शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पूरग्रस्तांना न्याय देण्यास शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

इचलकरंजी : पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आपल्याला न्याय देण्याची भूमिका राज्य ...

इचलकरंजी : पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आपल्याला न्याय देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. निश्चितपणे शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी धीर सोडू नये. संकटाशी मुकाबला करण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी नगरपालिकेच्या सभागृहातील बैठकीत दिला.

महापुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पाटील शनिवारी इचलकरंजीच्या दौऱ्यावर होते. दुपारी एक वाजता नदिवेस नाका परिसरातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथील छावणीतील पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काही महिलांना पुनर्वसनासंबंधी विचारले असता, आमचे योग्यरित्या पुनर्वसन होणार असेल तर आम्ही तयार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पालिकेतील बैठकीत, पुराचे पंचनामा करण्यासाठी आलेल्या अभिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कोणीही दबाव आणू नये. पूर्णपणे पारदर्शक काम केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तुम्ही काहीही काळजी करू नका, शासन जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करेल. यंदाच्या महापुरामुळे शहराचे मोठे नुकसान झाले आहे. काही तत्काळ व काही दीर्घकाळ उपाययोजना करण्याची गरज असून पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या अनेक वर्षांपासून नदीतील वाळू उपसा बंद असून खोली कमी झाली आहे. नदी क्षेत्रातील अतिक्रमण महापुरास कारणीभूत असल्याचे खासदार धैर्यशील माने म्हणाले. महापुरामुळे आवाडे सबस्टेशन बंद ठेवावे लागत असल्याने सबस्टेशनची पॉवर ट्रान्सफॉर्मरसह उंची वाढवावी. पूरग्रस्त भागातील विद्युत मीटर महावितरणने मोफत बदलून द्यावेत. १८ कोटी ३४ लाखाची सुवर्णजयंती नगरोस्थान योजना मार्गी लावावी, आदी मागण्या आमदार प्रकाश आवाडे यांनी केल्या. तसेच नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शहरातील पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. तर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी सहाय्यक अनुदान तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.

पालिकेने अहवाल सादर करावा

पूर परिस्थितीचे पंचनामे झाल्यानंतर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यवाही सुरू करा. जागेची पाहणी करा, तसेच पुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजनांची माहिती संकलित करून नगरपालिकेने त्याचा अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

३१ आयसीएच