शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या उपचारासाठी सरकारी पशुवैद्य थेट जाणार पशुपालकांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : पशुधनाच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाचे पशुवैद्यच पशुपालकांच्या दारात येणार आहेत. जिल्ह्यातील हातकणंगले, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : पशुधनाच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाचे पशुवैद्यच पशुपालकांच्या दारात येणार आहेत. जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, कागल, करवीर या पाच तालुक्यांत प्राथमिक टप्प्यात फिरत्या पशुचिकित्सालयांद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत गावागावात जाऊन मागणीनुसार या तपासणीचे काम करण्यास गतिमानता येणार आहे.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत राज्य शासनाने हा उपक्रम राबविण्याचे जाहीर करून जानेवारी अखेरीस त्याचा प्रारंभ केला. त्यानुसार राज्यात ८१ तालुक्यांची निवड करून फिरती पशुचिकित्सालये स्थापन केली. कोल्हापूर जिल्ह्यात या पथकासाठी आरोग्य सेवा सुविधा असलेली पाच वाहने उपलब्ध झाली आहेत.

गंभीर आजारी असल्याने दवाखान्यात नेता येत नाहीत तसेच आजारपणामुळे हालचाल करता येत त्यामुळे जाग्यावरच बसून असलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठीच्या दृष्टीने ही योजना अधिक उपयोगी आहे.

ग्रामीण भागात अनेक गावात, वाड्यावस्त्यांवर पाशीवैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी पशुपालकांना प्रचंड कसरत करावी लागते. गावात किंवा जवळपास दवाखाना नसल्याने गंभीर आजार असलेल्या जनावरांचा उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचे चित्र पहावयास मिळते.

आता मात्र कुठेही कधीही जाऊन सरकारी पशुवैद्य या फिरत्या पशुचिकित्सा वाहनातून जाऊन उपचार करणार आहेत. त्यामुके उपचाराअभावी जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल.

आजारी जनावरांची माहिती देण्यासाठी ‘१९६२’ हा टोल नंबर देण्यात येणार आहे. हा नंबर डायल करून आजारी जनावरांची कल्पना दिल्यानंतर पशुचिकित्सा वाहन (ॲम्बुलन्स) तत्काळ उपचार करण्यासाठी हजर राहील. यामध्ये एक डॉक्टर, एक सहाय्यक असेल.

विशेष म्हणजे हे वाहन अनेक सुविधानी युक्त असे आहे. यामध्ये मिनी ऑपरेशन थिएटर, बसलेल्या जनावरांना उभे करण्यासाठी चेनपुली, दोन फ्रीज, छोटी लॅबोरिटी, मायक्रोस्कोप, ऑपरेशन साहित्य यांची उपलब्धता आहे. तसेच गावागावात जनावरांच्या संदर्भात तसेच पशुखाद्य याची माहिती देण्यासाठी एलसीडी बसविलेला आहे. चर्चासत्रेही घेण्यासाठी साऊंड सिस्टीमची सोय आहे. सर्व प्रकारच्या पशुधनावर उपचार करण्याची व्यवस्था याद्वारे पार पाडता येणार आहे. कसलाही आजार असेल, शारीरिक इजा झाली असेल तर आता तत्काळ उपचार होणे सोपे जाईल.

कोटं

सुरुवातीच्या टप्प्यात पाच तालुक्यांचा समावेश झाला आहे. यानंतर उर्वरित तालुक्यांसाठीही ही योजना राबविली जाणार आहे. अतिजलद उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग नेहमीच सतर्क राहील. अत्यंत महत्वपूर्ण अधिक उपयोगी अशी ही योजना आहे. ती जास्तीत जास्त प्रभावीपणे राबविली जाईल.

- डॉ. वाय. ए. पठाण

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त