शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महाराष्ट्र-कर्नाटकचे राज्यपाल शुक्रवारी कोल्हापुरात, सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक 

By संदीप आडनाईक | Updated: November 1, 2022 22:57 IST

Governor of Maharashtra-Karnataka : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीसाठी कोल्हापुरात येणार आहेत.

- संदीप आडनाईक कोल्हापूर - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीसाठी कोल्हापुरात येणार आहेत. सीमावाद वगळून विविध प्रशासकीय समस्यांची चर्चा करण्यासाठी रेसिडेन्सी क्लबमध्ये होणारी ही बैठक सकाळी ११ ते १ या वेळेत होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला कारणीभूत असलेले अलमट्टी धरणाची पाणीपातळी, आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, गोवा राज्यातून अवैध पद्धतीने होणारी दारू वाहतूक, लम्पी रोग, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, सीमाभागातील विद्यार्थ्यांचे दाखले, कर्नाटकातून येणारे हत्ती, कोरोना काळातील अनुदान, गर्भलिंग निदान चाचणी, अशा विविध समस्यांसंदर्भात कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा (विजापूर), कलबुर्गी (गुलबर्गा) आणि बीदर जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूरचे जिल्हाधिकारी या बैठकीत चर्चा करणार आहेत.

सीमाभागातील जिल्ह्यांतील समस्यांसंदर्भात राजभवनामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ही बैठक बोलावली असून, माध्यम प्रतिनिधींसह कोणत्याही राजकीय व्यक्तींना येथे प्रवेश देण्यात येणार नाही. या बैठकीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी प्रशासकीय पातळीवर घेतला. या बैठकीत अलमट्टी धरणाच्या उंचीचाही विषय चर्चेत मांडणार असल्याचे रेखावार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २००५, २००६, २०१९ आणि २०२१ या वर्षी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आलेल्या महापुराला अलमट्टी धरणातील पाणीपातळी कारणीभूत होती. या धरणाची पाणीपातळी ५१७ वरून ५१७.५० मीटरपर्यंत नियंत्रित ठेवण्याचे ठरले. मात्र, ते अनेकदा पाळले गेले नाही. यावर्षीची पाणीपातळी ५१९ मीटरपर्यंत होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्वीचीच पाणीपातळी कायम ठेवण्याचा आग्रह या बैठकीत धरण्यात येणार आहे, असेही रेखावार यांनी सांगितले.

कर्नाटकचे राज्यपाल अंबाबाईचे घेणार दर्शन

दरम्यान, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा दौरा जाहीर झाला असून ते ३ नोव्हेंबर रोजी रात्री कोल्हापुरात येत आहेत. ते ४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते रेसिडेन्सी क्लब येथील महाराष्ट्राच्या राज्यपालांसोबत बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते सातारा आणि पुण्यातील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी