शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

नगरसेवक अपात्रतेबाबत सरकार म्हणणे मांडणार

By admin | Updated: February 3, 2017 00:34 IST

सर्वोच्च न्यायालय : आज सुनावणी; जीव टांगणीला

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून दाखल झालेल्या याचिकेवर आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी राज्य सरकारकडून म्हणणे मांडले जाण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील सुमारे ४०० हून अधिक नगरसेवक अडचणीत आल्यामुळे सुनावणीकडे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे; परंतु राज्यातील अनेक नगरसेवकांना जातपडताळणी समितीकडून वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील २० नगरसेवकांचाही समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळविले. या आदेशामुळे अपात्रतेची एकतर्फी कारवाई होईल, या भीतीने कोल्हापूर महानगरपालिकेतील २० नगरसेवकांच्यावतीने महापौर हसिना फरास यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पीटिशन (एस.एल.पी.) दाखल केली आहे. अशाच प्रकारच्या एस. एल. पी. राज्यभरातील अन्य काही नगरसेवकांकडूनही दाखल केल्या आहेत. त्यावर दि. २० जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात न्या. चलामेश्वर व न्या. सप्रे यांच्यासमोर एकत्र सुनावणी झाली होती. सर्वोच्य न्यायालयाने राज्य सरकारचे याबाबत काय म्हणणे आहे, ते दोन आठवड्यांत सादर करावेत, असे निर्देश दिले होते. दोन आठवड्यांची मुदत आज, शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळी राज्य सरकारला त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर सादर करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)आमचा दोष काय? नगरसेवकांना विभागीय जातपडताळणी समितीकडून वेळेत जातवैधता प्रमाणपत्रे देण्यात आली नाहीत. समितीने तसे लेखी कबुलीपत्र राज्य निवडणूक आयोगास दिले आहे. राज्य सरकारनेच कायदा केला आणि त्यांनीच नेमलेल्या समितीने वेळेत जातवैधता प्रमाणपत्रे दिली नाहीत. ही कायदा आणि कारवाई यातील विसंगती आहे. त्यात नगरसेवकांचा काही एक दोष नाही, असा दावा महापौर हसिना फरास यांचा आहे. कारवाईस राज्य सरकारही नाखूश विभागीय जातपडताळणी समितीने वेळेत सुनावणी पूर्ण केली नाही, परिणामी सहा महिन्यांची मुदत टळून गेली. हा तांत्रिक मुद्दा असला तरी कायद्याचाही भंग झाला आहे. या प्रकारामुळे राज्यातील सुमारे ४०० वर नगरसेवकांना अपात्र ठरवावे लागेल, अशी शक्यता असल्याने राज्य सरकारही कारवाई करण्यास नाखूश आहे. मात्र, ही सगळी प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत बसवूनच निर्णय घेणे उचित होणार आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयातून कारवाईला स्थगिती मिळविणे आणि कायद्यात सुधारणा करणे, असे दोन पर्याय सरकारसमोर आहेत.