शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

धान्य दोन रुपयांचे; दळप खर्च पाच रुपये

By admin | Updated: May 20, 2015 00:12 IST

गरीब तसेच उपेक्षित घटकांतील लोकांना धान्यापेक्षा दळपाचा जादा दर न परवडणारा आहे.

गगनबावडा : अन्नसुरक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या धान्याचा दर एक ते दोन रुपये प्रती किलो, तर धान्य दळपाचा दर मात्र पाच ते दहा रुपये किलो, अशी विपरीत परिस्थिती या योजनेच्या लाभार्थ्यांवर येत आहे. ज्या उद्दात हेतूने ही योजना राबविण्यात येत आहे, तो उद्दात हेतूच मागे पडत असल्याचे लाभार्थ्यांचे मत आहे.सरकारने समाजातील उपेक्षित घटक, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी अनेक योजना यापूर्वीही राबविल्या आहेत. याशिवाय सध्या सुरू असलेली अन्नसुरक्षा अभियानासारखी महत्त्वाकांक्षी योजना राबत असून, या योजनेंतर्गत प्राप्त होणारे अन्नधान्य एकदम स्वस्त मिळत आहे. मात्र, दळण्याचा खर्च चौपट ते पाचपट असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी आहे.गरीब तसेच उपेक्षित घटकांतील लोकांना धान्यापेक्षा दळपाचा जादा दर न परवडणारा आहे. यासाठी शासनाने काहीतरी पर्याय शोधणे तसेच तोडगा काढणे गरजेचे आहे. इंधनाचे वाढलेले दर, विजेचे औद्योगिक क्षेत्रासाठी वाढलेले दर पाहता दळपकांडप गिरणी मालक सध्या ज्या दरात दळप कांडप करतात, त्यापेक्षा कमी दरात दळप कांडप करू शकतील ही अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. यासाठी लाभार्थ्यांना शासनाने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केल्यास हा प्रश्न निकालात निघेल. (प्रतिनिधी)