शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

गृह खरेदीसह व्यावसायिकांनाही ‘अच्छे दिन’ : शांतीलाल कटारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 18:05 IST

गतकाळात बांधकाम व्यवसायावर मंदीचे ढग आले होते; मात्र सरकारच्या पूरक धोरणांच्या परिणामामुळे बांधकाम क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दहा वर्षांतील हा बांधकाम व्यवसायाचा सर्वोत्तम काळ आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र क्रिडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरेरा नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवरवित्तीय संस्थां, बँकांवरही अंकुशडिसेंबर महिन्यात क्रिडाईचा महिला कक्ष कोल्हापूरमध्येही

 कोल्हापूर : गतकाळात बांधकाम व्यवसायावर मंदीचे ढग आले होते; मात्र सरकारच्या पूरक धोरणांच्या परिणामामुळे बांधकाम क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दहा वर्षांतील हा बांधकाम व्यवसायाचा सर्वोत्तम काळ आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र क्रिडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कटारिया हे क्रिडाई महाराष्ट्रच्या महासभेला उपस्थितीत राहण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कटारिया म्हणाले, सरकारने गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे फायदा झाला आहे. त्यामध्ये नोटाबंदी, बेनामी अ‍ॅक्ट, रेरा अ‍ॅक्ट, जीएसटी करप्रणाली, आदींचा समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची धोरणांना प्राधान्य दिले आहे. त्याचा फायदाही बांधकाम व्यवसायाला झाला आहे. दसरा दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. त्यामध्ये स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणही मोठे असते. सध्या गृहकर्जाचे व्याजदर कमी झाले आहेत, त्यामुळे स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढण्याची आशा आहे.

सर्वसामान्य ग्राहक जर पहिल्यांदा घर खरेदी करीत असेल तर केंद्र सरकारतर्फे त्याला जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपयांची सबसिडी देण्यात येते त्याचाही फायदा ग्राहकांना होत आहे. त्यामुळे येत्या काळात गृह खरेदीसाठी उत्तम काळ आहे. यात ६ ते १२ लाखांपर्यंत उत्पन्न असणाºयांना २ लाख ५० हजार, तर १२ ते १८ लाख उत्पन्न असणाºया ग्राहकांना २ लाख ३० हजार रुपये सबसिडी केंद्रातर्फे जाहीर केली आहे.

क्रिडाई महाराष्ट्र आणि ग्राहक पंचायतीतर्फे तक्रार निवारण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे तक्रार निवारण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या निवारण केंद्रात ३० ते ४५ दिवसांत तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. राज्य शासन महसूलवाढीसाठी रेडीरेकनर दरात वाढ करते. हा महसूल वाढीचा सोपा मार्ग आहे. ही वाढ करताना ढोबळमानाने केली जाते. हा दर सुक्ष्म पद्धतीने काढणे आवश्यक आहे. ढोबळ पद्धतीने दर काढल्याने चुकीचे दर काढले जातात. त्यामुळे अनेकांवर अन्याय होतो.

महिलांना सक्षम करावयाचे असल्यास येत्या अर्थसंकल्पात महिलांना अग्रस्थान द्यावे, अशी मागणी क्रिडाईतर्फे करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्क कमी करणे आवश्यक आहे. महिलांना प्राधान्य देण्यासाठी क्रिडाईतर्फे हे पाऊल उचलले जात आहे. राज्यातील ४७ शहरांपैकी सहा शहरांत क्रिडाईचा महिला कक्ष उभारण्यात आला आहे, तर येत्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूरमध्येही हा कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

राज्य शासन ‘लँड टायटलिंग’ करणारे पहिले राज्य ठरणार आहे. यापूर्वी अन्य संस्था, वकील लँड टायटलिंग करून देत होते. यात फसवणुकीची शक्यता अधिक होती. येथून पुढे मात्र राज्य शासनाने थेट आपल्याकडे लँड टायटलिंगचे काम हाती घेतल्याने सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनाही फायदा होईल.

पत्रकार परिषदेला क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सेक्रेटरी के. पी. खोत, महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू परीख, आदी उपस्थित होते.

रेरा नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर

देशभरामध्ये रेराच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रातून १३,७०० बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. त्यात प्रत्यक्षात १३ हजार २०० लोकांनी नोंदणी पूर्ण केली आहे, तर ५०० जणांची प्रक्रिया सुरूआहे. महाराष्ट्रातून सर्व नोंदणी आॅनलाईन करण्यात आली आहे. त्यासाठी क्रिडाईचा मोठा वाटा आहे. क्रिडाईने ४५ शहरात नोंदणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे राज्यातील रेराच्या नोंदणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यासह ग्राहकांनी रेरा नोंदणी केलेलीच घरे खरेदी करावीत, असे आवाहन शांतीलाल कटारिया यांनी केले.

बँकांवरही अंकुशसर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न येत्या काळात पूर्ण होत आहे. जर कोणती बँक कागदपत्रांची पुर्तता करुनही सर्वसामान्यांना कर्ज देण्यास सहजासहजी तयार होत नाही. त्या बँकांचीही क्रिडाई पुढाकार घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करेल. अशा पद्धतीने तीन तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे बँका, वित्तीय संस्थांनीही पंतप्रधानाच्या परवडणाºया घरांना कर्ज दिले आहे, असेही कटारिया यांनी सांगितले.