शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गोकुळचा ठरावधारक घरात, गडी शेतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:21 IST

गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी ...

गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी येत असल्याने या पूर्वीच्या निवडणुकीत कोणाच्याही खिजगणतीतही नसणारा ठरावधारक यावेळी महत्त्वाचा घटक झाला आहे. आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी ठरावधारकांनी शेतातील कामासाठी चक्क मजूर लावून आपण मात्र घरीच बसला आहे. जेणेकरून भेटायला येणाऱ्या संभाव्य उमेदवार आणि नेत्यांची गैरसोय होऊ नये. ठरावधारकांच्या भेटीगाठी घेण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू आहे. टप्प्यात येणारे सावज टिपण्यासाठी ठरावधारक नेम धरून बसला आहे.

माघारीनंतर या महाविकास आघाडीतील नाराजांना आपलेसे करण्यासाठी सत्ताधारी आघाडी सावध पवित्र्यात आहे. नेतेमंडळी बेरजेचे गणित करण्यात गुंतली आहेत.

यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकाला फारसे महत्त्व नसायचे. एकतर्फी होणारी निवडणूक ही सत्ताधारी आघाडीची मक्तेदारी झाल्यासम होती. घराणेशाही आणि सतत तीच मंडळी सत्तेत सहभागी झाल्याने सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळण्याऐवजी केवळ मतदानाची संधी मिळत होती. गोकुळमधील नोकरभरती लाख मोलाची ठरली. गरीब शेतकऱ्यांच्या दुधावर चाललेल्या संघात त्याच्या तरुण बेरोजगार तरुणाला नोकरी मिळाली नाही. ती मिळाली लाखो रुपयांची ओळख असलेल्या बापाच्या मुलाला !, अशा अनेक घटनांची खदखद मनात होती. कोणताही पर्याय नसल्याने तेही मूग गिळून गप्प बसून होते; पण गत निवडणुकीत मंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आघाडीतील उमेदवारांचा निसटता पराभव झाल्याने यावेळी ठरावधारकांची खात्री झाली की सत्ताधारी आघाडीच्या विरोधात एक भक्कम पर्याय दिसू लागला.

भुदरगड तालुक्यात ३७३ ठरावधारक आहेत. यातील काही ठरावधारकांनी संभाव्य उमेदवार आणि जिल्ह्याचे नेते मंडळी भेटण्यासाठी येत आहेत म्हणून शेतातील कामासाठी पगारी मजूर नेमून आपण घरी थांबले आहेत. येईल त्या नेत्याला आणि उमेदवाराला भेटत आहेत. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने ठरावधारकांचे आधारकार्ड घेण्याचा सल्ला तालुकास्तरीय नेत्यांना दिला, तर काही बहाद्दर ठरावधारकांनी चार-पाच रंगीत झेरॉक्स (प्रति) काढून ठेवल्या आहेत.

हे वातावरण पाहता आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदान होण्यासाठी दोन्ही आघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आघाडीमध्ये परस्पर विरोधी पक्षनेते एकत्र आल्याने "नवरा मेला तरी चालेल; पण सवत विधवा झाली पाहिजे !" या म्हणीप्रमाणे ठरावधारकांनी उचल खाल्ल्यास सगळ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.