शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर पाडण्याचा सरकारचा डाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:42 IST

कोल्हापूर : कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा लागू केली आहे. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर अखेर कारखान्यांना त्यांच्याकडील साठा ८ यक्कयांवर आणावा लागणार आहे.

ठळक मुद्दे कारखान्यासाठी साठा मर्यादा : आॅक्टोबरअखेर आणावा लागेल ८ टक्क्यांवरदेशात यंदा साखरेचे उत्पादन कमी झाल्याने देशातील महाराष्टÑया काळात साखरेची मागणी वाढते. पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक झाल्यास दर वाढतील. उत्पादित मिळून एक कोटी ९५ लाख ९३ हजार ३१५ टन साखर होते.

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा लागू केली आहे. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर अखेर कारखान्यांना त्यांच्याकडील साठा ८ यक्कयांवर आणावा लागणार आहे.सणासुदीच्या हंगामात साखरेचे दर वाढू नयेत, या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे समर्थन सरकार यासाठी देत असले तरी साखरेचे दर पाडण्यासाठीच हा निर्णय घेतला गेला असल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.

देशात यंदा साखरेचे उत्पादन कमी झाल्याने देशातील महाराष्टÑ आणि उत्तर प्रदेश वगळता अन्य साखर उत्पादक राज्यातील कारखान्यांकडे फारशी साखर शिल्लक नाही. सध्या घाऊक बाजारात जीएसटी वगळता ३६२५ ते ३६६० रुपयांच्या आसपास दर आहे. खुल्या बाजारातील साखरेचा किरकोळ विक्री दर प्रति किलो ४२ रुपयांच्या आसपास आहे. गणेशोत्सवापासून सणांचा हंगाम सुरू होतो.

या काळात साखरेची मागणी वाढते. पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक झाल्यास दर वाढतील. ठराविक मर्यादेच्या पलीकडे साखरेचे दर वाढू न देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच सरकारने साखर कारखान्यांसाठी साठा मर्यादा लागू केली आहे. केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी एका ट्विटद्वारे साठा मर्यादा लागू केल्याची माहिती दिली. देशात साखरेचा तुटवडा नाही पण संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.सप्टेंबरअखेर साठा आणावा लागेल २१ टक्क्यांवरयाबाबतचा अध्यादेश अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने सोमवारी जारी केला आहे. या अध्यादेशात म्हटले आहे की, २०१६-१७ च्या साखर हंगामात साखर कारखान्यांना त्यांच्याकडील उपलब्ध साखरेच्या २१ टक्क्यांपेक्षा अधिक साठा सप्टेंबर २०१७ नंतर ठेवता येणार नाही.हीच मर्यादा आॅक्टोबरसाठी आठ टक्के ठेवण्यात आली आहे. साखर कारखान्याकडील हंगामातील साखर याचा अर्थ २०१६-१७ चा हंगाम सुरू होताना असलेली शिल्लक साखर आणि हंगामात उत्पादित झालेली साखर यांची बेरीज म्हणजेच हंगामातील साखर असे समजले जाते.कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना मोठा फटकाकोल्हापूर जिल्ह्णातील साखर कारखान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊन त्याचा फटका उस उत्पादक शेतकºयांनाही जाणवणार आहे. जिल्ह्णात खासगी आणि सहकारी असे २३ कारखाने आहेत. या कारखान्यांकडे २०१६-१७ च्या हंगामात आरंभीची शिल्लक आणि हंगामातील उत्पादित मिळून एक कोटी ९५ लाख ९३ हजार ३१५ टन साखर होते.यातील ३१ जुलैअखेर ६३ लाख ८१ हजार १३९ टन साखर शिल्लक आहे. सप्टेंबरअखेर पर्यंत २८ लाख ८५ हजार ९२४ टन साखर विकावी लागणार आहे. तर आॅक्टोबरअखेर २२ लाख ६७ हजार ४८० टन साखर विकावी लागणार आहे. याचाच अर्थ एवढी साखर बाजारात येणार आहे. परिणामी, बाजारातील साखरेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढून दर कोसळण्याचीच शक्यता साखर वर्तुळातून व्यक्त होत आहे.दहा कारखान्याकडे ४० टक्कयाहून अधिक साखरजिल्ह्णातील २३ पैकी १० कारखान्यांकडे जुलैअखेर ४० टक्क्यांहून अधिक साखरेचा साठा शिल्लक आहे. सर्वाधिक ५१ टक्के साखर शिरोळच्या दत्त साखर कारखान्याकडे आहे. त्या खालोखाल भोगावती आणि छत्रपती राजाराम (कसबा बावडा) कडे ४७ टक्के, गुरुदत्त शुगर्सकडे ४६ टक्के, जवाहर आणि कुंभी-कासारी कारखान्याकडे ४५ टक्के, शरद कारखान्याकडे ४३ टक्के, डी. वाय. पाटीलकडे ४२, दूधगंगा-वेदगंगाकडे ४१, तर मंडलिक कारखान्याकडे ४० टक्के साखर शिल्लक आहे. सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका या कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे.