शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

सरकारने गोळ्या, लाठ्यांनी संप मोडू नये

By admin | Updated: June 4, 2017 01:37 IST

एन. डी. पाटील यांचा इशारा : संप मागे घेण्याचा निर्णय वेदनादायक

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ७० वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी कुणाचेही नेतृत्व न मानता संघटित झाल्याने भवितव्य आश्वासक वाटत होते. कोणताही प्रश्न सुटलेला नसताना शेतकरी नेत्यांनी संप मागे घेऊन आत्मघातकीपणा केला. हा निर्णय वेदनादायी आहे. सरकारने सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून गोळ्या व लाठ्यांनी संप मोडू नये, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केला.शेतकरी संप मागे घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. पाटील पत्रकारांशी बोलत होते. कधी नव्हे ते शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरला होता. संपाचे मनोधैर्य टिकविण्यासाठी एकजूट कायम राहणे गरजेचे होते. संप शांततेच्या मार्गाने करावा, याचा आग्रह आमचा कायम राहणार; पण सरकारला संवेदनशीलताच नसेल, तर शेतकऱ्यांनी काय करावे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून संप चिरडण्याचा प्रयत्न ही वृत्ती योग्य नसून, सरकारने माधव भंडारी यांच्यासारख्या वाचाळवीरांना मुसक्या घालाव्यात, असा सल्ला प्रा. पाटील यांनी दिला. संपाबाबत सरकारशी चर्चा करायला जाणार आहात का? याबाबत प्रा. पाटील म्हणाले, न बोलावता चर्चेला का जाऊ. मी काय आण्णा हजारे आहे का? आण्णांना पुन्हा एकदा या बाजारपेठेत यायचे असेल, म्हणून कदाचित ते मध्यस्थी करायला इच्छुक असतील. सरकार नेमके कोणाच्या सल्ल्याने चालते हेच कळत नाही. तेव्हा कोणत्या बिळात होता?संवेदनहीन सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर दूध ओतले म्हणून हळहळ व्यक्त केली जाते; दोन वर्षे लाखो क्विंटल कांदा कुजून गेला, तेव्हा हे लोक कोणत्या बिळात लपून बसले होते? असा सवाल त्यांनी केला. तूर खरेदीबाबत मेहरबानी केली का?तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिल्याचे मंत्री सांगतात. शेतीमाल खरेदीची मुदत कसली घालता, मुदतवाढ करून मेहरबानी केली का? सरकारकडे आश्वासने पाळायची शक्ती नसल्याची टीका प्रा. पाटील यांनी केली.