शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायती होणार ‘मालामाल’

By admin | Updated: December 25, 2015 00:22 IST

चौदावा वित्त आयोग : दुसरा हप्ताही अदा; जिल्ह्यासाठी ६७ कोटी, सोमवारपासून वितरण

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे १४ व्या वित्त आयोगातून दुसऱ्या टप्प्यांतील निधी जिल्हा परिषदेकडे ३३ कोटी ४१ लाख ७५ हजार रुपये जमा झाला आहे. इतकाच निधी पहिल्या टप्प्यातही मिळाला आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ६६ कोटी ८३ लाख १४ हजार रुपये जमा झाले आहेत. आलेल्या एकूण अनुदानाचा निधी सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ९० टक्के आणि क्षेत्रफळ दहा टक्के या निकषांनुसार संबंधित ग्रामपंचायतींच्या थेट खात्यावर सोमवारनंतर जमा करण्यात येणार आहे. परिणामी ग्रामपंचायती ‘मालामाल’ होणार आहेत. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतींना अनुदान दिले जाते. तेरावा संपल्यामुळे १ एप्रिल २०१५ पासून चौदाव्या वित्त आयोगास प्रारंभ झाला. पाच वर्षे म्हणजे ३१ मार्च २०२० पर्यंत चौदाव्या आयोगातून टप्प्या-टप्प्यांतून अनुदान मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदान १६ जुलै २०१५ रोजी येथील जिल्हा परिषदेकडे ३३ कोटी ४१ लाख ७५ हजार रुपये शासनाकडून आला.निधीच्या विनियोगाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे, वितरित निधीमधून घ्यावयाची कामे याबाबत शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना नसल्याने ग्रामपंचायत स्तरावर निधीचे वितरण थांबले. परिणामी शासनाकडून उपलब्ध निधी सहा महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या स्तरावरच पडून राहिला. शासनाकडून खर्चासंबंधीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. रितसर २१ डिसेंबरला जिल्हा परिषद प्रशासनास निधी खर्च करण्यासंबंधी सविस्तर सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आठवड्यापूर्वी आलेला दुसरा आणि सहा महिन्यांपूर्वी आलेला पहिला हप्ता असा एकूण निधी संबंधित ग्रामपंचायत खात्यावर व्याजासह जमा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा स्रोतांचा विकास, वीजबिल, हातपंपाची दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन करणे, सार्वजनिक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविणे, शोषखड्डे मारणे, ग्रामपंचायत भवन व अंगणवाडी इमारत बांधणे, ग्रामपंचायतीमध्ये आवश्यक असल्यास फर्निचर घेणे, सार्वजनिक रस्त्यांवर दिवे लावण्याची व्यवस्था करणे, एलईडी, सोलर दिव्यांच्या वापर करणे, वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे, ग्रामपंचायत अखत्यारित असलेल्या विविध मालमत्तांची देखभाल-दुरुस्ती करणे ही कामे या निधीतून करायची आहेत. गावसभेचा ठराव घेऊन प्राधान्यक्रमाने ही कामे करावी लागणार आहेत. निधीचा खर्च ठेवणे, कामांचा तपशील ठेवून ग्रामसेवकास प्रिया सॉफ्टवेटरमध्ये भरावे लागणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून निधी खर्च केल्यास ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येणार आहे.+चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन सूचना २१ डिसेंबरला आल्या आहेत. सोमवारनंतर ग्रामपंचायतींच्या खात्यावर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांतील निधीचा वाटा जमा करण्यात येईल. ग्रामस्तरावर शासनाच्या निकषांनुसार विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. नव्या वर्षात प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होईल. - एम. एस. घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)