शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गावातील दारू धंदे रोखणार ‘ग्रामरक्षक दल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागात अगर पोलीस ठाण्यापासून दूर अंतरावर सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामीण भागात अगर पोलीस ठाण्यापासून दूर अंतरावर सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी आता जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ग्रामरक्षक दला’ची स्थापना करण्यात येणार आहे. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने हा नवा उपक्रम हाती घेण्यात येत असून त्यासाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाऊल उचलले आहे. ग्रामीण पातळीवर गावठी हातभट्टी दारूचे अड्डे काही नेत्यांचा अश्रयाने सुरू असल्याचे आढळले आहे. त्याला चाप बसविण्याचा प्रयत्न आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी वाड्या-वस्त्यांमध्ये गावठी दारू बनविण्याच्या हातभट्ट्या राजरोसपणे पेटलेल्या आहेत. त्या रोखणे पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे आवाक्याबाहेर आहे. या हातभट्ट्या जेसीबी मशीनद्वारे पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या तरीही पुढील दोन-तीन दिवसांत पुन्हा याच गावठी दारूच्या हातभट्ट्या पुन्हा पेटलेल्या असतात. त्यामुळे कितीही कारवाई केली तरीही पुन्हा या हातभट्ट्या गाळण्याचा व्यवसाय सुरूच असतो. त्या दारू धंदेवाल्यांची परिसरात दहशत प्रचंड असते. त्यामुळे त्यांच्याविरोेधात सर्वसामान्य तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत.

जिल्ह्यातील अपुरे पोलीस संख्याबळ पाहता हातभट्ट्यावर वारंवार जाऊन कारवाई करणे पोलीस दलास शक्य नाही. या दारू धंदेवाल्यांना चाप बसविण्यासाठी पोलीस दलातर्फे जिल्ह्यात प्रत्येक गावस्तरावर ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येत आहे. २०१७ मध्ये शासनाने कायदा करून अशा पद्धतीने ग्रामरक्षक समितींना अधिकार दिले आहेत. त्याचा आधार घेत आता गावपातळीवर चांगली वर्तणूक असणाऱ्या आठ-दहा लाेकांची समिती करून त्या समितीद्वारे हातभट्टी अगर अवैद्य दारू व्यवसायाला आळा घालण्याचा पोलीस दलाचा प्रयत्न आहे. पोलीस दलाच्या वतीने पुढील तीन महिन्यांचा कारवाईचा आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

चोवीस तासांत कारवाई

गाव पातळीवर नेमल्या जाणाऱ्या ‘ग्रामरक्षक दल’च्या समितीने पोलीस ठाण्याकडे संबंधित हातभट्टी अगर अवैध दारू व्यावसायिकांविरोधात तक्रारी करायची आहे, अगर त्यांनी माहिती कळवायची आहे. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत हद्दीतील पोलीस ठाण्यामार्फत तेथे छापा टाकून कारवाई करण्यात येणार आहे.

कोट...

पोलीस कर्मचारी संख्या अपुरी असल्याने वारंवार हातभट्ट्या उद्ध्वस्त करताना अगर कारवाई करताना मर्यादा येतात. त्यामुळे गावपातळीवरच ग्रामरक्षक दल स्थापन करून त्यांना काही प्रमाणात कारवाईचे अधिकार देण्यात येतील. त्याबाबतचा नियोजित आराखडा अंतिम टप्प्यात आहे.

- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा