शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला १४ सप्टेंबरची ‘डेडलाईन’ : तटकरे

By admin | Updated: August 23, 2015 00:32 IST

दुष्काळ प्रश्नावर रान उठविणार : राष्ट्रवादी मराठवाड्यात करणार जेलभरो आंदोलन

सातारा : ‘महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाबाबत फडणवीस सरकारला गांभीर्य राहिलेले नाही. या सरकारला आम्ही १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देत आहोत. या कालावधीत त्यांनी दुष्काळी उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, तर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातर्फे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १४ व १५ सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे. सातारा येथे राष्ट्रवादीच्या ताब्यातील ग्रामपंचायती व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने साताऱ्यात आलेल्या आमदार तटकरे यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. तटकरे पुढे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मरावाड्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला होता. यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, औरंगाबाद, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. मी स्वत: या प्रश्नांच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या दौऱ्यातही शेतकऱ्यांशी चर्चा केली. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतही तीव्र दुष्काळी स्थिती आहे.’ (प्रतिनिधी) सरकारला सळो की पळो करू ‘गेल्या पंधरा वर्षांत अनेकदा दुष्काळी परिस्थिती उद्भवली, तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेले. सध्या मात्र फडणवीस सरकार काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. जलयुक्त शिवार योजनाही पूर्वीचीच आहे. या सरकारने केवळ देखावा केला आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. खासगी सावकारांचं कर्ज माफ करणाऱ्या या सरकारला सामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात येत नाहीत. सहकार आणि शेतकरी संपविण्याचे एकसूत्री धोरण या सरकारने सुरू केलेले आहे. या प्रश्नांवर सरकारला सळो की पळो करून सोडू,’ असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.