शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

गोकुळचा ठरावधारक घरात, गडी शेतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:21 IST

गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी ...

गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी येत असल्याने या पूर्वीच्या निवडणुकीत कोणाच्याही खिजगणतीतही नसणारा ठरावधारक यावेळी महत्त्वाचा घटक झाला आहे. आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी ठरावधारकांनी शेतातील कामासाठी चक्क मजूर लावून आपण मात्र घरीच बसला आहे. जेणेकरून भेटायला येणाऱ्या संभाव्य उमेदवार आणि नेत्यांची गैरसोय होऊ नये. ठरावधारकांच्या भेटीगाठी घेण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू आहे. टप्प्यात येणारे सावज टिपण्यासाठी ठरावधारक नेम धरून बसला आहे.

माघारीनंतर या महाविकास आघाडीतील नाराजांना आपलेसे करण्यासाठी सत्ताधारी आघाडी सावध पवित्र्यात आहे. नेतेमंडळी बेरजेचे गणित करण्यात गुंतली आहेत.

यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकाला फारसे महत्त्व नसायचे. एकतर्फी होणारी निवडणूक ही सत्ताधारी आघाडीची मक्तेदारी झाल्यासम होती. घराणेशाही आणि सतत तीच मंडळी सत्तेत सहभागी झाल्याने सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळण्याऐवजी केवळ मतदानाची संधी मिळत होती. गोकुळमधील नोकरभरती लाख मोलाची ठरली. गरीब शेतकऱ्यांच्या दुधावर चाललेल्या संघात त्याच्या तरुण बेरोजगार तरुणाला नोकरी मिळाली नाही. ती मिळाली लाखो रुपयांची ओळख असलेल्या बापाच्या मुलाला !, अशा अनेक घटनांची खदखद मनात होती. कोणताही पर्याय नसल्याने तेही मूग गिळून गप्प बसून होते; पण गत निवडणुकीत मंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आघाडीतील उमेदवारांचा निसटता पराभव झाल्याने यावेळी ठरावधारकांची खात्री झाली की सत्ताधारी आघाडीच्या विरोधात एक भक्कम पर्याय दिसू लागला.

भुदरगड तालुक्यात ३७३ ठरावधारक आहेत. यातील काही ठरावधारकांनी संभाव्य उमेदवार आणि जिल्ह्याचे नेते मंडळी भेटण्यासाठी येत आहेत म्हणून शेतातील कामासाठी पगारी मजूर नेमून आपण घरी थांबले आहेत. येईल त्या नेत्याला आणि उमेदवाराला भेटत आहेत. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने ठरावधारकांचे आधारकार्ड घेण्याचा सल्ला तालुकास्तरीय नेत्यांना दिला, तर काही बहाद्दर ठरावधारकांनी चार-पाच रंगीत झेरॉक्स (प्रति) काढून ठेवल्या आहेत.

हे वातावरण पाहता आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदान होण्यासाठी दोन्ही आघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आघाडीमध्ये परस्पर विरोधी पक्षनेते एकत्र आल्याने "नवरा मेला तरी चालेल; पण सवत विधवा झाली पाहिजे !" या म्हणीप्रमाणे ठरावधारकांनी उचल खाल्ल्यास सगळ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.