शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धान्य दोन रुपयांचे; दळप खर्च पाच रुपये

By admin | Updated: May 20, 2015 00:12 IST

गरीब तसेच उपेक्षित घटकांतील लोकांना धान्यापेक्षा दळपाचा जादा दर न परवडणारा आहे.

गगनबावडा : अन्नसुरक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या धान्याचा दर एक ते दोन रुपये प्रती किलो, तर धान्य दळपाचा दर मात्र पाच ते दहा रुपये किलो, अशी विपरीत परिस्थिती या योजनेच्या लाभार्थ्यांवर येत आहे. ज्या उद्दात हेतूने ही योजना राबविण्यात येत आहे, तो उद्दात हेतूच मागे पडत असल्याचे लाभार्थ्यांचे मत आहे.सरकारने समाजातील उपेक्षित घटक, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी अनेक योजना यापूर्वीही राबविल्या आहेत. याशिवाय सध्या सुरू असलेली अन्नसुरक्षा अभियानासारखी महत्त्वाकांक्षी योजना राबत असून, या योजनेंतर्गत प्राप्त होणारे अन्नधान्य एकदम स्वस्त मिळत आहे. मात्र, दळण्याचा खर्च चौपट ते पाचपट असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी आहे.गरीब तसेच उपेक्षित घटकांतील लोकांना धान्यापेक्षा दळपाचा जादा दर न परवडणारा आहे. यासाठी शासनाने काहीतरी पर्याय शोधणे तसेच तोडगा काढणे गरजेचे आहे. इंधनाचे वाढलेले दर, विजेचे औद्योगिक क्षेत्रासाठी वाढलेले दर पाहता दळपकांडप गिरणी मालक सध्या ज्या दरात दळप कांडप करतात, त्यापेक्षा कमी दरात दळप कांडप करू शकतील ही अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. यासाठी लाभार्थ्यांना शासनाने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केल्यास हा प्रश्न निकालात निघेल. (प्रतिनिधी)