शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

पूरग्रस्तांना न्याय देण्यास शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

इचलकरंजी : पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आपल्याला न्याय देण्याची भूमिका राज्य ...

इचलकरंजी : पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. आपल्याला न्याय देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. निश्चितपणे शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी धीर सोडू नये. संकटाशी मुकाबला करण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी नगरपालिकेच्या सभागृहातील बैठकीत दिला.

महापुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पाटील शनिवारी इचलकरंजीच्या दौऱ्यावर होते. दुपारी एक वाजता नदिवेस नाका परिसरातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथील छावणीतील पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काही महिलांना पुनर्वसनासंबंधी विचारले असता, आमचे योग्यरित्या पुनर्वसन होणार असेल तर आम्ही तयार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पालिकेतील बैठकीत, पुराचे पंचनामा करण्यासाठी आलेल्या अभिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कोणीही दबाव आणू नये. पूर्णपणे पारदर्शक काम केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तुम्ही काहीही काळजी करू नका, शासन जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करेल. यंदाच्या महापुरामुळे शहराचे मोठे नुकसान झाले आहे. काही तत्काळ व काही दीर्घकाळ उपाययोजना करण्याची गरज असून पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या अनेक वर्षांपासून नदीतील वाळू उपसा बंद असून खोली कमी झाली आहे. नदी क्षेत्रातील अतिक्रमण महापुरास कारणीभूत असल्याचे खासदार धैर्यशील माने म्हणाले. महापुरामुळे आवाडे सबस्टेशन बंद ठेवावे लागत असल्याने सबस्टेशनची पॉवर ट्रान्सफॉर्मरसह उंची वाढवावी. पूरग्रस्त भागातील विद्युत मीटर महावितरणने मोफत बदलून द्यावेत. १८ कोटी ३४ लाखाची सुवर्णजयंती नगरोस्थान योजना मार्गी लावावी, आदी मागण्या आमदार प्रकाश आवाडे यांनी केल्या. तसेच नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शहरातील पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. तर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी सहाय्यक अनुदान तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.

पालिकेने अहवाल सादर करावा

पूर परिस्थितीचे पंचनामे झाल्यानंतर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यवाही सुरू करा. जागेची पाहणी करा, तसेच पुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजनांची माहिती संकलित करून नगरपालिकेने त्याचा अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

३१ आयसीएच