शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

घंटागाडीवर ‘उठी उठी गोपाळा’

By admin | Updated: February 6, 2015 00:43 IST

मलकापूरमध्ये अभिनव उपक्रम : घोषवाक्यांतून स्वच्छतेबाबतही होणार जागृती

माणिक डोंगरे - मलकापूर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी मलकापूर नेहमीच राज्यात अग्रेसर राहिले आहे़ अशाच धर्तीवर ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ औचित्य साधून मलकापूर नगरपंचायतीने घंटागाडीवर प्रभातगीते वाजविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ असा उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था आहे़ कचऱ्यासाठी शहरातून फिरणाऱ्या घंटागाड्या म्हटलं की नेहमीचाच सायरनचा कर्कश आवाज आपल्या कानी पडतो़ १४ नोव्हेंबर पासून संपूर्ण देशभर ‘स्वच्छ भारत अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे शासनाकडून फर्मान काढण्यात आले आहे़ मात्र मलकापूर नगरपंचायतीने आपले वेगळेपण राखत कचऱ्यासाठी फिरणाऱ्या घंटागाडीवर ध्वनिक्षेपक बसवून त्यावर सकाळी ६ ते ११ या वेळेत प्रभात व भक्तिगीते वाजविण्याचा निर्णय घेतला आहे़ चार विभागांत पाच घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जाते़ पाचही गाड्यांना ध्वनिक्षेपक बसवून सकाळी ६ ते ११ या वेळेत ‘उठी उठी गोपाळा’ यासारखी प्रभातगीते तर ‘केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’ यासारखी भक्तिगीते ऐकावयास मिळणार आहेत़ ११ ते २ या वेळेत याच ध्वनिक्षेपकाद्वारे स्वच्छतेबाबतची घोषवाक्ये लावून प्रबोधन करण्यात येणार आहे़ त्यामध्ये रस्त्यावर कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर टाळा, स्वच्छता राखा आरोग्य सांभाळा अशा घोषवाक्यांचा समावेश करण्यात आला आह़े़ दुपारी दोननंतर भक्तिगीते लावून शहरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे़ पाच घंटागाड्यांसाठी विशिष्ठ प्रकारची ‘ध्वनी सर्किट’ यंत्रणा बसविण्यात आली आहे़ शहरात नवीन काहीतरी करण्याची गावकऱ्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीच अशक्य नसते़ मलकापूरच्या नागरिकांना नवीन संकल्पना आत्मसात करण्याची आवड आहे़ त्यामुळे या ठिकाणी धाडसाने नवीन उपक्रम हाती घेतले जातात़ हा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आदर्श आहे़ - राजेंद्र तेली, मुख्याधिकारी घंटागाडी म्हंटलं की तोच सायरनचा आवाज़ सायरन वाजला की आली घंटागाडी असा ग्रह व्हायचा, मात्र अनेक वेळा रूग्णवाहिका, व्हीआयपी गाड्या व अग्निशामकचा सायरन वाजला तरी आम्ही कचरा घेऊन बाहेर यायचे, मात्र आता भक्तिगीतांचा आवाज हा नक्कीच शहरातील वातावरण प्रसन्न ठेवेल़ - अनिता यादव, गृहिणी पूर्वी ग्रामीण भागात मंदिरातून सकाळी प्रभातगीते लावून गावातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न होत होता़ याच धर्तीवर शहरातील नागरिकांचे वातावरण मंगलमय ठेवण्यासाठी व नागरिकांच्या कानावर चांगले सूर पडण्यासाठी घंटागाडीतून भक्तिगीते व प्रभातगीते वाजवावीत ही संकल्पना सुचली. - मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष, मलकापूर प्रत्येक गुरूवारी कोरडा दिवस स्वच्छ व सुंदर मलकापूर अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ डेंग्यूसारख्या साथीचे रोग टाळण्यासाठी प्रत्येक गुरूवार हा कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे़ यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची चार पथकात विभागणी करण्यात आली आहे़ ती पथके आपापल्या विभागात घरोघरी जाऊन साठवणुकीच्या पाण्याची विल्हेवाट लावून प्रबोधन करणार आहेत़