शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

सत्ताधाऱ्यांनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्या:हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:57 IST

सेनापती कापशी : वीस वर्षे आमदार त्यातही पंधरा वर्षे मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या आहेत. विधानसभेत कायदे केले व विकासाचा स्तर कायमपणे वाढवत गेलो. पण, गेली चार वर्षे विरोधी सरकार आल्यामुळे गोरगरीब जनतेसाठी आम्ही सुरू केलेल्या योजना आमच्या डोळ्यांदेखत बंद पडत ...

सेनापती कापशी : वीस वर्षे आमदार त्यातही पंधरा वर्षे मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या आहेत. विधानसभेत कायदे केले व विकासाचा स्तर कायमपणे वाढवत गेलो. पण, गेली चार वर्षे विरोधी सरकार आल्यामुळे गोरगरीब जनतेसाठी आम्ही सुरू केलेल्या योजना आमच्या डोळ्यांदेखत बंद पडत आहेत. विकासकामांवरही दूरगामी परिणाम झाला आहे. जनतेने याची गंभीर दखल घेऊन वेळीच सावध होणे गरजेचे आहे. गणरायाच्या कृपेमुळे जर पुन्हा संधी मिळालीच, राज्यात जर आमचे सरकार सत्तेवर आलेच तर बंद पडलेल्या सर्व योजना तर पुन्हा चालू करणारच आहे. याशिवाय सहाशे रुपयांची पेन्शन दोन हजार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथे विविध विकासकामांचा प्रारंभ व उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.त्यांच्या हस्ते बेलेवाडी काळम्मा ते माध्याळ या रस्त्याचा, स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्याचा, दलित वस्तीतील गटर बांधकाम, आदी कामांचा प्रारंभ तसेच उज्ज्वल गॅस योजनेतील लाभार्थींना गॅसचे वाटप करण्यात आले.मुश्रीफ म्हणाले, उज्ज्वल योजनेंतर्गत सर्वसामान्य महिलांना मिळणाºया गॅस टाकीला सबसिडी नाही. सुरुवातीला मोफत मिळाल्यानंतर महिन्याला साडे आठशे रुपये देऊन गॅसटाकी विकत घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या योजनेअंतर्गत वाटप झालेल्या लाभार्थींना गॅसच्या टाकीला ५० टक्के सबसिडी मिळाली पाहिजे, सरपंच सागर पाटील यांनी प्रास्ताविक, तर आर. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी हरी पाटील, हिंदुराव मुदाळकर, आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नोटांनी भरलेली गाडी घेऊन फिरावे लागेलरस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेवर मुश्रीफ म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्त्यावरचे खड्डे पाहून मला लाज वाटते, असे वक्तव्य केले होते. गडकरींना याची लाज वाटली, पण या खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना लाज वाटत नाही. उलट ते खड्डा दाखवा आणि दहा हजार मिळवा असे आवाहन करीत आहेत. रस्त्यावरचे खड्डे जर पाहिले तर त्यांना नोटांनी भरलेली गाडी घेऊनच फिरावे लागेल, अशी अवस्था महाराष्ट्रातील रस्त्यांची झाली आहे.