शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवार अभियानासाठी शासनाने कसली कंबर

By admin | Updated: January 20, 2015 00:52 IST

यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबविण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, गाववार ३० डिसेंबरला ग्रामसभांचे आयोजन

प्रकाश पाटील - कोपार्डे -पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे गेल्या काही वर्षांपासून सर्वच जिल्ह्यांत सतत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. सिंचनच्या सुविधांचा विचार करता मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनींचे मोठे प्रमाण यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणाऱ्या अनिश्चिततेने विकासात मोठा अडथळा ठरत आहे. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबविण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, गाववार ३० डिसेंबरला ग्रामसभांचे आयोजन करून त्याबाबत जनजागृती शासनाने सुरू केली आहे.राज्यात सतत उद्भवणारी टंचाईसदृश्य परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१०’ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाद्वारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मागील दोन वर्षांत राज्यात साखळी सिमेंट कॉँक्रिटला बांध कार्यक्रम, महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान राबविले आहे. यामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, के. टी. वेअर दुरुस्ती, जलस्त्रोतातील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, ओढे-नाले जोडकामे हाती घेण्यात आली. या सर्व कामांच्या माध्यमातून ८.४० टी.एम.सी. क्षमतेचे विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे भूजल पातळीत एक ते तीन मीटरने वाढ झाली असून, पिण्याचे पाणी व शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. याचा अनुभव घेऊनच शिवार अभियान राबविण्यात आले आहे.यातून पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविण्याने भूजल पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न करणे, विकेंद्रित पाणीसाठा निर्माण करणे, अस्तित्वातील असणाऱ्या जलस्त्रोतातील गाळ लोक सहभागातून काढून जलस्त्रोतातील पाणीसाठ्यात वाढ करणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देणे, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ धोरण ठेवणे यांसह १३ उद्देश साध्य करण्याचे धोरण ठेवले आहे.यासाठी तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. गावपातळीवरील आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी शिवार भेट करून केंद्राभिमुख आराखडा तयार करावयाचा आहे. विस्तार अधिकारी कृषी, मंडळ कृषी अधिकारी, मंडल अधिकारी यांची जिल्हाधिकाऱ्यांनी नेमणूक करून त्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी यांच्यासोबत शिवार भेट करून, गावाच्या गरजा विचारात घेऊन, गाव आराखडा निर्माण करून त्याची ग्रामसभेत मंजुरी घ्यावयाची आहे.