शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या वैभवाला सुवर्णपालखीचे कोंदण

By admin | Updated: May 1, 2017 01:05 IST

सोन्याच्या कारागिरीचा अप्रतिम नमुना : चारही बाजूंनी कोल्हापुरातील प्रमुख देवतांच्या प्रतिमा, विविध रंंगांच्या खड्यांची कलाकुसर

इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूरआदिशक्ती, शिवशक्तीचे स्थान, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख पीठ, सतीच्या दिव्य नेत्रांचे तेज आणि विविध राजवटींनी तिच्या चरणी अर्पण केलेले श्रद्धास्थान म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर. दोन हजार वर्षांपूर्वीचा धार्मिक इतिहास लाभलेल्या या देवीच्या राज वैभवाला, परंपरांना आता सुवर्णपालखीचे कोंदण लाभले आहे. ही सुवर्णपालखी आज, सोमवारी अंबाबाईला अर्पण करण्यात येणार आहे. राक्षसांचा संहार करून करवीर क्षेत्राचे रक्षण करणाऱ्या आदिशक्तीच्या या मंदिराची शिलाहार, चालुक्य, यादव अशा विविध राजवटींनी आपल्या परीने उभारणी केली. आक्रमणांच्या काळात संरक्षणासाठी म्हणून अंबाबाईची मूर्ती एका पुजाऱ्याच्या घरी ठेवण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर १७१५ साली तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या घटनेला सप्टेंबर २०१५ मध्ये तीनशे वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने देवीच्या पालखीला सुवर्णझळाळी देण्याचा संकल्प खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांनी केला. त्यासाठी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. देवीच्या खजिन्यात आदिलशाही काळापासूनचे हिरे, मोती, माणिक पाचू अशा नवरत्नांचे जडावाचे अलंकार आहेत. आजच्या काळात या अलंकारांचे मूल्य कोट्यवधींमध्ये आहे. अष्टमीच्या नगरप्रदक्षिणेचे आसन, चैत्रात निघणारा देवीचा रथही चांदीचा करण्यात आला आहे. देवीची पालखी लाकडीच होती. देवीच्या नित्य धार्मिक विधींमध्ये दर शुक्रवारी, पौर्णिमा आणि नवरात्रौत्सवात पालखी निघते. त्यामुळे या पालखीला सोन्याची करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन वर्षांपूर्वी अक्षय्यतृतीयेच्याच मुहूर्तावर करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांच्या हस्ते सुवर्ण संकलनाला प्रारंभ झाला. सुवर्णपालखी ट्रस्टने भाविकांना सोने अर्पण करण्याचे आवाहन केले आणि त्याला भरभरून प्रतिसाद देत तब्बल २७ हजार देणगीदारांनी दिलेल्या निधीतून २६ किलो २३ कॅरेट सोन्यापैकी साडेतीन किलो सोन्यात मोर्चेल आणि चवऱ्या घडविण्यात आल्या. त्या नवरात्रामध्येच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात आल्या. उर्वरित साडेबावीस किलो सोन्यामध्ये अंबाबाईच्या लाकडी पालखीला सोन्याच्या पत्र्याचा नक्षीदार मुलामा देण्यात आला. हॉलमार्किंगसुद्धा करण्यात आले आहे. शंभर रुपयेही अमूल्य कोल्हापुरात एखादे काम सुरूझाले आणि त्यास विरोध झाला नाही असे सहसा होत नाही. किंबहुना कोणतेही नवे काम आणि विरोध अशा समीकरणाचे पेटंटच कोल्हापूरच्या नावे नोंदले गेले आहे. अशा पार्श्वभूमीवर देवीच्या पालखीसही सुरुवातीला विरोध झाला होता; परंतु महाडिक यांचा निर्धार आणि भक्तांची साथ यामुळे हे काम पूर्णत्वास गेले. त्यासाठी भाविकांनी दिलेले शंभर रुपयेही अमूल्य होते.देवीच्या कार्यासाठी भाजीवाले, भेळवाले, पाणीपुरीवाले, अपंग मुले अशा सर्वसामान्य आणि कष्टकरी लोकांनीही योगदान दिले आहे. व्यवहारात अत्यंत पारदर्शकता ठेवण्यात आली आणि भाविकांचा पैसा केवळ पालखीसाठी वापरण्यात आला. अन्य नियोजन, व्यवस्थापन, सोहळा याचा खर्च ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मीनाकाम आणि खड्यांचे कोंदण संपूर्ण पालखीवर ऐश्वर्याचे प्रतीक असलेले हत्ती आणि पानाफुलांची वेलबुट्टी कोरण्यात आली आहे. पालखीच्या दोन्ही बाजूला कीर्तीमुख आहेत. चार बाजूंना मीनाकाम केलेले मोर आहेत, त्याच्यावर पांढऱ्या खड्यांचे कोंदण आहे. पालखीच्या खालील नक्षीकामावरदेखील लाल खडे लावण्यात आले आहेत. कलाकुसरीचे डिझायनिंग भरत ओसवाल यांनी केले आहे. गणेश चव्हाण, महेश चव्हाण, योगेश चव्हाण आणि अभिजित चव्हाण या बंधूंनी अत्यंत कौशल्याने पालखी साकारली आहे. त्यांना समीर पत्रा आणि भुभाई यांचे सहकार्य लाभले.