शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गरिबांना चिरडणाऱ्या सरकारचे दिवस भरले

By admin | Updated: June 20, 2016 00:50 IST

हसन मुश्रीफ : राष्ट्रवादीची बैठक; पंधरा वर्षांची सत्तेची मस्ती जिरल्याने चांगले काम करून दाखवू

कोल्हापूर : गोरगरिबांच्या योजना बंद करून त्यांना चिरडणारे, शेतकऱ्यांना गाडणारे व पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करून विदर्भाला भरभरून देणाऱ्या राज्यातील महायुतीच्या सरकारचे दिवस भरल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. पंधरा वर्षे सत्तेत राहिल्याने आम्हाला काहीशी मस्ती आली होती; पण आता ती जिरली असून येथून पुढे आदर्श काम करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्याच्या तयारीसाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. राज्य सरकारमधील ‘बिन बुलाये मेहमान’ अशी शिवसेनेची खिल्ली उडवत आमदार मुश्रीफ म्हणाले, दीड वर्षात सरकारने सामान्य माणसांना संपविले आहे. प्रत्येक मंत्री भ्रष्टाचाराने बरबटला आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात किती पैसा नेला, याचा भांडाफोड आगामी अधिवेशनात करणार आहे. गरिबांना चिरडणाऱ्या सरकार फार काळ टिकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा दौरा आहे. दहा वर्षे जिल्हा परिषदेवर सत्ता होती; पण काही चुकांमुळे गेली. आता एकसंधपणे बांधणी करून पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याची शपथ घ्या, असे आवाहन करीत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, २५ व २६ जून रोजी शरद पवार दौऱ्यावर येत आहेत, त्यांचे स्वागत जंगी करायचे असून प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना आणावे. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, प्रत्येक तालुक्यात मेळावे घेऊन पक्षमजबुतीसाठी प्रयत्न करणार आहे. मुश्रीफसाहेब, तुम्ही चिंता करू नका. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून तिथे तुमच्या विचारांचा अध्यक्ष बसविण्याचा विडा आम्ही उचलला आहे. संगीता खाडे, महादेव पाटील, डी. बी. पिस्टे, अवधूत अपराध, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संजय पाटील-यड्रावकर यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, नामदेवराव भोईटे, आर. के. पोवार, नंदिनी बाभूळकर, भैया माने, धैर्यशील पाटील, अमोल माने, अरुण इंगवले, मुरलीधर जाधव, मधुकर जांभळे, बाबूराव हजारे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) दादा, सूज उतरली की कळेल भाजपने अलीकडे कागल व गडहिंग्लजमध्ये मेळावे घेतले. यामधील गर्दी पाहून ‘मुश्रीफ यांनी मेळावा पाहिला तर त्यांना धडकी भरेल’ असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांदादा पाटील यांनी केले. आपणाला दादांवर बोलायचे नव्हते; पण ते माझी कळ काढतात, म्हणून बोलावे लागते. ‘दादा, मेळाव्यातील गर्दी ही सत्तेची सूज आहे. ती उतरली की कळेल,’ असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.