शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला एकाही कायद्याला नख लावू देणार नाही

By admin | Updated: February 2, 2016 01:08 IST

भाई जगताप यांचा इशारा : भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे जाहीर सत्कार

कोल्हापूर : केंद्र सरकार भाजपशासित राज्यात कामगारांसह विविध कायद्यांमध्ये बदल करत आहे; परंतु ही वेळ महाराष्ट्रात येऊ न देता येथील एकाही कायद्याला या सरकारला नख लावू देणार नाही, असा इशारा आमदार भाई जगताप यांनी सोमवारी येथे दिला. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विजयी झालेल्या आ. भाई जगताप व आ. सतेज पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आ. भाई जगताप व आ. सतेज पाटील यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जालन्याचे माजी आमदार भवानीदास कुलकर्णी, महासंघाचे राज्य सरचिटणीस दिलीप जगताप, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, श्रीरंग बरगे, किशोर जमादार, समीर काळे, सत्कार समितीचे अध्यक्ष उदय जाधव, आदींची उपस्थिती होती. भाई जगताप म्हणाले, लोकशाहीची उभारलेली मंदिरे आहेत, ती कष्टकरी व कामगारांच्या जिवावरच आहेत. १३६ वर्षांतील देशातील कामगार चळवळीतील सर्वांत मोठी चळवळ कर्मचारी महासंघाची आहे. दर्जा उंचावून काम केल्याबद्दल ‘आयएसओ-९०००’ हे प्रमाणपत्र मिळाले आहे. ते पुढे म्हणाले, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नावर भाजप सरकारची भूमिका सकारात्मक नाही. त्यामुळे शेतकरी व कामगार हा वर्ग नजरेसमोर ठेवून सरकारविरोधात भविष्यात फार मोठ्या संघर्षासाठी सज्ज राहावे लागणार आहे. आ. सतेज पाटील म्हणाले, सध्याचा काळ हा जनतेसाठी खडतर आहे. शेतकरी व सामान्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली. याउलट सरकारचे काम सुरू आहे. सहा महिन्यांत मोबाईलची बिले वाढवून एक लाख कोटी फोन कंपन्यांना देण्याचे काम या सरकारने केले आहे. सर्वसामान्यांच्या खिशात हात घालून पैसे काढून घेण्याचे काम हे सरकार करत आहे. पी. एन. पाटील म्हणाले, ‘अच्छे दिन’वाल्या सरकारने कामगारांसाठी नवीन कायदा करून खासगी कंपन्यांमधील कामगार कमी करण्याचा घाट घातला आहे. कामगारांना जवळ करणारा नेता हा काँग्रेसचाच आहे, तर हे सरकार अदानी, अंबानी अशा उद्योगपतींना मिठी मारताना दिसत आहे. प्रकाश आवाडे म्हणाले, मुंबई व कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक राज्यात अटीतटीची झाली. त्यामध्ये भाई जगताप व सतेज पाटील यांनी संघर्ष करत विजय संपादन केला. राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक ठरली आहे. कारण जनतेच्या मनातील निकाल या निमित्ताने लागला आहे. (प्रतिनिधी)