शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

महाराष्ट्र-कर्नाटकचे राज्यपाल शुक्रवारी कोल्हापुरात, सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक 

By संदीप आडनाईक | Updated: November 1, 2022 22:57 IST

Governor of Maharashtra-Karnataka : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीसाठी कोल्हापुरात येणार आहेत.

- संदीप आडनाईक कोल्हापूर - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीसाठी कोल्हापुरात येणार आहेत. सीमावाद वगळून विविध प्रशासकीय समस्यांची चर्चा करण्यासाठी रेसिडेन्सी क्लबमध्ये होणारी ही बैठक सकाळी ११ ते १ या वेळेत होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला कारणीभूत असलेले अलमट्टी धरणाची पाणीपातळी, आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, गोवा राज्यातून अवैध पद्धतीने होणारी दारू वाहतूक, लम्पी रोग, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, सीमाभागातील विद्यार्थ्यांचे दाखले, कर्नाटकातून येणारे हत्ती, कोरोना काळातील अनुदान, गर्भलिंग निदान चाचणी, अशा विविध समस्यांसंदर्भात कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा (विजापूर), कलबुर्गी (गुलबर्गा) आणि बीदर जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूरचे जिल्हाधिकारी या बैठकीत चर्चा करणार आहेत.

सीमाभागातील जिल्ह्यांतील समस्यांसंदर्भात राजभवनामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ही बैठक बोलावली असून, माध्यम प्रतिनिधींसह कोणत्याही राजकीय व्यक्तींना येथे प्रवेश देण्यात येणार नाही. या बैठकीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी प्रशासकीय पातळीवर घेतला. या बैठकीत अलमट्टी धरणाच्या उंचीचाही विषय चर्चेत मांडणार असल्याचे रेखावार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २००५, २००६, २०१९ आणि २०२१ या वर्षी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आलेल्या महापुराला अलमट्टी धरणातील पाणीपातळी कारणीभूत होती. या धरणाची पाणीपातळी ५१७ वरून ५१७.५० मीटरपर्यंत नियंत्रित ठेवण्याचे ठरले. मात्र, ते अनेकदा पाळले गेले नाही. यावर्षीची पाणीपातळी ५१९ मीटरपर्यंत होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्वीचीच पाणीपातळी कायम ठेवण्याचा आग्रह या बैठकीत धरण्यात येणार आहे, असेही रेखावार यांनी सांगितले.

कर्नाटकचे राज्यपाल अंबाबाईचे घेणार दर्शन

दरम्यान, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा दौरा जाहीर झाला असून ते ३ नोव्हेंबर रोजी रात्री कोल्हापुरात येत आहेत. ते ४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते रेसिडेन्सी क्लब येथील महाराष्ट्राच्या राज्यपालांसोबत बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते सातारा आणि पुण्यातील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी