शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

गोकुळचा ठरावधारक घरात, गडी शेतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:21 IST

गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी ...

गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी येत असल्याने या पूर्वीच्या निवडणुकीत कोणाच्याही खिजगणतीतही नसणारा ठरावधारक यावेळी महत्त्वाचा घटक झाला आहे. आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी ठरावधारकांनी शेतातील कामासाठी चक्क मजूर लावून आपण मात्र घरीच बसला आहे. जेणेकरून भेटायला येणाऱ्या संभाव्य उमेदवार आणि नेत्यांची गैरसोय होऊ नये. ठरावधारकांच्या भेटीगाठी घेण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू आहे. टप्प्यात येणारे सावज टिपण्यासाठी ठरावधारक नेम धरून बसला आहे.

माघारीनंतर या महाविकास आघाडीतील नाराजांना आपलेसे करण्यासाठी सत्ताधारी आघाडी सावध पवित्र्यात आहे. नेतेमंडळी बेरजेचे गणित करण्यात गुंतली आहेत.

यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकाला फारसे महत्त्व नसायचे. एकतर्फी होणारी निवडणूक ही सत्ताधारी आघाडीची मक्तेदारी झाल्यासम होती. घराणेशाही आणि सतत तीच मंडळी सत्तेत सहभागी झाल्याने सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळण्याऐवजी केवळ मतदानाची संधी मिळत होती. गोकुळमधील नोकरभरती लाख मोलाची ठरली. गरीब शेतकऱ्यांच्या दुधावर चाललेल्या संघात त्याच्या तरुण बेरोजगार तरुणाला नोकरी मिळाली नाही. ती मिळाली लाखो रुपयांची ओळख असलेल्या बापाच्या मुलाला !, अशा अनेक घटनांची खदखद मनात होती. कोणताही पर्याय नसल्याने तेही मूग गिळून गप्प बसून होते; पण गत निवडणुकीत मंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आघाडीतील उमेदवारांचा निसटता पराभव झाल्याने यावेळी ठरावधारकांची खात्री झाली की सत्ताधारी आघाडीच्या विरोधात एक भक्कम पर्याय दिसू लागला.

भुदरगड तालुक्यात ३७३ ठरावधारक आहेत. यातील काही ठरावधारकांनी संभाव्य उमेदवार आणि जिल्ह्याचे नेते मंडळी भेटण्यासाठी येत आहेत म्हणून शेतातील कामासाठी पगारी मजूर नेमून आपण घरी थांबले आहेत. येईल त्या नेत्याला आणि उमेदवाराला भेटत आहेत. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने ठरावधारकांचे आधारकार्ड घेण्याचा सल्ला तालुकास्तरीय नेत्यांना दिला, तर काही बहाद्दर ठरावधारकांनी चार-पाच रंगीत झेरॉक्स (प्रति) काढून ठेवल्या आहेत.

हे वातावरण पाहता आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदान होण्यासाठी दोन्ही आघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आघाडीमध्ये परस्पर विरोधी पक्षनेते एकत्र आल्याने "नवरा मेला तरी चालेल; पण सवत विधवा झाली पाहिजे !" या म्हणीप्रमाणे ठरावधारकांनी उचल खाल्ल्यास सगळ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.