शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पदवीसाठी प्रवेशाचे त्रांगडे

By admin | Updated: August 1, 2016 00:33 IST

अनेक विद्यार्थी प्रवेशाविना : विद्यापीठ, महाविद्यालयांना आदेशाची प्रतीक्षा

कोल्हापूर : अतिरिक्त तुकड्या आणि ४० टक्के वाढीव प्रवेश देऊन देखील पदवीच्या प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न कायम आहे. अद्यापही बहुतांश विद्यार्थी प्रवेशाविना असून बारावीच्या पुनर्परीक्षेच्या निकालानंतर पुन्हा प्रवेशासाठीचे विद्यार्थी वाढणार आहेत. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, अशा स्वरूपातील शासनाच्या आदेशाची शिवाजी विद्यापीठासह महाविद्यालयांना प्रतीक्षा आहे. कोल्हापूर विभागातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का यंदा वाढल्याने ‘पदवी’च्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अतिरिक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवेशाअभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विविध महाविद्यालयांनी यावर्षी कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांसाठी अतिरिक्त तुकडी देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली. महाविद्यालयांचे अतिरिक्त तुकडी मागणीचे १२५ प्रस्ताव विद्यापीठाने शासनाला सादर केले. त्यातील १२३ प्रस्तावांना शासनाने मान्यता दिली. त्यानंतर विद्यापीठाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तुकडी मागणी केलेल्या महाविद्यालयांतील सुविधांची पाहणी केली. त्यातून काही महाविद्यालयांना अतिरिक्त तुकडी, तर काहींना तुकडीच्या ४० टक्के प्रवेश क्षमता वाढवून दिली. त्यानुसार महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबविली. या वाढीव क्षमतेतून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, अजूनही बहुतांश विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत शिवाय काही विद्यार्थ्यांना ठरावीक महाविद्यालयांत प्रवेश हवा आहे; पण, क्षमता संपल्याने या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही. बारावीच्या पुनर्परीक्षेच्या निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची त्यात भर पडणार आहे. त्यामुळे अतिरिक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, असा आदेश शासनाकडून देण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालयांकडून होत आहे.