शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
4
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
5
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
6
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
7
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
8
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
9
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
10
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
11
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
12
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
13
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
14
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
15
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
16
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
17
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
18
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
19
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
20
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!

शासकीय यंत्रणेने लाखाचे केले बारा हजार, भरपाईवर मारली काट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:08 IST

धोमचा डावा कालवा फुटून मालगाव, वनगळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाच्या पंचनाम्यात लाखांच्या नुकसानीची नोंद असताना पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीत हेच नुकसान काही हजारांवर आणून ठेवण्यात आले. दोन्ही विभागांच्या या बार्गेनिंगमध्ये येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत लाखाचे झाले बारा हजार ही म्हण तंतोतंत जुळली आहे.

ठळक मुद्देमहसूलच्या पंचनाम्यावर पाटबंधारेचे बार्गेनिंगआतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल

सागर गुजर

सातारा : धोमचा डावा कालवा फुटून मालगाव, वनगळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाच्या पंचनाम्यात लाखांच्या नुकसानीची नोंद असताना पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीत हेच नुकसान काही हजारांवर आणून ठेवण्यात आले. दोन्ही विभागांच्या या बार्गेनिंगमध्ये येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत लाखाचे झाले बारा हजार ही म्हण तंतोतंत जुळली आहे.मालगावमधील शेतकरी देवेंद्र कल्याण कदम यांचे उकिरड्याचे शेणखत, हळद बियाणे, कडबा, जळण असे मिळून मोठे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनाम्यात हे नुकसान १ लाख ८३ हजार इतके नोंदवले. तर पाटबंधारेने हेच नुकसान केवळ ४३ हजार रुपयांवर घसरवले. संजय कृष्णा कदम यांचे महसूलच्या पंचनाम्यात ४ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.मात्र, पाटबंधारे विभागाने हेच नुकसान १ लाख ३५ हजार रुपये इतके दाखवले.

मधुकर आनंदराव कदम यांच्या शेताचा बांध वाहून गेला. शेतातील ऊस पिकाचेही नुकसान झाले. महसूलच्या पंचनाम्यानुसार ८ लाखांचे नुकसान झाले असताना पाटबंधारे विभागाने मात्र हेच नुकसान १ लाख ३५ हजार रुपये इतके म्हणजे निम्म्यापेक्षा कमी दाखवले आहे. शंकर सीतामाम यादव यांचे तर ४ लाख ४५ हजारांचे नुकसान झाले. तेच पाटबंधारे विभागाने बार्गेनिंग करून अवघ्या ८७ हजारांवर आणले आहे.

प्रकाश भिकूलाल कदम यांचे ४ लाख २० हजारांचे नुकसान झाले असताना त्यांना पाटबंधारे विभागाने मोठा झटका देत अवघे पाच हजारांचे नुकसान दाखवले आहे. धर्माजी साहेबराव देशमुख यांच्या शेतातील ताल वाहून गेल्याने २ लाख ५0 हजारांचे नुकसान झाले. तेच नुकसान केवळ १५ हजार रुपये इतके कमी दाखविण्यात आले आहे.मालगाव ग्रामपंचायत हद्दीमधील मालगाव-अंबवडे रस्ता पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने वाहून गेला होता. हेच नुकसान महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार १ लाख ६0 हजार इतके होते. पाटबंधारे विभागाने तेच नुकसान २५ हजार रुपये इतके कमी केले. स्मशानभूमीच्या कामासाठी आणलेली सिमेंटची पोती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली होती.

ओढ्याच्या पाईपस व भरावही वाहून जाऊन सर्व मिळून ८ लाखांचे नुकसान झाले होते. तेच नुकसान पाटबंधारेच्या पाहणीत अवघे १ लाख ११ हजार इतके कमी दाखविण्यात आले आहे.वनगळ व मालगाव या दोन्ही गावांतील सर्वच शेतकऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार केला गेला आहे.

मालगावातील ४४ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ७७ लाख ११ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असताना पाटबंधारे विभागाने पाहणी करून ते ११ लाख २ हजार ७०० रुपये एवढे कमी दाखवले. वनगळ येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ५ लाख १६ हजारांचे नुकसान झाले असताना ते केवळ १ लाख ६४ हजार इतके कमी दाखविण्यात आले आहे. यामुळे भरपाई मिळाली तरी त्यातून शेतकºयांचे समाधान होणार नाही.हातात मात्र छदामही नाही...गेल्या चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. लाखोंचे नुकसान हजारांत दाखविण्याचे सोपस्कार शासकीय यंत्रणेने करून ठेवले; परंतु एक छदामही शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही, हे विशेष! शासकीय यंत्रणा गेंड्याच्या कातडीची असल्याने न्याय मिळण्यासाठी झगडावे लागेल, असे मत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर