शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादनात मोठी घट

By admin | Updated: April 29, 2016 00:49 IST

वीस हजार लिटर घटले : उष्माघाताने वासरे कासावीस; जनावरांचा प्रश्नही गंभीर

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --पाणीटंचाईच्या झळा केवळ पिकांना सहन कराव्या लागत नाहीत, तर त्याचा परिणाम वाड्या-वस्त्यांवरील जनावरांच्या दूध उत्पादनासह आरोग्यावर झाला आहे. सुक्या चाऱ्यामुळे शरीराला पाण्याची गरज जास्त असते, त्यात जीवघेण्या उष्म्याने तर दिवसातून चारवेळा पाणी दिले तरी ते जनावरांच्या दृष्टीने कमीच असते. वाड्या-वस्त्यांवर माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तिथे जनावरांचे काय? याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला असून जिल्ह्याच्या दूध संकलनात गत महिन्यापेक्षा सुमारे वीस हजार लिटरने घट झाली आहे. कोल्हापूर जिल्'ात शेतीला जोडधंदा म्हणून उद्यास आलेल्या दूध व्यवसायाने अलीकडील दहा वर्षांत प्रमुख व्यवसाय म्हणून मान्यता मिळविली आहे. बेभरवशाच्या शेतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दूध व्यवसायाने आधार दिला. दहा दिवसाला न चुकता दुधाचे पैसे हातात येत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यात या व्यवसायाचा खूप मोठा वाटा आहे. जिल्'ात ११ लाख ५४ हजार गाय , म्हैस वर्ग जनावरे व शेळ्या-मेंढ्या आहेत. जिल्'ात प्रामुख्याने ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘शाहू’च्या माध्यमातून सरासरी १५ लाख लिटर दूध संकलन सुरू आहे. पाणीटंचाईमुळे उसासह इतर पिके जाणार हे निश्चित आहे, त्यात दूध व्यवसायही अडचणीत आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्'ात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका गंभीर नसला तरी वाड्या-वस्त्यांवर जिथे जिवंत झऱ्यांवर पाणीपुरवठा अवलंबून आहे, तिथे प्रश्न गंभीर बनला आहे. झरे व लहान तळी आटल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात वाड्या-वस्त्यांवर सुका चाराच जनावरांसाठी आता उपलब्ध आहे. सुका चारा व पुरसे पाणी नसल्याने दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. (उत्तरार्ध)‘गोकुळ’चे गत महिन्यापेक्षा दूध कमीच‘गोकुळ’ चे गत वर्षीपेक्षा यंदा सरासरी दूध संकलन जास्तच दिसते, हे जरी खरे असले तरी यंदा संकलन वाढीसाठी संघाने विविध कार्यक्रम राबविल्याने सुरुवातीपासूनच संकलनात वाढ दिसते. गत महिन्याच्या तुलनेत पाहिले तर त्यांचे दहा हजार लिटर तर ‘वारणा’ व इतर संघाचे संकलनावर दुष्काळाचा परिणाम दिसतोच.