मोठे योगदान येथील शेतकऱ्यांना मिळाले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले. बेनिक्रे (ता. कागल) येथील ज्योतिर्लिंग पाणी वापर योजना व येथील शेतकऱ्यांनी वेदगंगा नदीतून केलेल्या पाणी योजनेच्या पाणी पूजन व कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आण्णासो वाडकर होते. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, पूर्वी कागल तालुका शापित मानला जात होता. मात्र, योगायोगाने तीन नद्यांचा उष:शापही मिळाला असून, पाटगाव, काळम्मावाडी, चिकोत्रा धरणेही उशाला आहेत हे आपले भाग्य आहे. बेनिक्रेतील गावकऱ्यांनी एकसंधपणे प्रतिकूल परिस्थितीवर मात केल्यामुळे आज त्याची फलश्रुती आलीआहे. ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शिक्षण व अर्थ सभापती अंबरीश घाटगे, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता एस. एल. पाटील, कार्यकारी अभियंता बाळासाहेब घुणकीकर, बापू फेगडे, आण्णासो वाडकर, आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या शिवानी भोसले, सभापती कमल पाटील. पं. स. सदस्य विश्वास कुराडे, विजय भोसले, डी. बी. धारवाडकर, यु. एम. कापशे, बँक आॅफ इंडियाचे उदयकुमार मल्ल, उपसरपंच सरिता वसंत चौगुले, सुनील काळूगडे, सखाराम जाधव, माजी सरपंच मारुती काळूगडे, आदी उपस्थितीत होते. संस्थेचे सचिव रवींद्र वाडकर यांनी आभार मानले. अन् नेते आले एका व्यासपीठावरएक नव्हे, दोन नव्हे तब्बल ४५० शेतकऱ्यांनी ‘वज्रमूठ’ बांधून स्वबळावर सुमारे ३० फूट उंचीचा डोंगराचा अडसर पार करून वेदगंगा नदीतून पाणी योजना साकारणाऱ्या बेनिक्रे (ता. कागल) येथील ‘त्या’ शेतकऱ्यांना सलाम करण्यासाठी कागल तालुक्यातील राजकीय गट-तट विसरून नेते मंडळींसह अनेक कार्यकर्ते या योजनेच्या पाणी पूजन कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. ‘शाहू’मार्फत आता सौरपंपाला अनुदान : समरजितसिंह घाटगेबेनिक्रेतील शेतकऱ्यांचा हा पथदर्शी प्रयोग राज्याला मार्गदर्शक ठरणार आहे. पाणी योजनेच्या फलश्रुतीनंतर आता सर्वच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती, ठिबकचा वापर आणि सौर ऊर्जावर आधारित विद्युत पंप वापराकडे वळावे, किंबहुना यामुळे पैशाची बचत होऊन उत्पादनात वाढ होईल. भविष्यात या तिन्ही गोष्टीला ‘शाहू’ कारखान्यामार्फत भरीव अनुदानही देणार असल्याचे ‘शाहू’चे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केले.