शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना चिरडणाऱ्या सरकारचे दिवस भरले

By admin | Updated: June 20, 2016 00:50 IST

हसन मुश्रीफ : राष्ट्रवादीची बैठक; पंधरा वर्षांची सत्तेची मस्ती जिरल्याने चांगले काम करून दाखवू

कोल्हापूर : गोरगरिबांच्या योजना बंद करून त्यांना चिरडणारे, शेतकऱ्यांना गाडणारे व पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करून विदर्भाला भरभरून देणाऱ्या राज्यातील महायुतीच्या सरकारचे दिवस भरल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. पंधरा वर्षे सत्तेत राहिल्याने आम्हाला काहीशी मस्ती आली होती; पण आता ती जिरली असून येथून पुढे आदर्श काम करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्याच्या तयारीसाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. राज्य सरकारमधील ‘बिन बुलाये मेहमान’ अशी शिवसेनेची खिल्ली उडवत आमदार मुश्रीफ म्हणाले, दीड वर्षात सरकारने सामान्य माणसांना संपविले आहे. प्रत्येक मंत्री भ्रष्टाचाराने बरबटला आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात किती पैसा नेला, याचा भांडाफोड आगामी अधिवेशनात करणार आहे. गरिबांना चिरडणाऱ्या सरकार फार काळ टिकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा दौरा आहे. दहा वर्षे जिल्हा परिषदेवर सत्ता होती; पण काही चुकांमुळे गेली. आता एकसंधपणे बांधणी करून पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याची शपथ घ्या, असे आवाहन करीत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, २५ व २६ जून रोजी शरद पवार दौऱ्यावर येत आहेत, त्यांचे स्वागत जंगी करायचे असून प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना आणावे. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, प्रत्येक तालुक्यात मेळावे घेऊन पक्षमजबुतीसाठी प्रयत्न करणार आहे. मुश्रीफसाहेब, तुम्ही चिंता करू नका. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून तिथे तुमच्या विचारांचा अध्यक्ष बसविण्याचा विडा आम्ही उचलला आहे. संगीता खाडे, महादेव पाटील, डी. बी. पिस्टे, अवधूत अपराध, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संजय पाटील-यड्रावकर यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, नामदेवराव भोईटे, आर. के. पोवार, नंदिनी बाभूळकर, भैया माने, धैर्यशील पाटील, अमोल माने, अरुण इंगवले, मुरलीधर जाधव, मधुकर जांभळे, बाबूराव हजारे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) दादा, सूज उतरली की कळेल भाजपने अलीकडे कागल व गडहिंग्लजमध्ये मेळावे घेतले. यामधील गर्दी पाहून ‘मुश्रीफ यांनी मेळावा पाहिला तर त्यांना धडकी भरेल’ असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांदादा पाटील यांनी केले. आपणाला दादांवर बोलायचे नव्हते; पण ते माझी कळ काढतात, म्हणून बोलावे लागते. ‘दादा, मेळाव्यातील गर्दी ही सत्तेची सूज आहे. ती उतरली की कळेल,’ असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.