शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘पीएच.डी.’ प्रवेशात गोलमाल

By admin | Updated: August 29, 2015 00:07 IST

अभाविप’चा आरोप : पात्र १६६ जणांवर गदा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्रशासन, अधिकार मंडळांतील काही मान्यवर, अधिकारी यांच्या हस्तक्षेपामुळे सन २०१४-१५ मध्ये पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा देऊन पात्र ठरलेल्या १६६ विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागले आहे. काही ठरावीक जणांचे हित जोपासण्यासाठी विद्यापीठाने संबंधित जागा लपविल्याचा आरोप विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अमित कुलकर्णी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) जिल्हाप्रमुख प्रा. अमित वैद्य यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ‘अभाविप’च्यावतीने याचिका दाखल केल्याचे प्रा. वैद्य यांनी सांगितले.अधिसभा सदस्य कुलकर्णी म्हणाले, सन २०१४-१५ मध्ये पीएच.डी.साठी ४०७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. यातील २०१७ जण प्रवेशासाठी पात्र ठरले. या तुलनेत ५५२ जागा मार्गदर्शकांकडे उपलब्ध होत्या. यातील ३८६ जणांना प्रवेश देण्यात आले. काही तांत्रिक कारण पुढे करून उर्वरित १६६ जणांना प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या काही निर्देशांचे उल्लंघन विद्यापीठातील तत्कालीन निर्णय अधिकाऱ्यांनी करून पीएच.डी.च्या संबंधित जागा लपविल्या आहेत. त्याला अधिकार मंडळांनीदेखील बळ दिले. विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी अभाविपने कायदेशीर व रस्त्यावर उतरून लढा देण्याचे ठरविले आहे.जिल्हाप्रमुख प्रा. वैद्य म्हणाले, विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि शिवाजी विद्यापीठाविरोधात शुक्रवारी याचिका दाखल केली आहे. विद्यार्थी हित आणि विद्यापीठाचा नावलौकिक लक्षात घेता विद्यापीठाने न्यायालयाच्या निर्णयापूर्वी सकारात्मक आणि विद्यार्थी हिताची भूमिका घ्यावी. संबंधित १६६ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवून उर्वरित जागांसाठी २०१५-१६ ची प्रवेश प्रक्रिया राबवावी. पत्रकार परिषदेस प्रा. शंकरराव कुलकर्णी, श्रीनिवास सूर्यवंशी, सुमित जोंधळे, राज ठाणेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘अभाविप’च्या इतर मागण्या...अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका त्वरित द्यावी.नियमित शुल्कासह विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र द्यावे.मार्गदर्शकाने मागितलेली व युजीसीच्या नियमात बसणारी एकही जागा विद्यापीठाने अधिकार मंडळाच्या हस्तक्षेपामुळे कमी करू नये.अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाशी संलग्नित नसलेल्या एम.सी.ए., एम.एस्सी. अथवा अन्य अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय मागे घ्यावा.