शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायतींचे धुमशान--राजकीय मोर्चेबांधणी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:54 IST

राधानगरी : राधानगरी तालुक्यात ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीची राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे.

ठळक मुद्देथेट सरपंच निवडणुकीमुळे समीकरणे बदलणारउमेदवारांना अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे अगोदर आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

संजय पारकर । -लोकमत न्यूज नेटवर्कराधानगरी : राधानगरी तालुक्यात ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीची राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. सरपंचपदासाठी प्रथमच थेट निवडणूक होणार असल्याने मोठी उत्सुकता असून बरीच समीकरणे बदलणार आहेत. निवडणूक आयोगाकडून यावेळी निवडणूक पद्धतीत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. त्याला सामोरे जाताना इच्छुकांची तारांबळ उडणार आहे. निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया होणार असल्याने यातच उमेदवारांची अर्धी शक्ती खर्च होणार आहे.

तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी याबाबतची माहिती देण्यासाठी नुकतीच कार्यकर्ते व ई-सेवा देणाºया केंद्र चालकांची कार्यशाळा घेतली. यावेळी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीची पारंपरिक पद्धत पूर्णपणे बदलल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे अगोदर आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यात मालमत्ता विवरणपत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे व अपत्याबाबतचे प्रतिज्ञापत्र भरावे लागणार आहे. या अर्जाची छापील प्रत काढून त्यावर आवश्यक तेथे सह्या, सोबत ग्रामपंचायतीची बाकी नसल्याचे, ठेकेदार नसल्याचे व शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.

निवडणुकीसाठी मर्यादा घालून दिलेला खर्च बँकेतूनच करावा लागणार असल्याने राष्ट्रीयीकृत किंवा जिल्हा बँकेत नव्याने सुरु केलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची प्रत जोडावी लागणार आहे. सोबत २१ वर्षे पूर्ण असलेला वयाचा पुरावा, अनामत रकमेची पावती, सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीने किमान सातवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा जोडावा लागणार आहे. राखीव जागेवर निवडणूक लढविणाºयांनी जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. ते नसल्यास जिल्हा पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याची पोहोच व ते सहा महिन्यात दाखल करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

आँनलाईन अर्ज ई-सेवा केंद्रात २४ तास केव्हाही भरता येईल मात्र त्याची प्रत व वरील सर्व कागदपत्रे मुदतीत दुपारी साडेचार पर्यंत निवडणूक अधिकाºयाकडे जमा करावी लागणार आहेत.खर्चाचा तपशील दररोज द्यावा लागणारमागीलवेळी जात वैधता प्रस्ताव तहसील कार्यालयात स्वीकारून पोहोच दिली होती. मात्र आता फक्त अर्ज भरणार असल्याचे शिफारसपत्र दिले जाईल. उमेदवारांना परस्पर जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल करून पोहोच घेण्यासाठी या कार्यालयात जावे लागणार आहे. मागील वेळी शेवटच्या दोन दिवसांत आँनलाईन अर्ज दाखल करण्यात अडचणी आल्याने हस्तलिखित अर्ज घेतले होते. यावेळी मात्र असे होणार नाही. होणाºया खर्चाचा तपशील रोजच्या रोज द्यावा लागणार आहे.