शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

सरकारला १४ सप्टेंबरची ‘डेडलाईन’ : तटकरे

By admin | Updated: August 23, 2015 00:32 IST

दुष्काळ प्रश्नावर रान उठविणार : राष्ट्रवादी मराठवाड्यात करणार जेलभरो आंदोलन

सातारा : ‘महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाबाबत फडणवीस सरकारला गांभीर्य राहिलेले नाही. या सरकारला आम्ही १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देत आहोत. या कालावधीत त्यांनी दुष्काळी उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, तर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातर्फे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १४ व १५ सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे. सातारा येथे राष्ट्रवादीच्या ताब्यातील ग्रामपंचायती व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने साताऱ्यात आलेल्या आमदार तटकरे यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. तटकरे पुढे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मरावाड्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला होता. यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, औरंगाबाद, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. मी स्वत: या प्रश्नांच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या दौऱ्यातही शेतकऱ्यांशी चर्चा केली. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतही तीव्र दुष्काळी स्थिती आहे.’ (प्रतिनिधी) सरकारला सळो की पळो करू ‘गेल्या पंधरा वर्षांत अनेकदा दुष्काळी परिस्थिती उद्भवली, तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेले. सध्या मात्र फडणवीस सरकार काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. जलयुक्त शिवार योजनाही पूर्वीचीच आहे. या सरकारने केवळ देखावा केला आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. खासगी सावकारांचं कर्ज माफ करणाऱ्या या सरकारला सामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात येत नाहीत. सहकार आणि शेतकरी संपविण्याचे एकसूत्री धोरण या सरकारने सुरू केलेले आहे. या प्रश्नांवर सरकारला सळो की पळो करून सोडू,’ असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.