शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

चाळीस लाखांचे अनुदान रोखले

By admin | Updated: December 26, 2014 00:14 IST

खत घोटाळा प्रकरण : अधिकाऱ्यांकडून खताच्या वितरणाची चौकशी सुरू

सांगली : जिल्ह्यात मागील पाच वर्षात सहा हजार १८५ टन सुपर फॉस्फेट खताचा पुरवठा केला असून, या खताचे ८० टक्के अनुदान शासनाकडून थेट कंपनीला वर्ग केले आहे. जिल्हास्तरावर खत पोहोचल्यानंतर चौकशी झाल्यानंतर देण्यात येणारे २० टक्के अनुदान संबंधित कंपनीला दिले नाही. हे चाळीस लाखांचे अनुदान जिल्हा परिषद कृषी विभागाने रोखून ठेवले आहे.शेतकऱ्यांना कमी किमतीत खताचा पुरवठा करण्यासाठी शासन खत कंपन्यांना अनुदान देत आहे. परंतु, खत कंपन्या खत उत्पादनाची चुकीची आकडेवारी शासनाला दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान हडप करत आहेत. मुंबई येथील खत कंपनीने जिल्ह्याला पाच महिन्यात सहा हजार १८५ टन सुपर फॉस्फेट खताचा पुरवठा केला आहे. या कंपनीला ८० टक्के शासनाकडून अनुदान मिळाले आहे. उर्वरित २० टक्के अनुदान खताचा सुरळीत पुरवठा झाल्याची खात्री करूनच अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर कंपनीला मिळते. त्यानुसार संबंधित खत कंपनीच्या पुरवठ्याची माहिती गोळा केली जात आहे. सहा मुख्य खत वितरकांबरोबरच आठ विक्रेत्यांकडून खत विक्रीचे सर्व दफ्तर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. याचबरोबरच पंधरा हजार शेतकऱ्यांची चौकशी केली असून त्यांच्याकडून खत मिळाल्याची शहानिशा केली जात आहे. यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे कंपनीचे चाळीस लाखांचे अनुदान अधिकाऱ्यांनी रोखले आहे. या प्रकारामुळे खत कंपन्यांची गोची झाली आहे.दरम्यान, अधिकाऱ्यांनी मुंबईच्या कंपनीच्या खताची चौकशी सुरु केली आहे. याचपध्दतीने अन्य खत कंपन्यांच्या पुरवठ्याचीही चौकशी करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)दहा लाखांचे गौडबंगाल काय?मुंबई येथील या कंपनीच्या अधिकाऱ्याचे एक अधिकारी दहा लाख रुपये देणे आहे. या दहा लाखांची मागणी केल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी कंपनीचे खत अनुदान रोखण्याची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. याबद्दलची जिल्हा परिषदेमध्ये दबत्या आवाजात चर्चा चालू आहे. यामुळे हे दहा लाख कुणाचे आणि अधिकारी ते का देत नाही? या दहा लाखांचे गौडबंगाल काय? असा प्रश्न विचारला जात आहे.खत कंपनी बोगस पुरवठा दाखवून अनुदान लाटत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यास विलंब का होत आहे?, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांतून उपस्थित केला जात आहे.