शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पतंगबाजीत देशी दोऱ्याला चांगले दिवस

By admin | Updated: January 14, 2015 00:44 IST

नॉयलॉन दोऱ्याला बंदी : पर्यावरण, पक्षीसाठी धोकादायक ठरत होते परदेशी दोरे

कोल्हापूर : पतंग उडविताना नॉयलॉनच्या दोऱ्याने पर्यावरणास होणाऱ्या हानीमुळे मांजा दोऱ्याच्या वापरावर नागपूर पोलिसांनी घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. त्यामुळे आता देशी (सुती) दोऱ्याला चांगले दिवस आले आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान आपल्याकडे पतंग उडविण्याचा हंगाम असतो. मकर संक्रांतीच्या काळात पतंगबाजीसाठी दोऱ्याला मोठी मागणी असते. पूर्वीपासून देशी (सुती) दोऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासून नॉयलॉन, चायना दोरा बाजारात आल्याने त्यांना मागणी वाढली आहे. नॉयलॉनचा दोरा सहजासहजी तुटत नसल्याने तसेच दोन-चार वर्षे टिकत असल्याने अनेकांची याला मागणी होती. परिणामी देशी दोऱ्याची मागणी घटली होती. दुकानदाराने जरी देशी दोरा विक्रीसाठी ठेवला तरी ग्राहकांची मागणी सर्वांत जास्त नॉयलॉन दोऱ्यांना होऊ लागली होती. यामुळे दुकानदारांना हा दोरा विक्रीसाठी ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. नॉयलॉन दोरा लवकर तुटत नव्हता, तसेच एखाद्या झाडावर तो अडकला की प्राणी, पक्ष्यांना त्याची मोठी इजा होत होती. तसेच मुलांच्या हाताला व गळ््याला इजा होत होती. हा दोरा खराब होत नसल्याने पर्यावरणास तो हानीकारक होता. त्या तुलनेत देशी दोरा अनेक अर्थांनी फायदेशीर ठरतो.कोल्हापुरात देशी दोरा कागल, इचलकरंजी, वारणा या स्थानिक बाजारपेठेतून विक्रीस येतो. प्रामुख्याने गुजरात, अहमदाबाद व जयपूर येथे तयार होऊन संपूर्ण भारतात विक्रीसाठी जातो, तर नॉयलॉनचा दोरा प्रामुख्याने मुंबई येथून येतो. दोन्ही दोऱ्यांचे दर साधारणपणे १०० रुपये ते ५०० रुपयांपर्यंत आहेत. नॉयलॉन दोऱ्यावरील बंदीचा निर्णय योग्य आहे. यामुळे अनेक पक्ष्यांसह माणसांना इजा होत होती. नॉयलॉन दोरा जास्त काळ टिकत असल्याने ग्राहकांची याला मागणी असल्याने आम्ही तो विक्रीसाठी ठेवत होतो. मात्र, या निर्णयामुळे आता देशी दोऱ्यांना मागणी वाढणार आहे. -इम्रान तांबोळी, पतंग विक्रेतेनॉयलॉन दोरा लवकर खराब होत नाही. निसर्गात त्याचे लवकर विघटन होत नसल्याने तो पक्ष्यांच्या पंखांना व पायाला लागून त्यांना इजा होते. या प्रकारामुळे काही पक्ष्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे.- प्रा. अभिजित कदम,पर्यावरण शिक्षक.