शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा कर्जमाफीसाठी शासनाच्या हालचाली

By admin | Updated: March 14, 2017 00:44 IST

बँकांकडे माहिती मागविली : सहकार आयुक्तांचे बॅँकांना आदेश; थकीत कालावधीबाबत मात्र संभ्रमावस्था

राजाराम लोंढे -- कोल्हापूर--कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, थकीत कर्जे व कर्जदारांची माहिती बॅँकांना तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. थकीत कर्जाचा कालावधी निश्चित केला नसला तरी प्राथमिक हालचाली पाहता, दुष्काळी तीन वर्षांच्या काळातील कर्जमाफी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रातील कॉँग्रेस आघाडी सरकारने २००९ मध्ये ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. २००८ पर्यंत थकीत असणारे संपूर्ण पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता; पण प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना राज्यात उमटली आणि राज्य सरकारने सरसकट २० हजार रुपये कर्जमाफीचा निर्णय घेतला. पण, ही कर्जमाफी वादाच्या भोवऱ्यात अडकली. सगळा फायदा पश्चिम महाराष्ट्रालाच झाल्याची ओरड सुरू झाली. त्यात कोल्हापूरच्या कर्जमाफीबाबत थेट नाबार्डकडे तक्रार झाली आणि ‘अपात्र कर्जमाफी’चे गुऱ्हाळ आजअखेर सुरू आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला पुन्हा कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राजकीय पक्षांची सुरू आहे. उभा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शिवसेनेने कर्जमाफीची मागणी लावून धरली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील वर्षी ‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर तुळजापूर येथे ‘कर्जमुक्ती अभियान’ सुरू केले. साडेसहा लाख शेतकऱ्यांनी ‘कर्जमुक्ती’चे फॉर्म संघटनेकडे जमा केले आहेत. विधिमंडळ अधिवेशनच्या पहिल्या दिवसापासून कर्जमाफीवरून कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आक्रमक झाली असून, कामकाज चालू दिलेले नाही. त्यामुळे सरकारची कोंडी झाली असून, एकूण थकीत कर्जे व कर्जदार शेतकऱ्यांची किती रक्कम याचा अंदाज सरकारकडून घेतला जात आहे. सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधक व जिल्हा बॅँकांना थकीत कर्जाची माहिती मागविली आहे; पण नेमक्या कोणत्या कालावधीतील थकीत कर्जाची माहिती द्यायची याबाबत कोणतीच स्पष्टता नाही. येत्या दोन दिवसांत याबाबत स्पष्ट निर्देश येण्याची शक्यता आहे. पुनर्गठीत कर्ज अडसर ठरणार दुष्काळामध्ये राज्य सरकारने थकीज कर्जांचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले होते. त्याची परतफेड समान हप्त्यात सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफीचे निकष ठरविताना पुनर्गठीत कर्जे मध्यम मुदतीमध्ये धरले तर शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानेच आम्ही ‘सात-बारा कोरा’ करण्याची मागणी केली. उत्तर प्रदेश निवडणुकीत ‘सत्ता द्या कर्जमाफी करतो’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तर तुम्हाला आधीच सत्ता दिली, सरकार आणखी कशाची वाट पाहतंय.- खासदार राजू शेट्टी कर्जमाफीची ताकद केंद्राचीच!राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती व राज्यासमोरील इतर आव्हाने वेगवेगळी आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफ करणे राज्य सरकारच्या आवाक्याबाहेरचा विषय आहे. केंद्र सरकारच हे करू शकते; पण ते एका राज्यापुरता निर्णय घेता येणार नाही. यासाठीच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफीची घोषणा करून संपूर्ण देशात संदेश दिला आहे. जिल्ह्यात १५० कोटी थकीत ?जिल्ह्यातील पीक कर्जाची सर्वाधिक खाती जिल्हा बॅँकेत आहेत. जिल्हा बॅँकेच्या पातळीवर थकीत संस्था व थकीत कर्ज साधारणत: ७० कोटींपर्यंत आहे. विकास संस्था व शेतकऱ्यांच्या पातळीवर विचार करायचा झाल्यास सुमारे १५० कोटी थकबाकी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.