शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

ऊसदराबाबत सरकारला गांभीर्य नाही

By admin | Updated: November 18, 2014 23:27 IST

अखिल भारतीय किसान सभा : दरासाठी आंदोलन करण्याचा इशारा

कोल्हापूर : ऊसदर नियामक मंडळाने आतापर्यंत वेळकाढूपणाची भूमिका घेतल्याने ऊसदराबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. केवळ चर्चेशिवाय काहीच केले नसून याच्या निषेधार्थ १ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी ऊस दर नियामक मंडळाची स्थापना केली. पण बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. शेतकरी ऊस दराकडे डोळे लावून बसले असताना सरकार काहीच करत नाही. वास्तविक ऊस दर नियामक मंडळाच्या अध्यक्षांनी बैठकीतील वृत्तांत घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही, त्यामुळे हे सरकार ऊस दराबाबत गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होते. त्याबद्दल त्यांचा निषेध करत असल्याचे प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.हा हंगाम सुरू होण्यापुर्वी पहिल्या उचलीचा प्रश्न संपणे अपेक्षित होते. केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाचे सरकार आहे. त्यामध्ये खासदार राजू शेट्टी सहभागी आहेत. पण त्यांची भूमिका गोंधळात टाकणारी आहे. रंगराजन समिती ऊसाचा उत्पादन खर्च लक्षात न घेता दर ठरविते. हंगामाच्या तोंडावर साखरेचे दर पाडून शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. वास्तविक खासदार शेट्टी यांनी सर्व प्रश्नांवर संघर्ष करणे अपेक्षित होते. या वस्तूस्थितीचा विचार करून किसान सभेने ‘स्वामीनाथन समितीच्या’ शिफारसीनुसार ऊसाचा दर ठरवावा, यासाठी आंदोलन हातात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. बैठकीस आप्पा परीट, सुभाष निकम, विकास पाटील, आनंदराव चव्हाण, तुळशीदास किल्लेदार, संभाजी यादव, बाळासाहेब कामते, आनंदा कांबळे, अनिल जंगले, प्रा. ए. बी. पाटील, भगवान पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी )