शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना न्याय देण्यास शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

इचलकरंजी : पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आपल्याला न्याय देण्याची भूमिका राज्य ...

इचलकरंजी : पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आपल्याला न्याय देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. निश्चितपणे शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी धीर सोडू नये. संकटाशी मुकाबला करण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी नगरपालिकेच्या सभागृहातील बैठकीत दिला.

महापुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पाटील शनिवारी इचलकरंजीच्या दौऱ्यावर होते. दुपारी एक वाजता नदिवेस नाका परिसरातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथील छावणीतील पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काही महिलांना पुनर्वसनासंबंधी विचारले असता, आमचे योग्यरित्या पुनर्वसन होणार असेल तर आम्ही तयार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पालिकेतील बैठकीत, पुराचे पंचनामा करण्यासाठी आलेल्या अभिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कोणीही दबाव आणू नये. पूर्णपणे पारदर्शक काम केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तुम्ही काहीही काळजी करू नका, शासन जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करेल. यंदाच्या महापुरामुळे शहराचे मोठे नुकसान झाले आहे. काही तत्काळ व काही दीर्घकाळ उपाययोजना करण्याची गरज असून पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या अनेक वर्षांपासून नदीतील वाळू उपसा बंद असून खोली कमी झाली आहे. नदी क्षेत्रातील अतिक्रमण महापुरास कारणीभूत असल्याचे खासदार धैर्यशील माने म्हणाले. महापुरामुळे आवाडे सबस्टेशन बंद ठेवावे लागत असल्याने सबस्टेशनची पॉवर ट्रान्सफॉर्मरसह उंची वाढवावी. पूरग्रस्त भागातील विद्युत मीटर महावितरणने मोफत बदलून द्यावेत. १८ कोटी ३४ लाखाची सुवर्णजयंती नगरोस्थान योजना मार्गी लावावी, आदी मागण्या आमदार प्रकाश आवाडे यांनी केल्या. तसेच नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शहरातील पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. तर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी सहाय्यक अनुदान तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.

पालिकेने अहवाल सादर करावा

पूर परिस्थितीचे पंचनामे झाल्यानंतर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यवाही सुरू करा. जागेची पाहणी करा, तसेच पुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजनांची माहिती संकलित करून नगरपालिकेने त्याचा अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

३१ आयसीएच