शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बेघर नातवांसाठी आजीची कष्टाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:44 IST

मोहन सातपुते उचगाव : खाऊचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या लेकीचा अपघातात बळी गेला अन् तिच्या चिमुकल्या तीन मुलांच्या ...

मोहन सातपुते

उचगाव : खाऊचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या लेकीचा अपघातात बळी गेला अन् तिच्या चिमुकल्या तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आजीवर पडली. या खमक्या आजीने रक्ताच्या नात्यांना मायेचा आधार दिला खरा; पण वयोमान आणि परिस्थितीने तिच्याही मायेला पोरकेपणा आणला आहे. त्यामुळे आईविना आजीच्या कुशीत वाढणाऱ्या या चिमुकल्यांना आता दानशूरांच्या दातृत्वाची गरज निर्माण झाली आहे. उजळाईवाडीतील मालूबाई भुजाजी सानप या आजीने आता पोरक्या नातवांना दानशूरांनी आधार द्यावा, अशी साद घातली आहे. मालूबाई यांची एकुलती एक मुलगी उषा. तिची दोन लग्ने झाली होती. मात्र, दोन्ही नवऱ्यांनी सोडल्यामुळे उषा आपल्या आईसह गोकुळ शिरगाव येथे नाष्ट्याचा गाडा सुरू करून उदरनिर्वाह करत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी अपघातात उषाचे निधन झाल्याने तिची तिन्ही मुले विजय मोहन पुजारी (वय-१२), दुर्वा विवेक राणे (वय-६), प्रेम विवेक राणे (वय-९) ही उघड्यावर आली. लेकीच्या माघारी मालूबाईने तिन्ही नातवांना सांभाळण्यासाठी कंबर कसली. सध्या ती उजळाईवाडीत भाड्याच्या घरात राहत आहे. मात्र, परिस्थितीने ती हतबल आहे. लेकीच्या कष्टावर कुटुंब चालायचे. मात्र, तिच्या माघारी परवड होत असल्याने नातवांना कुणी तरी आधार द्यावा यासाठी मालूबाई डोळे लावून बसली आहे.

कोट : मी आता परिस्थितीपुढे हात टेकले आहेत. कोणाचाही आधार नाही. मी वृद्ध, या तीन पोरांचा सांभाळ कसा करणार. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था यांनी मदतीचा हात देऊन तीन मुलांना आधार द्यावा.

- मालुबाई सानप, आजी

मालूबाई लढली... पण नियतीने हरविले

लेक लहान असतानाच मालूबाईच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मालूबाईने रामानंदनगर, पाचगाव, शिरगाव, उचगाव येथे कांदा- बटाटे विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय बंद करून गडमुडशिंगीत नाष्टा गाडा सुरू केला. तिथे जम बसला नाही म्हणून मालूबाईने लेकीच्या साथीने गोकूळ शिरगावात गाडा लावला. मात्र, गांधीनगरला साहित्य आणायला जात असताना लेक उषाचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करणाऱ्या मालूबाईला नियतीने हरविले.

फोटो : उचगाव मालूबाई

ओळ: वृद्ध मालूबाई भुजाजी सानप यांच्यावर तीन मुलांची जबाबदारी आली आहे. निरागसपणे आपल्या आजीला बिलगून राहिलेली मुले.