शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

ग्रामपंचायत निवडणुका मुदतीतच

By admin | Updated: June 28, 2015 23:18 IST

जे. एस. सहारिया : पुढे ढकलणे अशक्य; जिथे शक्य आहे, तिथे तारखांत बदल

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीचा विचार केला होता; पण काही जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे नवीन सदस्य मंडळ मुदतीत अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने तारखांमध्ये बदल करता आला नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, जिथे शक्य आहे, तिथे ४ आॅगस्टनंतर मतदान ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात २५ जुलैला ११ जिल्ह्यांतील १७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, तर ६३२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ आॅगस्टला २३ जिल्ह्यात ७०१९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असून, १२१२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ५७ ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. ही निवडणूक ऐन आषाढी वारीमध्येच येत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही वारीतील मुख्य वाखरी येथील रिंगण सोहळ्यादिवशीच ठेवले आहे. राज्यातून लाखो भाविक वारीसाठी तीन आठवडे पंढरपूरच्या मार्गावर असतात. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होणार असल्याने मतदानाची तारीख २५ ऐवजी २९ जुलै करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी निवडणूक कार्यालयाकडे केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय आहे, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीबाबत विचारविनिमय झाला; पण मुदत संपण्यापूर्वी नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात येणे बंधनकारक असल्याने तत्पूर्वीच निवडणुका घेणे गरजेचे होते. त्यामुळे जिथे शक्य होते, त्या ठिकाणी ४ आॅगस्टला मतदान ठेवले असल्याचे जे. एस. सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दृष्टिक्षेपात ग्रामपंचायत निवडणुकापहिला टप्पा : २५ जुलैला मतदानजिल्ह्यांची संख्यासार्वत्रिक निवडणुकापोटनिवडणुका होत लागलेल्या ग्रामपंचायतीअसलेल्या ग्रामपंचायती११ १७७९ ६३२दुसरा टप्पा : ४ आॅगस्टला मतदान२३ ७०१९ १२१२