शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांची प्रतिमा मलीन करण्याचा सरकारचा डाव : राजू शेट्टी

By admin | Updated: June 27, 2017 19:03 IST

केंद्राची ५२ हजार कोटी मग राज्याची ३४ हजार कशी?

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २७ : काँग्रेस आघाडी सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ५२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मग केवळ राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांसह इतर वर्गाची दिशाभूल करत असून या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

राज्य सरकार कर्जमाफीच्या आकड्याचा खेळ करत आहे. ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचा भुलभुलैय्या सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या आकडेवारीचा हिशेबच लागत नाही. चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा होऊन ४५ लाख नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होणार असून आतापर्यंतच्या कर्जमाफीपेक्षा सर्वांत मोठी कर्जमाफी केल्याचा दावा सरकार करत आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारने २००८ ला संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्यामध्ये तर २०-२० लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. किती शेतकऱ्यांना नेमका कर्जमाफीचा लाभ झाला, असा प्रश्न संसदेत केल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्र्यांनी ५२ हजार कोटी शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे सांगितले होते. मग मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्जमाफ कसे केले? हा खरा प्रश्न असून या सरकारने तर दीड लाखापेक्षा एक रुपयाही कर्ज माफ केलेले नाही, मग ३४ हजार कोटींचा आकडा काढला कोणी? असा सवालही खासदार राजू शेट्टी यांनी केला.

शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी करून शेतकरी अजून समाधानी नाही, असे इतर वर्गाला भासवण्यासाठीच सरकारची उठाठेव सुरू आहे. कदाचित शेतकऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव सरकारचा आसू शकतो, असेही शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांमध्ये अजूनही अस्वस्थता! सरकार ३४ हजार कोटींची कर्जमाफी केल्याचा कांगावा करते, मग शेतकऱ्यांमध्ये अजूनही अस्वस्थता कशी? याचे उत्तर सरकारने शोधले तर कर्जमाफीचे खरे फलित समोर येईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.