शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आजऱ्यात महाआघाडीची विजयी मिरवणूक

By admin | Updated: May 26, 2016 00:40 IST

तालुक्यातील तरूणाईचा झिंगाट जल्लोष

 आजरा : आजरा साखर कारखाना निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा निकाल लागल्याने जल्लोष न करू शकलेल्या स्व. वसंतराव देसाई महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांची आजरा शहरातून सवाद्य जंगी मिरवणूक काढली. यावेळी तालुक्यातील तरुणाईने ‘झिंगाट’ होऊन जल्लोष केला.विजयी उमेदवार व आघाडीचे नेते अशोकअण्णा चराटी, विष्णुपंत केसरकर, रवींद्र आपटे, राजेंद्र गड्यान्नावर, श्रीपतराव देसाई, अंकुश पाटील, रमेश रेडेकर, सदानंद व्हनबट्टे, बाबूराव कुंभार, तानाजी देसाई, आबुताहेर तकिलदार यांच्यासह सर्व उमेदवारांची उघड्या जीपमधून मिरवणुकीस व्यंकटराव हायस्कूल येथून सुरुवात झाली.मिरवणुकीत आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, राजू पोतनीस, विकास बागडी, मुकुंदराव तानवडे, संदीप कांबळे, अरुण देसाई, नामदेव नार्वेकर, शामराव बोलके, डॉ. दीपक सातोस्कर, विजयकुमार पाटील, विलास नाईक, निवृत्ती कांबळे, सरपंच शीला सावंत, अजित चराटी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीतनंतर बोलताना बाबूराव कुंभार म्हणाले, आजरा कारखाना गिळंकृत करण्याचा डाव सभासदांनी उधळून लावला आहे. यापुढे सभासदांच्या हिताचेच निर्णय होतील. राजू गड्यान्नावर म्हणाले, आमदार मुश्रीफांसह सहकाराचे वाटोळे करणाऱ्या मंडळींना सभासदांनी दिलेली ही सणसणीत चपराक आहे. विष्णुपंत केसरकर म्हणाले, कोणतीही मोठी शक्ती सोबत नसताना केवळ सभासदांच्या विश्वासावर कारखाना जिंकला असून, त्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ दिला जाणार नाही.अशोकअण्णा चराटी म्हणाले, आम्ही स्थानिक मंडळी कारखाना चालविण्यास सक्षम आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी आता आपापल्या संस्था सांभाळाव्यात.‘गोकुळ’चे संचालक व आघाडीचे नेते रवींद्र आपटे यांनी कारखाना सभासदांच्या हिताचेच निर्णय होतील. सभासदांच्या हिताला कदापिही बाधा पोहोचू देणार नाही, असे सांगितले. यावेळी अबुताहेर तकिलदार, निवृत्ती कांबळे, तानाजी देसाई यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)आजरा साखर कारखाना निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर स्व. वसंतराव देसाई विकास आघाडीतर्फे बुधवारी विजयी मिरवणूक काढण्यात आली