शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

सरकारला एकाही कायद्याला नख लावू देणार नाही

By admin | Updated: February 2, 2016 01:08 IST

भाई जगताप यांचा इशारा : भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे जाहीर सत्कार

कोल्हापूर : केंद्र सरकार भाजपशासित राज्यात कामगारांसह विविध कायद्यांमध्ये बदल करत आहे; परंतु ही वेळ महाराष्ट्रात येऊ न देता येथील एकाही कायद्याला या सरकारला नख लावू देणार नाही, असा इशारा आमदार भाई जगताप यांनी सोमवारी येथे दिला. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विजयी झालेल्या आ. भाई जगताप व आ. सतेज पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आ. भाई जगताप व आ. सतेज पाटील यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जालन्याचे माजी आमदार भवानीदास कुलकर्णी, महासंघाचे राज्य सरचिटणीस दिलीप जगताप, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, श्रीरंग बरगे, किशोर जमादार, समीर काळे, सत्कार समितीचे अध्यक्ष उदय जाधव, आदींची उपस्थिती होती. भाई जगताप म्हणाले, लोकशाहीची उभारलेली मंदिरे आहेत, ती कष्टकरी व कामगारांच्या जिवावरच आहेत. १३६ वर्षांतील देशातील कामगार चळवळीतील सर्वांत मोठी चळवळ कर्मचारी महासंघाची आहे. दर्जा उंचावून काम केल्याबद्दल ‘आयएसओ-९०००’ हे प्रमाणपत्र मिळाले आहे. ते पुढे म्हणाले, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नावर भाजप सरकारची भूमिका सकारात्मक नाही. त्यामुळे शेतकरी व कामगार हा वर्ग नजरेसमोर ठेवून सरकारविरोधात भविष्यात फार मोठ्या संघर्षासाठी सज्ज राहावे लागणार आहे. आ. सतेज पाटील म्हणाले, सध्याचा काळ हा जनतेसाठी खडतर आहे. शेतकरी व सामान्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली. याउलट सरकारचे काम सुरू आहे. सहा महिन्यांत मोबाईलची बिले वाढवून एक लाख कोटी फोन कंपन्यांना देण्याचे काम या सरकारने केले आहे. सर्वसामान्यांच्या खिशात हात घालून पैसे काढून घेण्याचे काम हे सरकार करत आहे. पी. एन. पाटील म्हणाले, ‘अच्छे दिन’वाल्या सरकारने कामगारांसाठी नवीन कायदा करून खासगी कंपन्यांमधील कामगार कमी करण्याचा घाट घातला आहे. कामगारांना जवळ करणारा नेता हा काँग्रेसचाच आहे, तर हे सरकार अदानी, अंबानी अशा उद्योगपतींना मिठी मारताना दिसत आहे. प्रकाश आवाडे म्हणाले, मुंबई व कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक राज्यात अटीतटीची झाली. त्यामध्ये भाई जगताप व सतेज पाटील यांनी संघर्ष करत विजय संपादन केला. राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक ठरली आहे. कारण जनतेच्या मनातील निकाल या निमित्ताने लागला आहे. (प्रतिनिधी)