शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

दूध उत्पादनात मोठी घट

By admin | Updated: April 29, 2016 00:49 IST

वीस हजार लिटर घटले : उष्माघाताने वासरे कासावीस; जनावरांचा प्रश्नही गंभीर

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --पाणीटंचाईच्या झळा केवळ पिकांना सहन कराव्या लागत नाहीत, तर त्याचा परिणाम वाड्या-वस्त्यांवरील जनावरांच्या दूध उत्पादनासह आरोग्यावर झाला आहे. सुक्या चाऱ्यामुळे शरीराला पाण्याची गरज जास्त असते, त्यात जीवघेण्या उष्म्याने तर दिवसातून चारवेळा पाणी दिले तरी ते जनावरांच्या दृष्टीने कमीच असते. वाड्या-वस्त्यांवर माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तिथे जनावरांचे काय? याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला असून जिल्ह्याच्या दूध संकलनात गत महिन्यापेक्षा सुमारे वीस हजार लिटरने घट झाली आहे. कोल्हापूर जिल्'ात शेतीला जोडधंदा म्हणून उद्यास आलेल्या दूध व्यवसायाने अलीकडील दहा वर्षांत प्रमुख व्यवसाय म्हणून मान्यता मिळविली आहे. बेभरवशाच्या शेतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दूध व्यवसायाने आधार दिला. दहा दिवसाला न चुकता दुधाचे पैसे हातात येत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यात या व्यवसायाचा खूप मोठा वाटा आहे. जिल्'ात ११ लाख ५४ हजार गाय , म्हैस वर्ग जनावरे व शेळ्या-मेंढ्या आहेत. जिल्'ात प्रामुख्याने ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘शाहू’च्या माध्यमातून सरासरी १५ लाख लिटर दूध संकलन सुरू आहे. पाणीटंचाईमुळे उसासह इतर पिके जाणार हे निश्चित आहे, त्यात दूध व्यवसायही अडचणीत आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्'ात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका गंभीर नसला तरी वाड्या-वस्त्यांवर जिथे जिवंत झऱ्यांवर पाणीपुरवठा अवलंबून आहे, तिथे प्रश्न गंभीर बनला आहे. झरे व लहान तळी आटल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात वाड्या-वस्त्यांवर सुका चाराच जनावरांसाठी आता उपलब्ध आहे. सुका चारा व पुरसे पाणी नसल्याने दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. (उत्तरार्ध)‘गोकुळ’चे गत महिन्यापेक्षा दूध कमीच‘गोकुळ’ चे गत वर्षीपेक्षा यंदा सरासरी दूध संकलन जास्तच दिसते, हे जरी खरे असले तरी यंदा संकलन वाढीसाठी संघाने विविध कार्यक्रम राबविल्याने सुरुवातीपासूनच संकलनात वाढ दिसते. गत महिन्याच्या तुलनेत पाहिले तर त्यांचे दहा हजार लिटर तर ‘वारणा’ व इतर संघाचे संकलनावर दुष्काळाचा परिणाम दिसतोच.