शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

साखरेचे दर पाडण्याचा सरकारचा डाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:42 IST

कोल्हापूर : कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा लागू केली आहे. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर अखेर कारखान्यांना त्यांच्याकडील साठा ८ यक्कयांवर आणावा लागणार आहे.

ठळक मुद्दे कारखान्यासाठी साठा मर्यादा : आॅक्टोबरअखेर आणावा लागेल ८ टक्क्यांवरदेशात यंदा साखरेचे उत्पादन कमी झाल्याने देशातील महाराष्टÑया काळात साखरेची मागणी वाढते. पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक झाल्यास दर वाढतील. उत्पादित मिळून एक कोटी ९५ लाख ९३ हजार ३१५ टन साखर होते.

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा लागू केली आहे. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर अखेर कारखान्यांना त्यांच्याकडील साठा ८ यक्कयांवर आणावा लागणार आहे.सणासुदीच्या हंगामात साखरेचे दर वाढू नयेत, या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे समर्थन सरकार यासाठी देत असले तरी साखरेचे दर पाडण्यासाठीच हा निर्णय घेतला गेला असल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.

देशात यंदा साखरेचे उत्पादन कमी झाल्याने देशातील महाराष्टÑ आणि उत्तर प्रदेश वगळता अन्य साखर उत्पादक राज्यातील कारखान्यांकडे फारशी साखर शिल्लक नाही. सध्या घाऊक बाजारात जीएसटी वगळता ३६२५ ते ३६६० रुपयांच्या आसपास दर आहे. खुल्या बाजारातील साखरेचा किरकोळ विक्री दर प्रति किलो ४२ रुपयांच्या आसपास आहे. गणेशोत्सवापासून सणांचा हंगाम सुरू होतो.

या काळात साखरेची मागणी वाढते. पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक झाल्यास दर वाढतील. ठराविक मर्यादेच्या पलीकडे साखरेचे दर वाढू न देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच सरकारने साखर कारखान्यांसाठी साठा मर्यादा लागू केली आहे. केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी एका ट्विटद्वारे साठा मर्यादा लागू केल्याची माहिती दिली. देशात साखरेचा तुटवडा नाही पण संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.सप्टेंबरअखेर साठा आणावा लागेल २१ टक्क्यांवरयाबाबतचा अध्यादेश अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने सोमवारी जारी केला आहे. या अध्यादेशात म्हटले आहे की, २०१६-१७ च्या साखर हंगामात साखर कारखान्यांना त्यांच्याकडील उपलब्ध साखरेच्या २१ टक्क्यांपेक्षा अधिक साठा सप्टेंबर २०१७ नंतर ठेवता येणार नाही.हीच मर्यादा आॅक्टोबरसाठी आठ टक्के ठेवण्यात आली आहे. साखर कारखान्याकडील हंगामातील साखर याचा अर्थ २०१६-१७ चा हंगाम सुरू होताना असलेली शिल्लक साखर आणि हंगामात उत्पादित झालेली साखर यांची बेरीज म्हणजेच हंगामातील साखर असे समजले जाते.कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना मोठा फटकाकोल्हापूर जिल्ह्णातील साखर कारखान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊन त्याचा फटका उस उत्पादक शेतकºयांनाही जाणवणार आहे. जिल्ह्णात खासगी आणि सहकारी असे २३ कारखाने आहेत. या कारखान्यांकडे २०१६-१७ च्या हंगामात आरंभीची शिल्लक आणि हंगामातील उत्पादित मिळून एक कोटी ९५ लाख ९३ हजार ३१५ टन साखर होते.यातील ३१ जुलैअखेर ६३ लाख ८१ हजार १३९ टन साखर शिल्लक आहे. सप्टेंबरअखेर पर्यंत २८ लाख ८५ हजार ९२४ टन साखर विकावी लागणार आहे. तर आॅक्टोबरअखेर २२ लाख ६७ हजार ४८० टन साखर विकावी लागणार आहे. याचाच अर्थ एवढी साखर बाजारात येणार आहे. परिणामी, बाजारातील साखरेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढून दर कोसळण्याचीच शक्यता साखर वर्तुळातून व्यक्त होत आहे.दहा कारखान्याकडे ४० टक्कयाहून अधिक साखरजिल्ह्णातील २३ पैकी १० कारखान्यांकडे जुलैअखेर ४० टक्क्यांहून अधिक साखरेचा साठा शिल्लक आहे. सर्वाधिक ५१ टक्के साखर शिरोळच्या दत्त साखर कारखान्याकडे आहे. त्या खालोखाल भोगावती आणि छत्रपती राजाराम (कसबा बावडा) कडे ४७ टक्के, गुरुदत्त शुगर्सकडे ४६ टक्के, जवाहर आणि कुंभी-कासारी कारखान्याकडे ४५ टक्के, शरद कारखान्याकडे ४३ टक्के, डी. वाय. पाटीलकडे ४२, दूधगंगा-वेदगंगाकडे ४१, तर मंडलिक कारखान्याकडे ४० टक्के साखर शिल्लक आहे. सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका या कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे.