शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

पंधरा दिवसांत शासन दुष्काळ जाहीर करेल

By admin | Updated: September 10, 2015 01:01 IST

रावसाहेब दानवे : त्वरित उपाययोजना सुरू; प्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू

कोल्हापूर : राज्यातील पिकांच्या अंतिम आणेवारी अहवालाची वाट न पाहता शासन येत्या १५ दिवसांत दुष्काळ जाहीर करेल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. दुष्काळासंबंधीच्या त्वरितच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. विरोधकांनी कितीही टीका केली तरी प्रसंगी शासन कर्ज काढेल पण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते शासकीय विश्रामगृहात बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार दानवे म्हणाले, गेल्या आघाडी सरकारने पंधरा वर्षांत ८ हजार कोटी दुष्काळावेळी शेतकऱ्यांवर खर्च केले. मात्र, भाजप सत्तेवर आल्यानंतर एका वर्षात ७ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मराठवाडा भागातील दुष्काळी दौरा केला. मीही पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा केला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे त्वरितची उपाययोजना म्हणून दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू आणि आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू केले आहे. दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावी व नंतरच्या विद्यार्थ्यांची पन्नास टक्के माफ करण्यात येणार आहे. बँकांना शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने कर्ज देण्याची सूचना केली आहे. ज्या बँका या सूचनेचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. भाजप शासन नागरिकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन तसेच राज्यावरील साडेतीन लाख कोटी कर्ज घेऊन सत्तेवर आले आहे. भाजप शासन सत्तेवर आल्यानंतर सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले आहे. सध्याच्या दुष्काळाशी सामना करण्यासाठी शासन सज्ज झाले आहे. केंद्राकडून निधीची मागणी केली आहे. निधी मिळेपर्यंत राज्य शासन पैसे खर्च करणार आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज ठळक झाली आहे. यापूर्वीच्या शासनाने ७० हजार कोटी खर्च करून फक्त १ टक्के भाग सिंचनाखाली आणला आहे. आमचे शासन राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीत ३०० कोटी रुपयांची कामे लोकसहभागाने केली आहेत. (प्रतिनिधी)