शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

युती तुटल्याने आघाडीला ‘अच्छे दिन’

By admin | Updated: January 31, 2017 00:04 IST

शिरोळ तालुक्यात राजकीय समीकरणे बदलणार : जि. प., पं. स. निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

संदीप बावचे ल्ल जयसिंगपूरशिवसेना-भाजप युती तुटल्याने शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे सध्या तरी बदलली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. युतीकडून इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक धर्तीवर काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप पक्षाच्या स्वतंत्र मुलाखती झाल्या, तर ‘स्वाभिमानी’ने एकला चलोरे अशी भूमिका घेत प्रचार मोहीम राबविली. त्यामध्ये मोठ्या उत्साहाने निवडणुकीला सामोरे जाण्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले होते. स्वबळाचा नारा या पक्षांनी सुरुवातीला घेतला असला तरी सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुहेरी चाल करत काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपबरोबर बैठका घेतल्या. जागा वाटपावरून स्वाभिमानी तळ्यात-मळ्यात असली तरी भाजपसोबतच तालुक्यात त्यांचा सूर जमणार असे संकेत आहेत. शिरोळ तालुक्यात बहुजन विकास आघाडीतील मातब्बर नेते भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसेनेतील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण होते. हे दोन्ही पक्ष जि. प. व पं. स. निवडणुकीत एकत्र लढतील असे चित्र असताना शिवसेनेने वरूनच युती न करण्याचे जाहीर केल्याने आता शिवसेना व भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. भाजप व सेनेकडून जागा पदरात पाडून घेण्यासाठी व उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अजूनही युती होईल या अपेक्षेत काही कार्यकर्ते आहेत. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये उमेदवारांचा हिरमोड झाला असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोन्ही पक्षांची आघाडी झाली व आपल्याला उमेदवारी मिळाली तर सदस्य होण्याची संधी आहे या आनंदात कार्यकर्ते आहेत.शिवसेना कुणासोबतविधानसभेवेळी उल्हास पाटील यांना आमदार करण्यात बहुजन विकास आघाडीतील नेत्यांचा प्रमुख वाटा होता. याच बहुजन आघाडीतील नेते आता भाजपात गेले आहेत. सुरुवातीला भाजप-शिवसेना युती करून लढण्याचे संकेत होते. मात्र, ही युती मुंबईतून तुटल्यामुळे आमदार उल्हास पाटील यांना पक्षाचा आदेश पाळावा लागणार आहे. त्यांची भूमिका या निवडणुकीत काय असणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.