शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

ग्रामपंचायत निवडणुका मुदतीतच

By admin | Updated: June 28, 2015 23:18 IST

जे. एस. सहारिया : पुढे ढकलणे अशक्य; जिथे शक्य आहे, तिथे तारखांत बदल

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीचा विचार केला होता; पण काही जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे नवीन सदस्य मंडळ मुदतीत अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने तारखांमध्ये बदल करता आला नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, जिथे शक्य आहे, तिथे ४ आॅगस्टनंतर मतदान ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात २५ जुलैला ११ जिल्ह्यांतील १७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, तर ६३२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ आॅगस्टला २३ जिल्ह्यात ७०१९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असून, १२१२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ५७ ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. ही निवडणूक ऐन आषाढी वारीमध्येच येत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही वारीतील मुख्य वाखरी येथील रिंगण सोहळ्यादिवशीच ठेवले आहे. राज्यातून लाखो भाविक वारीसाठी तीन आठवडे पंढरपूरच्या मार्गावर असतात. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होणार असल्याने मतदानाची तारीख २५ ऐवजी २९ जुलै करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी निवडणूक कार्यालयाकडे केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय आहे, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीबाबत विचारविनिमय झाला; पण मुदत संपण्यापूर्वी नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात येणे बंधनकारक असल्याने तत्पूर्वीच निवडणुका घेणे गरजेचे होते. त्यामुळे जिथे शक्य होते, त्या ठिकाणी ४ आॅगस्टला मतदान ठेवले असल्याचे जे. एस. सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दृष्टिक्षेपात ग्रामपंचायत निवडणुकापहिला टप्पा : २५ जुलैला मतदानजिल्ह्यांची संख्यासार्वत्रिक निवडणुकापोटनिवडणुका होत लागलेल्या ग्रामपंचायतीअसलेल्या ग्रामपंचायती११ १७७९ ६३२दुसरा टप्पा : ४ आॅगस्टला मतदान२३ ७०१९ १२१२