शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

दादा, ‘उत्तर’पेक्षा,‘पदवीधर’चे बघा

By admin | Updated: October 12, 2015 00:26 IST

राजेश क्षीरसागर यांचा पलटवार : चिन्ह नसलेल्यांशी आघाडीची ‘भाजप’वर वेळ

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘उत्तर विधानसभा मतदारसंघ’ टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची पहिल्यांदा जास्त काळजी करावी. कारण गेल्या निवडणुकीत निवडून येताना ते घामाघूम झाले होते. आणि विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनाही त्यांच्या विरोधात उतरणार आहे. त्यामुळे दादांनी आपल्या आमदारकीचे बघावे, असा पलटवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. चिन्ह नसलेल्या आघाडीशी युती करण्याची केविलवाणी वेळ भाजपवर आल्याची टीका करीत शिवसेना स्वाभिमानाने सर्वच्या सर्व ८१ जागा लढवीत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढण्याचे टार्गेट नाही; पण ‘उत्तर’ टार्गेट असल्याची टीका मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना आमदार क्षीरसागर म्हणाले, भाजप थेट विरोधात असताना आपल्या मताधिक्यात पाचपटींनी वाढ झाली. याउलट गतनिवडणुकीत चंद्रकांतदादा मात्र अवघ्या २३०० मतांनी कसेबसे विजयी झाले. मागील सहा विधानसभा निवडणुकांपैकी पाचवेळा कोल्हापूरची जनता शिवसेनेच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे दादांचे ‘उत्तर’ जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील.’ शिवसेनेने पत्रकबाजी केल्याने महापालिकेसाठी युती केली नसल्याचा आरोप मंत्री पाटील करीत आहेत; पण वस्तुस्थिती तशी नाही. भाजपने ‘प्रिप्लॅनिंग’ करून युती तोडली आहे. ती तोडायची होती म्हणूनच त्यांनी कोल्हापुरात पक्षाचे अधिवेशन घेतले? त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ‘ताकद’ दाखविण्याची भाषा वापरली. सुरुवात त्यांनी केल्याने आम्ही ‘भगव्या सप्ताहा’ने त्यास उत्तर दिले. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची खरी जागा दाखवेल, असा इशाराही आमदार क्षीरसागर यांनी दिला. शिवसेनेतील काही चौकडी निष्ठावंत असल्याचे सांगत पक्षाला बदनाम करीत आहे; पण उमेदवारी देताना पक्षनिष्ठा पाहूनच उमेदवारी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.