शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळचा ठरावधारक घरात, गडी शेतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:21 IST

गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी ...

गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी येत असल्याने या पूर्वीच्या निवडणुकीत कोणाच्याही खिजगणतीतही नसणारा ठरावधारक यावेळी महत्त्वाचा घटक झाला आहे. आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी ठरावधारकांनी शेतातील कामासाठी चक्क मजूर लावून आपण मात्र घरीच बसला आहे. जेणेकरून भेटायला येणाऱ्या संभाव्य उमेदवार आणि नेत्यांची गैरसोय होऊ नये. ठरावधारकांच्या भेटीगाठी घेण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू आहे. टप्प्यात येणारे सावज टिपण्यासाठी ठरावधारक नेम धरून बसला आहे.

माघारीनंतर या महाविकास आघाडीतील नाराजांना आपलेसे करण्यासाठी सत्ताधारी आघाडी सावध पवित्र्यात आहे. नेतेमंडळी बेरजेचे गणित करण्यात गुंतली आहेत.

यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकाला फारसे महत्त्व नसायचे. एकतर्फी होणारी निवडणूक ही सत्ताधारी आघाडीची मक्तेदारी झाल्यासम होती. घराणेशाही आणि सतत तीच मंडळी सत्तेत सहभागी झाल्याने सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळण्याऐवजी केवळ मतदानाची संधी मिळत होती. गोकुळमधील नोकरभरती लाख मोलाची ठरली. गरीब शेतकऱ्यांच्या दुधावर चाललेल्या संघात त्याच्या तरुण बेरोजगार तरुणाला नोकरी मिळाली नाही. ती मिळाली लाखो रुपयांची ओळख असलेल्या बापाच्या मुलाला !, अशा अनेक घटनांची खदखद मनात होती. कोणताही पर्याय नसल्याने तेही मूग गिळून गप्प बसून होते; पण गत निवडणुकीत मंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आघाडीतील उमेदवारांचा निसटता पराभव झाल्याने यावेळी ठरावधारकांची खात्री झाली की सत्ताधारी आघाडीच्या विरोधात एक भक्कम पर्याय दिसू लागला.

भुदरगड तालुक्यात ३७३ ठरावधारक आहेत. यातील काही ठरावधारकांनी संभाव्य उमेदवार आणि जिल्ह्याचे नेते मंडळी भेटण्यासाठी येत आहेत म्हणून शेतातील कामासाठी पगारी मजूर नेमून आपण घरी थांबले आहेत. येईल त्या नेत्याला आणि उमेदवाराला भेटत आहेत. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने ठरावधारकांचे आधारकार्ड घेण्याचा सल्ला तालुकास्तरीय नेत्यांना दिला, तर काही बहाद्दर ठरावधारकांनी चार-पाच रंगीत झेरॉक्स (प्रति) काढून ठेवल्या आहेत.

हे वातावरण पाहता आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदान होण्यासाठी दोन्ही आघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आघाडीमध्ये परस्पर विरोधी पक्षनेते एकत्र आल्याने "नवरा मेला तरी चालेल; पण सवत विधवा झाली पाहिजे !" या म्हणीप्रमाणे ठरावधारकांनी उचल खाल्ल्यास सगळ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.