शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक अपात्रतेबाबत सरकार म्हणणे मांडणार

By admin | Updated: February 3, 2017 00:34 IST

सर्वोच्च न्यायालय : आज सुनावणी; जीव टांगणीला

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून दाखल झालेल्या याचिकेवर आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी राज्य सरकारकडून म्हणणे मांडले जाण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील सुमारे ४०० हून अधिक नगरसेवक अडचणीत आल्यामुळे सुनावणीकडे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे; परंतु राज्यातील अनेक नगरसेवकांना जातपडताळणी समितीकडून वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील २० नगरसेवकांचाही समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळविले. या आदेशामुळे अपात्रतेची एकतर्फी कारवाई होईल, या भीतीने कोल्हापूर महानगरपालिकेतील २० नगरसेवकांच्यावतीने महापौर हसिना फरास यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पीटिशन (एस.एल.पी.) दाखल केली आहे. अशाच प्रकारच्या एस. एल. पी. राज्यभरातील अन्य काही नगरसेवकांकडूनही दाखल केल्या आहेत. त्यावर दि. २० जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात न्या. चलामेश्वर व न्या. सप्रे यांच्यासमोर एकत्र सुनावणी झाली होती. सर्वोच्य न्यायालयाने राज्य सरकारचे याबाबत काय म्हणणे आहे, ते दोन आठवड्यांत सादर करावेत, असे निर्देश दिले होते. दोन आठवड्यांची मुदत आज, शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळी राज्य सरकारला त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर सादर करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)आमचा दोष काय? नगरसेवकांना विभागीय जातपडताळणी समितीकडून वेळेत जातवैधता प्रमाणपत्रे देण्यात आली नाहीत. समितीने तसे लेखी कबुलीपत्र राज्य निवडणूक आयोगास दिले आहे. राज्य सरकारनेच कायदा केला आणि त्यांनीच नेमलेल्या समितीने वेळेत जातवैधता प्रमाणपत्रे दिली नाहीत. ही कायदा आणि कारवाई यातील विसंगती आहे. त्यात नगरसेवकांचा काही एक दोष नाही, असा दावा महापौर हसिना फरास यांचा आहे. कारवाईस राज्य सरकारही नाखूश विभागीय जातपडताळणी समितीने वेळेत सुनावणी पूर्ण केली नाही, परिणामी सहा महिन्यांची मुदत टळून गेली. हा तांत्रिक मुद्दा असला तरी कायद्याचाही भंग झाला आहे. या प्रकारामुळे राज्यातील सुमारे ४०० वर नगरसेवकांना अपात्र ठरवावे लागेल, अशी शक्यता असल्याने राज्य सरकारही कारवाई करण्यास नाखूश आहे. मात्र, ही सगळी प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत बसवूनच निर्णय घेणे उचित होणार आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयातून कारवाईला स्थगिती मिळविणे आणि कायद्यात सुधारणा करणे, असे दोन पर्याय सरकारसमोर आहेत.