शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुका मुदतीतच

By admin | Updated: June 28, 2015 23:18 IST

जे. एस. सहारिया : पुढे ढकलणे अशक्य; जिथे शक्य आहे, तिथे तारखांत बदल

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीचा विचार केला होता; पण काही जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे नवीन सदस्य मंडळ मुदतीत अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने तारखांमध्ये बदल करता आला नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, जिथे शक्य आहे, तिथे ४ आॅगस्टनंतर मतदान ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात २५ जुलैला ११ जिल्ह्यांतील १७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, तर ६३२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ आॅगस्टला २३ जिल्ह्यात ७०१९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असून, १२१२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ५७ ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. ही निवडणूक ऐन आषाढी वारीमध्येच येत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही वारीतील मुख्य वाखरी येथील रिंगण सोहळ्यादिवशीच ठेवले आहे. राज्यातून लाखो भाविक वारीसाठी तीन आठवडे पंढरपूरच्या मार्गावर असतात. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होणार असल्याने मतदानाची तारीख २५ ऐवजी २९ जुलै करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी निवडणूक कार्यालयाकडे केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय आहे, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीबाबत विचारविनिमय झाला; पण मुदत संपण्यापूर्वी नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात येणे बंधनकारक असल्याने तत्पूर्वीच निवडणुका घेणे गरजेचे होते. त्यामुळे जिथे शक्य होते, त्या ठिकाणी ४ आॅगस्टला मतदान ठेवले असल्याचे जे. एस. सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दृष्टिक्षेपात ग्रामपंचायत निवडणुकापहिला टप्पा : २५ जुलैला मतदानजिल्ह्यांची संख्यासार्वत्रिक निवडणुकापोटनिवडणुका होत लागलेल्या ग्रामपंचायतीअसलेल्या ग्रामपंचायती११ १७७९ ६३२दुसरा टप्पा : ४ आॅगस्टला मतदान२३ ७०१९ १२१२