शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सरकारने गोळ्या, लाठ्यांनी संप मोडू नये

By admin | Updated: June 4, 2017 01:37 IST

एन. डी. पाटील यांचा इशारा : संप मागे घेण्याचा निर्णय वेदनादायक

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ७० वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी कुणाचेही नेतृत्व न मानता संघटित झाल्याने भवितव्य आश्वासक वाटत होते. कोणताही प्रश्न सुटलेला नसताना शेतकरी नेत्यांनी संप मागे घेऊन आत्मघातकीपणा केला. हा निर्णय वेदनादायी आहे. सरकारने सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून गोळ्या व लाठ्यांनी संप मोडू नये, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केला.शेतकरी संप मागे घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. पाटील पत्रकारांशी बोलत होते. कधी नव्हे ते शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरला होता. संपाचे मनोधैर्य टिकविण्यासाठी एकजूट कायम राहणे गरजेचे होते. संप शांततेच्या मार्गाने करावा, याचा आग्रह आमचा कायम राहणार; पण सरकारला संवेदनशीलताच नसेल, तर शेतकऱ्यांनी काय करावे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून संप चिरडण्याचा प्रयत्न ही वृत्ती योग्य नसून, सरकारने माधव भंडारी यांच्यासारख्या वाचाळवीरांना मुसक्या घालाव्यात, असा सल्ला प्रा. पाटील यांनी दिला. संपाबाबत सरकारशी चर्चा करायला जाणार आहात का? याबाबत प्रा. पाटील म्हणाले, न बोलावता चर्चेला का जाऊ. मी काय आण्णा हजारे आहे का? आण्णांना पुन्हा एकदा या बाजारपेठेत यायचे असेल, म्हणून कदाचित ते मध्यस्थी करायला इच्छुक असतील. सरकार नेमके कोणाच्या सल्ल्याने चालते हेच कळत नाही. तेव्हा कोणत्या बिळात होता?संवेदनहीन सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर दूध ओतले म्हणून हळहळ व्यक्त केली जाते; दोन वर्षे लाखो क्विंटल कांदा कुजून गेला, तेव्हा हे लोक कोणत्या बिळात लपून बसले होते? असा सवाल त्यांनी केला. तूर खरेदीबाबत मेहरबानी केली का?तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिल्याचे मंत्री सांगतात. शेतीमाल खरेदीची मुदत कसली घालता, मुदतवाढ करून मेहरबानी केली का? सरकारकडे आश्वासने पाळायची शक्ती नसल्याची टीका प्रा. पाटील यांनी केली.