शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST

जयसिंगपूर : कृषी कायद्यातून बाजार समित्याच बरखास्त करण्याची भूमिका केंद्र सरकार घेत आहे. अडचणीच्या काळातही जयसिंगपूर बाजार समिती चांगल्या ...

जयसिंगपूर : कृषी कायद्यातून बाजार समित्याच बरखास्त करण्याची भूमिका केंद्र सरकार घेत आहे. अडचणीच्या काळातही जयसिंगपूर बाजार समिती चांगल्या पध्दतीने सुरू आहे. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग मिळाला आहे. येणाऱ्या काळात रेशीम उद्योगाला चांगले दिवस येण्यासाठी शासन निश्चितच प्रयत्न करेल, असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला.

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व रेशीम संचालनालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नाप्पाण्णा कुंभार मार्केट यार्डमध्ये रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते झाले. स्वागत सभापती रायगोंडा पाटील, तर सुभाषसिंग रजपूत यांनी बाजार समितीचा आढावा विषद केला. डॉ. ए. डी. जाधव, डॉ. कविता देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी आण्णासाहेब पाटील, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील, डॉ. अशोकराव माने, सर्जेराव शिंदे, रावसाहेब भिलवडे, वैभव उगळे, सहायक निबंधक प्रेमदास राठोड, उपसभापती महंमदशफी पटेल, सचिव सुनील गावडे उपस्थित होते. विजयसिंह देशमुख यांनी आभार मानले.

-------------------

मंत्री यड्रावकरांनी पुकारले सौदे

रेशीम कोष केंद्राच्या ठिकाणी रेशीम कोषचे सौदे पार पडले. राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुढाकार घेत सौदे पुकारले. रेशीम कोषचा राज्यातील उच्चांकी सौदा यावेळी झाला. किलोला ६७० रुपये दर मिळाला. मंगळवारी व शुक्रवारी सौदे पुन्हा घेतले जाणार आहेत.

फोटो -१३०२२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते झाले. (छाया-सुभाष जाधव)