शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक भावनांना आवर घालून शासनास सहकार्य हवे

By admin | Updated: May 12, 2015 23:39 IST

वसंत शेटके यांचे मत

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे झालेल्या फटाक्यांच्या स्फोटामुळे फटाके निर्मिती आणि जबाबदारी हा विषय चर्चेत आला आहे. कवठेएकंद गावाला दसऱ्यादिवशी फटाक्यांच्या आतषबाजीची परंपरा असली तरीही, फटाके निर्मिती करताना योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याचेच निदर्शनास आले आहे. काही वर्षांनंतर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन जीवितहानी होण्याच्या घटना वारंवार का घडतात, त्या थांबण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात आदी विषयांवर मनपाचे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी वसंत शेटके यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...कवठेएकंदसारख्या दुर्घटनांची जिल्ह्यात पुनरावृत्ती का होते? - नेमकी दुर्घटना कोणत्या कारणांमुळे होते, याच्या मुळापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही, तोपर्यंत ‘या’ प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. जेव्हा स्फोटासारखी दुर्घटना होते, तेव्हा प्रशासन चौकशी समिती नेमते. परंतु यातून काहीच निष्पन्न होत नाही. भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत नाही. काही काळानंतर नागरिक सर्वच विसरुन जातात व पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’चाच अनुभव येतो. याला सर्वस्वी मनुष्यस्वभावच जबाबदार आहे. आग लागल्यावर ती विझविण्यापेक्षा, ती लागू नये यासाठी जोपर्यंत प्रयत्न करण्यात येत नाहीत, तोपर्यंत दुर्घटना थांबतील या भ्रमात राहण्यात काहीच अर्थ नाही. परंतु प्रशासन तर सक्षम असल्याचे बोलले जाते... - दुर्घटना घडल्यावर सक्षमपणा उपयोगाचा नाही. फटाक्यांचे कारखाने, विक्रेते आदींना प्रशासनामार्फत जो परवाना देण्यात येतो, त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येते का, हे पाहिले पाहिजे. एकदा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले की प्रशासनाचे काम संपत नाही. वर्षभरात केव्हाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारखाने, विक्रेते यांच्या इमारतींची तपासणी केली पाहिजे. नियमापेक्षा तेथे जास्त मालाची साठवणूक तर होत नाही ना आणि जर कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला पाहिजे. तरच प्रशासनाचा वचक बसेल. फटाके निर्मिती कारखान्यात कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे?- जेथे फटाके निर्मितीचा कारखाना असेल, तेथे उत्पादित माल ठेवण्यासाठी एकाच मोठ्या खोली ऐवजी तेथे विविध खोल्या असल्या पाहिजेत. जेणेकरुन समजा आग लागलीच, तर सर्वच स्फोटक सामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार नाही. इमारत ही विटा अथवा मातीपासून निर्मित असावी. तेथे काम करणाऱ्या कामगारांना, संभाव्य दुर्घटना घडली तर घाबरुन न जाता काय करावे, याची माहिती देणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे इमारतीत विजेचे कनेक्शन नसावे. त्याऐवजी ट्रॉली माउंटेड लाईट प्रकाराचा वापर करावा. इमारत तापू नये यासाठी इमारतीसाठी सूर्यकिरण परावर्तित होतील, अशा प्रकारच्या रंगाचा वापर आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इमारतीत तापमान मापक यंत्र देखील बंधनकारक आहे. कारखान्याच्या इमारतीत ‘स्प्रिंकलर’ पध्दतीचा (कारंजाप्रमाणे उडणारे पाणी) वापर करावा. म्हणजे दुर्घटना घडल्यास इमारतीच्या बाहेरील बाजूस असणारे नळ कनेक्शन सुरु केल्यास आतील बाजूस पाणी कारंजासारखे उडेल व आग विझविण्यास साहाय्य होईल. निदान इतकी तरी खबरदारी घेतली पाहिजे. कवठेएकंद येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्त कारखान्यात यातील किती बाबींची अंमलबजावणी करण्यात आली होती, याचा अभ्यास केला पाहिजे. कवठेएकंदला दसऱ्याची परंपरा असल्याने तेथे अनेक ठिकाणी अपुऱ्या जागेत फटाके निर्मिती होते. त्यामुळे याची अंमलबजावणी कितपत होईल ?- सुरक्षेसाठी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. शेकडो वर्षांपासून कवठेएकंदला फटाक्यांची निर्मिती होत आहे. परंतु तेव्हा कधी अशी दुर्घटना झाल्याचे दिसून येत नाही. कारण तेव्हा एक परंपरा म्हणून फटाक्यांची निर्मिती होत होती. सध्या या व्यवसायात स्पर्धा आली आहे. परिणामी प्रत्येक फटाके व्यावसायिक अधिकाधिक प्रमाणात फटाक्यांची तीव्रता वाढवत नेत आहेत. घरटी होणारे फटाक्यांचे उत्पादन तात्काळ बंद करावे. फटाके निर्मिती करणारे कारखाने गावाच्या बाहेर स्थलांतरित करुन, त्यामध्ये शंभर फुटाचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. धार्मिक भावनांना आवर घालून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. शहरात दिवाळीच्या कालावधित अनेक फटाके स्टॉल एकाच छताखाली आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो... - हा उपक्रम चांगला असला तरी, फटाके स्टॉल बंदिस्त नव्हे, तर खुल्या क्रीडांगणावर एकत्रित उभे करावेत. प्रत्येक स्टॉलला सर्व बाजूंनी पत्रे लावणे आवश्यक आहे. शिवाय तेथे पुरेशा प्रमाणात पाण्याच्या टाक्या व बादल्या ठेवणे गरजेचे आहे. अग्निशमन कर्मचाऱ्यांची आग विझविण्यात काय भूमिका असते ?- काही नाही! फटाक्यांची दुर्घटना ही क्षणार्धात घडते. त्यामुळे अग्निशमन दल तेथे पोहोचेपर्यंत सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले असते. मातीचे ढिगारे उपसणे, एवढेच काम शिल्लक राहते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्निशमन दल कर्मचाऱ्यांना स्फोटकांना लागलेली आग विझविण्याचे प्रशिक्षणच देण्यात येत नाही. त्यामुळे आगीबाबत संबंधितांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशा दुर्घटना रोखणे अशक्य आहे.४नरेंद्र रानडे