शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अंबाबाईच्या वैभवाला सुवर्णपालखीचे कोंदण

By admin | Updated: May 1, 2017 01:05 IST

सोन्याच्या कारागिरीचा अप्रतिम नमुना : चारही बाजूंनी कोल्हापुरातील प्रमुख देवतांच्या प्रतिमा, विविध रंंगांच्या खड्यांची कलाकुसर

इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूरआदिशक्ती, शिवशक्तीचे स्थान, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख पीठ, सतीच्या दिव्य नेत्रांचे तेज आणि विविध राजवटींनी तिच्या चरणी अर्पण केलेले श्रद्धास्थान म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर. दोन हजार वर्षांपूर्वीचा धार्मिक इतिहास लाभलेल्या या देवीच्या राज वैभवाला, परंपरांना आता सुवर्णपालखीचे कोंदण लाभले आहे. ही सुवर्णपालखी आज, सोमवारी अंबाबाईला अर्पण करण्यात येणार आहे. राक्षसांचा संहार करून करवीर क्षेत्राचे रक्षण करणाऱ्या आदिशक्तीच्या या मंदिराची शिलाहार, चालुक्य, यादव अशा विविध राजवटींनी आपल्या परीने उभारणी केली. आक्रमणांच्या काळात संरक्षणासाठी म्हणून अंबाबाईची मूर्ती एका पुजाऱ्याच्या घरी ठेवण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर १७१५ साली तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या घटनेला सप्टेंबर २०१५ मध्ये तीनशे वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने देवीच्या पालखीला सुवर्णझळाळी देण्याचा संकल्प खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांनी केला. त्यासाठी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. देवीच्या खजिन्यात आदिलशाही काळापासूनचे हिरे, मोती, माणिक पाचू अशा नवरत्नांचे जडावाचे अलंकार आहेत. आजच्या काळात या अलंकारांचे मूल्य कोट्यवधींमध्ये आहे. अष्टमीच्या नगरप्रदक्षिणेचे आसन, चैत्रात निघणारा देवीचा रथही चांदीचा करण्यात आला आहे. देवीची पालखी लाकडीच होती. देवीच्या नित्य धार्मिक विधींमध्ये दर शुक्रवारी, पौर्णिमा आणि नवरात्रौत्सवात पालखी निघते. त्यामुळे या पालखीला सोन्याची करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन वर्षांपूर्वी अक्षय्यतृतीयेच्याच मुहूर्तावर करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांच्या हस्ते सुवर्ण संकलनाला प्रारंभ झाला. सुवर्णपालखी ट्रस्टने भाविकांना सोने अर्पण करण्याचे आवाहन केले आणि त्याला भरभरून प्रतिसाद देत तब्बल २७ हजार देणगीदारांनी दिलेल्या निधीतून २६ किलो २३ कॅरेट सोन्यापैकी साडेतीन किलो सोन्यात मोर्चेल आणि चवऱ्या घडविण्यात आल्या. त्या नवरात्रामध्येच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात आल्या. उर्वरित साडेबावीस किलो सोन्यामध्ये अंबाबाईच्या लाकडी पालखीला सोन्याच्या पत्र्याचा नक्षीदार मुलामा देण्यात आला. हॉलमार्किंगसुद्धा करण्यात आले आहे. शंभर रुपयेही अमूल्य कोल्हापुरात एखादे काम सुरूझाले आणि त्यास विरोध झाला नाही असे सहसा होत नाही. किंबहुना कोणतेही नवे काम आणि विरोध अशा समीकरणाचे पेटंटच कोल्हापूरच्या नावे नोंदले गेले आहे. अशा पार्श्वभूमीवर देवीच्या पालखीसही सुरुवातीला विरोध झाला होता; परंतु महाडिक यांचा निर्धार आणि भक्तांची साथ यामुळे हे काम पूर्णत्वास गेले. त्यासाठी भाविकांनी दिलेले शंभर रुपयेही अमूल्य होते.देवीच्या कार्यासाठी भाजीवाले, भेळवाले, पाणीपुरीवाले, अपंग मुले अशा सर्वसामान्य आणि कष्टकरी लोकांनीही योगदान दिले आहे. व्यवहारात अत्यंत पारदर्शकता ठेवण्यात आली आणि भाविकांचा पैसा केवळ पालखीसाठी वापरण्यात आला. अन्य नियोजन, व्यवस्थापन, सोहळा याचा खर्च ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मीनाकाम आणि खड्यांचे कोंदण संपूर्ण पालखीवर ऐश्वर्याचे प्रतीक असलेले हत्ती आणि पानाफुलांची वेलबुट्टी कोरण्यात आली आहे. पालखीच्या दोन्ही बाजूला कीर्तीमुख आहेत. चार बाजूंना मीनाकाम केलेले मोर आहेत, त्याच्यावर पांढऱ्या खड्यांचे कोंदण आहे. पालखीच्या खालील नक्षीकामावरदेखील लाल खडे लावण्यात आले आहेत. कलाकुसरीचे डिझायनिंग भरत ओसवाल यांनी केले आहे. गणेश चव्हाण, महेश चव्हाण, योगेश चव्हाण आणि अभिजित चव्हाण या बंधूंनी अत्यंत कौशल्याने पालखी साकारली आहे. त्यांना समीर पत्रा आणि भुभाई यांचे सहकार्य लाभले.