शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

जनावरांच्या उपचारासाठी सरकारी पशुवैद्य थेट जाणार पशुपालकांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : पशुधनाच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाचे पशुवैद्यच पशुपालकांच्या दारात येणार आहेत. जिल्ह्यातील हातकणंगले, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : पशुधनाच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाचे पशुवैद्यच पशुपालकांच्या दारात येणार आहेत. जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, कागल, करवीर या पाच तालुक्यांत प्राथमिक टप्प्यात फिरत्या पशुचिकित्सालयांद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत गावागावात जाऊन मागणीनुसार या तपासणीचे काम करण्यास गतिमानता येणार आहे.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत राज्य शासनाने हा उपक्रम राबविण्याचे जाहीर करून जानेवारी अखेरीस त्याचा प्रारंभ केला. त्यानुसार राज्यात ८१ तालुक्यांची निवड करून फिरती पशुचिकित्सालये स्थापन केली. कोल्हापूर जिल्ह्यात या पथकासाठी आरोग्य सेवा सुविधा असलेली पाच वाहने उपलब्ध झाली आहेत.

गंभीर आजारी असल्याने दवाखान्यात नेता येत नाहीत तसेच आजारपणामुळे हालचाल करता येत त्यामुळे जाग्यावरच बसून असलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठीच्या दृष्टीने ही योजना अधिक उपयोगी आहे.

ग्रामीण भागात अनेक गावात, वाड्यावस्त्यांवर पाशीवैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी पशुपालकांना प्रचंड कसरत करावी लागते. गावात किंवा जवळपास दवाखाना नसल्याने गंभीर आजार असलेल्या जनावरांचा उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचे चित्र पहावयास मिळते.

आता मात्र कुठेही कधीही जाऊन सरकारी पशुवैद्य या फिरत्या पशुचिकित्सा वाहनातून जाऊन उपचार करणार आहेत. त्यामुके उपचाराअभावी जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल.

आजारी जनावरांची माहिती देण्यासाठी ‘१९६२’ हा टोल नंबर देण्यात येणार आहे. हा नंबर डायल करून आजारी जनावरांची कल्पना दिल्यानंतर पशुचिकित्सा वाहन (ॲम्बुलन्स) तत्काळ उपचार करण्यासाठी हजर राहील. यामध्ये एक डॉक्टर, एक सहाय्यक असेल.

विशेष म्हणजे हे वाहन अनेक सुविधानी युक्त असे आहे. यामध्ये मिनी ऑपरेशन थिएटर, बसलेल्या जनावरांना उभे करण्यासाठी चेनपुली, दोन फ्रीज, छोटी लॅबोरिटी, मायक्रोस्कोप, ऑपरेशन साहित्य यांची उपलब्धता आहे. तसेच गावागावात जनावरांच्या संदर्भात तसेच पशुखाद्य याची माहिती देण्यासाठी एलसीडी बसविलेला आहे. चर्चासत्रेही घेण्यासाठी साऊंड सिस्टीमची सोय आहे. सर्व प्रकारच्या पशुधनावर उपचार करण्याची व्यवस्था याद्वारे पार पाडता येणार आहे. कसलाही आजार असेल, शारीरिक इजा झाली असेल तर आता तत्काळ उपचार होणे सोपे जाईल.

कोटं

सुरुवातीच्या टप्प्यात पाच तालुक्यांचा समावेश झाला आहे. यानंतर उर्वरित तालुक्यांसाठीही ही योजना राबविली जाणार आहे. अतिजलद उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग नेहमीच सतर्क राहील. अत्यंत महत्वपूर्ण अधिक उपयोगी अशी ही योजना आहे. ती जास्तीत जास्त प्रभावीपणे राबविली जाईल.

- डॉ. वाय. ए. पठाण

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त