शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रकल्प संचालकांकडून शासन नियम धाब्यावर

By admin | Updated: January 8, 2016 00:56 IST

जिल्हा परिषद : ‘ग्रामीण विकास’मधील गलथान कारभार, साहेबांची मेहरबानी, पारदर्शकतेचा केवळ आव

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेमधील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक शासनाचे नियम धाब्यावर बसवून एका टेबलवर नियमापेक्षा अधिक वर्षे ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांवर ‘मेहरनजर’ दाखवित आहेत. नेहमी आपला कारभार किती पारदर्शक आहे, मी मंत्रालयात काम केले आहे, अशी बतावणी करणारे ते प्रकल्प संचालक मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. साहेबाला चिरीमिरी गोळा करून देण्यासाठीच त्या कर्मचाऱ्यांना एकच टेबल दिले आहे, असा आरोप होत आहे. जिल्हा परिषदेत सहा महिन्यांपूर्वीच ते प्रकल्प संचालक म्हणून आले आहेत. एका महिन्यात अरेरावी आणि गलथान कारभार, फाईली फेकणे, दरडावून बोलणे यामुळे त्यांच्या विरोधात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन बंड केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांच्याकडे तक्रार केली. सीईओ सुभेदार यांनी ते बंड शमविले. त्यांच्याकडे कोणतीही माहिती मागण्यासाठी गेल्यानंतर उडवाउडवीचे उत्तरे देतात. कार्यालयात ते भेटत नसल्याच्याही तक्रारी आहेत. माझा किती ‘सीआर’ (गोपनीय अहवाल) चांगला आहे, मंत्र्यांचा स्वीय साहाय्यक म्हणून चांगले काम केले आहे, असे भेटायला येणाऱ्यांना ते डोस पाजत असतात. त्यांच्या कारभाराविरोधात असंतोष निर्माण होत आहे. गेल्या सर्वसाधारण सभेत घरकुलाच्या प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे यांनी धारेवर धरून त्यांची भंबेरी उडविली. थेट उत्तर न देता त्यांनी वेळ मारून नेली. शासनाच्या ग्राम विकास विभागातील बदल्या या नियमानुसार जिल्हा परिषदेत एकाच टेबलावर तीन वर्षे आणि विभागात पाच वर्षे काम केलेल्यांची बदली करणे बंधनकारक आहेत. न केल्यास विभाग प्रमुखांवर कारइवाईची तरतूद आहे. मात्र, या नियमालाच प्रकल्प संचालकांनी केराची टोपली दाखविली आहे. तीन कर्मचारी एकाच टेबलावर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून आहेत. टेबल बदली न करता प्रकल्पसंचालकांनी त्यांच्यावर मर्जी दाखविली आहे. ‘साहेबां’च्या या अन्यायी मेहरबानीमुळे अन्य कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. कार्यालयात कमी आणि...पूर्वीचे प्रकल्पसंचालक पी. बी. पाटील कर्तव्यदक्ष होते. त्यांची प्रशासनावर पकड होती. त्यामुळे यापूर्वी ग्रामीण विकास यंत्रणेने चांगले काम केले. मात्र, हे साहेब सदस्य आणि सामान्यांची कामे आणि तक्रारी ऐकून घ्यावी लागतात म्हणून कार्यालयात कमी आणि फिरतीवर अधिक असतात. या साहेबांचा निष्क्रीय कारभार ठळक चर्चेत येत आहे. ते आल्यापासून प्रशासनाचा कारभार विस्कळीत झाला आहे. ते नेमके कोठे फिरती करतात, असाही सवाल उपस्थित होत आहे.