शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

सरकारने गोळ्या, लाठ्यांनी संप मोडू नये

By admin | Updated: June 4, 2017 01:37 IST

एन. डी. पाटील यांचा इशारा : संप मागे घेण्याचा निर्णय वेदनादायक

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ७० वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी कुणाचेही नेतृत्व न मानता संघटित झाल्याने भवितव्य आश्वासक वाटत होते. कोणताही प्रश्न सुटलेला नसताना शेतकरी नेत्यांनी संप मागे घेऊन आत्मघातकीपणा केला. हा निर्णय वेदनादायी आहे. सरकारने सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून गोळ्या व लाठ्यांनी संप मोडू नये, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केला.शेतकरी संप मागे घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. पाटील पत्रकारांशी बोलत होते. कधी नव्हे ते शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरला होता. संपाचे मनोधैर्य टिकविण्यासाठी एकजूट कायम राहणे गरजेचे होते. संप शांततेच्या मार्गाने करावा, याचा आग्रह आमचा कायम राहणार; पण सरकारला संवेदनशीलताच नसेल, तर शेतकऱ्यांनी काय करावे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून संप चिरडण्याचा प्रयत्न ही वृत्ती योग्य नसून, सरकारने माधव भंडारी यांच्यासारख्या वाचाळवीरांना मुसक्या घालाव्यात, असा सल्ला प्रा. पाटील यांनी दिला. संपाबाबत सरकारशी चर्चा करायला जाणार आहात का? याबाबत प्रा. पाटील म्हणाले, न बोलावता चर्चेला का जाऊ. मी काय आण्णा हजारे आहे का? आण्णांना पुन्हा एकदा या बाजारपेठेत यायचे असेल, म्हणून कदाचित ते मध्यस्थी करायला इच्छुक असतील. सरकार नेमके कोणाच्या सल्ल्याने चालते हेच कळत नाही. तेव्हा कोणत्या बिळात होता?संवेदनहीन सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर दूध ओतले म्हणून हळहळ व्यक्त केली जाते; दोन वर्षे लाखो क्विंटल कांदा कुजून गेला, तेव्हा हे लोक कोणत्या बिळात लपून बसले होते? असा सवाल त्यांनी केला. तूर खरेदीबाबत मेहरबानी केली का?तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिल्याचे मंत्री सांगतात. शेतीमाल खरेदीची मुदत कसली घालता, मुदतवाढ करून मेहरबानी केली का? सरकारकडे आश्वासने पाळायची शक्ती नसल्याची टीका प्रा. पाटील यांनी केली.