शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

हुपरीच्या गणेश पाणी संस्थेत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व

By admin | Updated: May 20, 2015 00:12 IST

श्री गणेश शेतकरी पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून संस्थेवरील आपली पकड घट्ट असल्याचे सिद्ध केले

हुपरी : येथील श्री गणेश सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या अत्यंत अटीतटीने झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी सदाशिवराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील श्री गणेश शेतकरी पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून संस्थेवरील आपली पकड घट्ट असल्याचे सिद्ध केले. विरोधी श्री गणेश शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चांगलेच रान पेटवून सत्ताधाऱ्यांना आत्मचिंतन करावयास भाग पाडले आहे. संस्थेची स्थापना सन १९७२ मध्ये झाली असून, हुपरी, तळंदगे, इंगळी गावाचे कार्यक्षेत्र आहे. परिसरातील ही सर्वांत जुनी संस्था असून, लोकसेवक आ. बा. नाईक, बाबूराव घोरपडे, हुपरीभूषण य. रा. नाईक, आदींनी संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेचे ३५२ सभासद असून, त्यापैकी ३३५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. संस्थेच्या सत्ताधारी मंडळींनी गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे सभासदांमध्ये काही प्रमाणात असंतोष व नाराजी पसरली होती. त्याचे पर्यवसन निवडणूक लागण्यामध्ये झाले. संस्थेच्या ४३ वर्षांच्या कालावधीतील ही पहिलीच निवडणूक होती. सत्ताधारी गटातील धनाढ्य, दिग्गज व प्रतिष्ठित उमेदवारांच्या तुलनेत विरोधी गटाकडे अत्यंत सामान्य शेतकरी उमेदवार उभे होते. तरीसुद्धा निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. यामध्ये सत्ताधारी गटाने अत्यंत कमी मताधिक्याने विजय प्राप्त केला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : सदाशिव आप्पासाहेब नाईक (१९०), आण्णासाहेब भाऊसोा भोजे (१७६), मानसिंग हरिभाऊ देसाई (१६६), बाळासाहेब रामचंद्र जाधव (१६६), बाळासाहेब नाभिराज पट्टणकुडे (१७१), धनपाल रामचंद्र फिरगाण (१६४), बाळकृष्ण मारुती माळी (१६६), आण्णासाहेब राघू चौगुले (१६१), कलगोंडा शंकर चौगुले (१६२), शरद जयवंत कोळेकर (१७४), राजेश आनंदा कोरे (१७४), जयपाल श्रीपती गिरीबुवा (१६६), शिलप्रभा आप्पासोा पाटील (१८४), शोभाताई रामचंद्र पाटील (१७४), तर सत्ताधारी गटातील सदाशिव महादेव तेली यांची यापूर्वीच इतर मागासवर्गीय गटातून बिनविरोध निवड झाली आहे. (वार्ताहर)