शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

शेतकऱ्यांची प्रतिमा मलीन करण्याचा सरकारचा डाव : राजू शेट्टी

By admin | Updated: June 27, 2017 19:03 IST

केंद्राची ५२ हजार कोटी मग राज्याची ३४ हजार कशी?

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २७ : काँग्रेस आघाडी सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ५२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मग केवळ राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांसह इतर वर्गाची दिशाभूल करत असून या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

राज्य सरकार कर्जमाफीच्या आकड्याचा खेळ करत आहे. ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचा भुलभुलैय्या सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या आकडेवारीचा हिशेबच लागत नाही. चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा होऊन ४५ लाख नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होणार असून आतापर्यंतच्या कर्जमाफीपेक्षा सर्वांत मोठी कर्जमाफी केल्याचा दावा सरकार करत आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारने २००८ ला संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्यामध्ये तर २०-२० लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. किती शेतकऱ्यांना नेमका कर्जमाफीचा लाभ झाला, असा प्रश्न संसदेत केल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्र्यांनी ५२ हजार कोटी शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे सांगितले होते. मग मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्जमाफ कसे केले? हा खरा प्रश्न असून या सरकारने तर दीड लाखापेक्षा एक रुपयाही कर्ज माफ केलेले नाही, मग ३४ हजार कोटींचा आकडा काढला कोणी? असा सवालही खासदार राजू शेट्टी यांनी केला.

शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी करून शेतकरी अजून समाधानी नाही, असे इतर वर्गाला भासवण्यासाठीच सरकारची उठाठेव सुरू आहे. कदाचित शेतकऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव सरकारचा आसू शकतो, असेही शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांमध्ये अजूनही अस्वस्थता! सरकार ३४ हजार कोटींची कर्जमाफी केल्याचा कांगावा करते, मग शेतकऱ्यांमध्ये अजूनही अस्वस्थता कशी? याचे उत्तर सरकारने शोधले तर कर्जमाफीचे खरे फलित समोर येईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.