शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३०० गावांत स्मशानभूमी हवी

By admin | Updated: July 21, 2014 00:25 IST

जिल्ह्यातील चित्र : स्मशानभूमीअभावी उघड्यावरच अंत्यसंस्कार?

मोहन सातपुते -उचगावमहाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ई-ग्रामपंचायत’ योजना सुरू केली आहे. ब्रॉडबँड कनेक्शनने ग्रामपंचायती जोडण्याची योजना आखली जात असताना ‘थ्री टायर सिस्टीम’चा कणा असलेल्या अनेक ग्रामपंचायतींच्या गावांत गाव तेथे स्मशानभूमी योजनाच राबविली जात नाही व जिल्ह्यातील तीनशे गावांत आजही स्मशानभूमीअभावी उघड्यावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या जिल्ह्यात शेतावरच्या बांधाकडेला, भाऊबंदकीच्या शेतवडीत अथवा पावसाळ्यात पूर आल्यानंतर स्मशानभूमी पाण्याखाली गेल्यानंतर रस्त्याकडेलाच अंत्यसंस्कार होत असल्याने शासनाने ‘गाव तेथे स्मशानभूमी’ योजना राबविण्याची गरज आहे.अनेक गावांना स्मशानशेड्स बांधून मिळाली; पण पत्रे वाऱ्याने उडाले आहेत. विजेची सोय नाही. रस्ता नाही. पावसाळ्यात स्मशानशेड्सना गळती लागली, तर भिंती पडक्या अवस्थेत, तर विद्युतदाहिनी चोरीला गेल्याने समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जुन्या पिढीतील लोकांनी स्मशानभूमीसाठी जागा ग्रामपंचायतीला भेट दिली; पण आजही त्या जागा गावच्या वसाहतीला लागून राहिल्याने स्मशानात मृतदेह जाळताना त्याचा उग्र वास, धुरांचे लोट यामुळे वस्तीतील लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे प्रदूषणातही भर पडत आहे. ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमी उभारणीसाठी निधी नाही.आमदार, खासदार यांना निवेदन देऊनही निधी मिळत नाही. गावाकडच्या लोकांच्या साध्या राहणीचा विचार करीत आजही मृतांवर शेतवडीत नेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. तसेच काही गावांमध्ये पाणंदी आहेत. त्या जागेकडे जाताना व मृतदेह नेताना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर पाणंदीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल व दलदल होते. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने अथवा जिल्हा नियोजन यंत्रणेकडून गाव तिथे स्मशानभूमीसाठी निधी दिला, तर गाव तेथे स्मशानभूमी ही योजना कार्यान्वित होईल. याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांनी याची मागणी करणे आवश्यक आहे. शासनाने या योजनेसाठी निधी देऊन गाव तेथे स्मशानभूमी योजना राबविण्याची आवश्यकता आहे.