शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांच्या खात्यावर १५०० रुपयांचे अनुदान जमा : दिलेला शब्द सरकारने पाळल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांच्या लॉकडाऊन काळात उपजीविकेकरिता जाहीर झालेले दीड हजार रुपयांचे अनुदान शुक्रवारी शहरातील ७६०० फेरीवाल्यांच्या बँक ...

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांच्या लॉकडाऊन काळात उपजीविकेकरिता जाहीर झालेले दीड हजार रुपयांचे अनुदान शुक्रवारी शहरातील ७६०० फेरीवाल्यांच्या बँक खात्यात जमा झाले. सुमारे एक कोटी १४ लाखांचे अनुदान संबंधित फेरीवाल्यांच्या खात्यावर परस्पर जमा केल्याची माहिती नगरविकास विभागाच्या नगरपालिका संचालनालयामार्फत कोल्हापूर महापालिका प्रशासनास कळविली आहे.

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तळागाळातील लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून रस्त्यावरील फेरीवाल्यांना पंधरा दिवसांसाठी १५०० रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. सध्याच्या महागाईच्या काळात १५०० रुपयांचे अनुदान अतिशय कमी असून, किमान पाच हजार रुपये तरी दिले पाहिजेत, अशी मागणी होती. मात्र, ठाकरे सरकारने दिलेला शब्द पाळला आणि शुक्रवारी फेरीवाल्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा केले.

नागरी उपजीविका अभियान या पीएम स्वनिधीअंतर्गत पथविक्रेत्यांना बँकांमार्फत गेल्या वर्षी कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने आणली होती. त्यासाठी कोल्हापूर शहरातून ७६०० पदपथ विक्रेत्यांनी मागणी केली होती. त्यातील ४४७८ लोकांना कर्ज मिळाले; परंतु राज्य सरकारने कर्ज घेतलेल्यांसह ज्यांनी ज्यांनी मागणी केली होती, त्यांनाही अनुदानाची रक्कम दिली आहे.

- पॉइंटर -

- शहरातील फेरीवाल्यांची संख्या - अंदाजे ११ हजार

- नोंदणी झालेल्या फेरीवाल्यांची संख्या - ५६०७

- गतवर्षी लॉकडाऊनमध्ये कर्ज घेतलेले फेरीवाले - ४४७८

- १५०० रुपये अनुदान जमा झालेले फेरीवाले - ७६००

- कर्जाची मागणी केली, पण मिळाले नाही असे फेरीवालेही अनुदानास पात्र

- प्रतिक्रिया - १

राज्य सरकारने शहरातील फेरीवाल्यांच्या खात्यावर १५०० रुपयांचे अनुदान जमा केले. काही फेरीवाल्यांचे आयएफसी कोड चुकले असल्याने त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. सोमवारी दुरुस्ती करून तेही जमा केले जाईल.

शिल्पा दरेकर, उपायुक्त

कोल्हापूर महानगरपालिका

प्रतिक्रिया - २

पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनकरिता फेरीवाल्यांना १५०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. मदत थोडी असली तरी खात्यावर जमा झाली, हे महत्त्वाचे आहे.

मोहन क्षत्रिय, फेरीवाला

-चौकट -

बँकांचा असाही आगाऊपणा-

सरकारकडून जमा झालेले १५०० रुपयांचे अनुदान काही बँकांनी कोरोनाकाळात दिलेल्या कर्ज खात्यात वळते केले आहेत. वास्तविक उपजीविकेसाठी हे अनुदान दिलेले असताना ते कर्जाला वळविणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया काही फेरीवाल्यांनी दिली.

-