शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याबाबत सरकारकडून ठोस धोरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

जयसिंगपूर : लॉकडाऊन कडक होण्याच्या भीतीने भाजीपाला व फूल उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे ...

जयसिंगपूर : लॉकडाऊन कडक होण्याच्या भीतीने भाजीपाला व फूल उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे दर पाडले जात आहेत. कोरोना महामारीमुळे शेती पिकवायची की नाही, असा सवाल गतवर्षी शेतकऱ्यांतून उपस्थित झाला होता. पुन्हा एकदा लॉकडाऊनचे नियम कडक केले जात आहेत. नाशवंत असणाऱ्या भाजीपाल्यासाठी सरकारकडून कोणतेही ठोस धोरण नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला आठवडा बाजार बंद करण्यात आले. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेबरोबरच मुंबईसाठी पाठविला जाणारा भाजीपाला शेतातच पडून राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. लॉकडाऊननंतर अतिवृष्टीमुळेदेखील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. शासनाने भाजीपाला उत्पादकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणीदेखील झाली होती. सध्या लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक होत असतानाच, याचा गैरफायदा घेत एजंटांकडून भाजीपाला व फूल उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे. कोबीला अक्षरश: मातीमोल दर आला आहे.

लॉकडाऊन करताना या शेतीमालाचे करायचे काय, हे सुध्दा सरकारने विचारात घेतले पाहिजे. गेली वर्षभर भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट झाली आहे. गेल्यावर्षी अचानक लॉकडाऊनमुळे काहीच करता आले नाही. त्यामुळे नाशवंत असणाऱ्या शेतीमालाबाबत ठोस धोरण राबविण्याची गरज आहे.

चौकट -

दर नसल्याने कोबी शेतातच

नांदणी (ता. शिरोळ) येथील बाबासाहेब कुगे या शेतकऱ्याने वीस गुंठ्यांतील कोबी पिकाला दरच नसल्याने शेतातच तोडून टाकला. लॉकडाऊन होणार, या चर्चेमुळे सर्वत्र भाजीपाला व फळांचे दर कोसळले आहेत. याउलट ग्राहकांना चढ्या भावातच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. एका बाजूला डिझेल-पेट्रोल दरवाढ, रासायनिक खतांची दरवाढ, वीज बिलांसाठी कनेक्शन तोडले जात आहेत, अशी परिस्थिती आहे.

कोट -

विविध अडचणीतून पिकविलेला शेतीमाल शिवारातच तोडून टाकावा लागत आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेताना सरकारने भाजीपाला व फूल उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.

- सागर शंभूशेटे, नांदणी.

फोटो - २९०३२०२१-जेएवाय-०५, ०६ फोटो ओळ - नांदणी (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दर नसल्याने शेतातच कोबी तोडून टाकला आहे.