शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

३०० गावांत स्मशानभूमी हवी

By admin | Updated: July 21, 2014 00:25 IST

जिल्ह्यातील चित्र : स्मशानभूमीअभावी उघड्यावरच अंत्यसंस्कार?

मोहन सातपुते -उचगावमहाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ई-ग्रामपंचायत’ योजना सुरू केली आहे. ब्रॉडबँड कनेक्शनने ग्रामपंचायती जोडण्याची योजना आखली जात असताना ‘थ्री टायर सिस्टीम’चा कणा असलेल्या अनेक ग्रामपंचायतींच्या गावांत गाव तेथे स्मशानभूमी योजनाच राबविली जात नाही व जिल्ह्यातील तीनशे गावांत आजही स्मशानभूमीअभावी उघड्यावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या जिल्ह्यात शेतावरच्या बांधाकडेला, भाऊबंदकीच्या शेतवडीत अथवा पावसाळ्यात पूर आल्यानंतर स्मशानभूमी पाण्याखाली गेल्यानंतर रस्त्याकडेलाच अंत्यसंस्कार होत असल्याने शासनाने ‘गाव तेथे स्मशानभूमी’ योजना राबविण्याची गरज आहे.अनेक गावांना स्मशानशेड्स बांधून मिळाली; पण पत्रे वाऱ्याने उडाले आहेत. विजेची सोय नाही. रस्ता नाही. पावसाळ्यात स्मशानशेड्सना गळती लागली, तर भिंती पडक्या अवस्थेत, तर विद्युतदाहिनी चोरीला गेल्याने समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जुन्या पिढीतील लोकांनी स्मशानभूमीसाठी जागा ग्रामपंचायतीला भेट दिली; पण आजही त्या जागा गावच्या वसाहतीला लागून राहिल्याने स्मशानात मृतदेह जाळताना त्याचा उग्र वास, धुरांचे लोट यामुळे वस्तीतील लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे प्रदूषणातही भर पडत आहे. ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमी उभारणीसाठी निधी नाही.आमदार, खासदार यांना निवेदन देऊनही निधी मिळत नाही. गावाकडच्या लोकांच्या साध्या राहणीचा विचार करीत आजही मृतांवर शेतवडीत नेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. तसेच काही गावांमध्ये पाणंदी आहेत. त्या जागेकडे जाताना व मृतदेह नेताना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर पाणंदीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल व दलदल होते. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने अथवा जिल्हा नियोजन यंत्रणेकडून गाव तिथे स्मशानभूमीसाठी निधी दिला, तर गाव तेथे स्मशानभूमी ही योजना कार्यान्वित होईल. याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांनी याची मागणी करणे आवश्यक आहे. शासनाने या योजनेसाठी निधी देऊन गाव तेथे स्मशानभूमी योजना राबविण्याची आवश्यकता आहे.