शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ची बल्क कुलर योजना फायद्याची

By admin | Updated: June 16, 2016 01:00 IST

प्रबोधनाची गरज : उत्पादकांना २० पैसे प्रतिलिटर जादा दर; गुणवत्ता वाढीबरोबर दूध जप्त होण्याच्या प्रकाराला बसणार आळा

प्रकाश पाटील -- कोपार्डे --मानांकनाप्रमाणे दुधाची गुणवत्ता व दर्जा राखल्याशिवाय स्पर्धेच्या काळात दूध विक्री व्यवस्था टिकणार नाही, हे लक्षात आल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख गोकुळ दूध संघाने बल्क कुलर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा दूध उत्पादकांना थेट आर्थिक फायदा देण्याचा हेतू असल्याचा संघ दावा करीत असताना याला गावोगावच्या दूध संस्था मात्र विरोध का करीत आहेत? याचे गौडबंगाल समजण्यापलीकडचे आहे.दूध व्यवसाय हा ग्रामीण भागाशी निगडित असणारा व्यवसाय आहे. ज्या गावांमध्ये १००० लिटरपासून पाच हजार लिटरपर्यंत दूध संकलन करण्याची क्षमता आहे, अशा गावांना ‘गोकुळ’ने प्राधान्य देत राष्ट्रीय दुग्धशाळा महामंडळ (एनडीडीबी) यांच्या सहकार्याने दूध संकलनाचे केंद्रीकरण करून त्याचा थेट फायदा दूध उत्पादकांना व्हावा, हा हेतू समोर ठेवला आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या संस्थांनी दूध उत्पादकांना प्रतिलिटर २० पैसे जादा दर देण्याचे धोरणही ‘गोकुळ’ने जाहीर करीत ते अमलात आणले आहे. यापुढे जाऊन बल्क कुलरमुळे गावातच दुधाची साठवणूक करून गुणवत्ता व दर्जा टिकविण्याबरोबर वजन व त्याची नोंदही अद्ययावत यंत्रणेमार्फत करण्याची सोय असल्याने हेराफेरीला थारा नाही. लगेच सर्व नोंदी त्वरित मुख्यालयाकडे ब्रॉडबँडने पाठविल्या जात असल्याने दूध बिलांची बिनचूक देवघेव होईल. तसेच दूध घटीच्या असणाऱ्या दूध उत्पादकांच्या तक्रारी कमी होणार आहेत. गाय व म्हशीचे दूध काढल्यानंतर त्याचे तापमान ३२ ते ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. ते दूध संस्थेतून संघापर्यंत पोहोचविण्यास विलंब झाल्यास नासण्याचे प्रमाण असते. मात्र, बल्क कुलरमुळे हे दूध चार डिग्री सेल्सिअसपर्यंत नियंत्रित ठेवण्यात येऊ शकते. त्यामुळे नासके दूध म्हणून संस्थांचे जप्त होणारे दुधाचे प्रमाण शून्यावर येणार आहे.बल्क कुलरमुळे गावागावांमध्ये सकाळी, सायंकाळी एकत्रित संकलित होणारे दूध दोन ते तीन दिवसांतून एकदा इन्सुलेटेड टँकरमधून ‘गोकुळ’ संघापर्यंत पोहोच करता येऊ शकते. त्यामुळे वाहतूक खर्चाची बचत, कॅनमधून वाहतूक करताना होणारी दुधामधील घट कमी होणार असून, मजुरीवरील खर्चात बचत होण्याबरोबर दुधाचा दर्जा मानांकनाप्रमाणे टिकविता येणार आहे. दुधातील बल्क कुलरमुळे बॅक्टेरिया कमी झाल्याने दुधाची नैसर्गिक प्रत, चव व गोडवा कायम राहणार आहे. उत्तम प्रतीचे व जंतूविरहित दूध व इतर पदार्थांमुळे आंतरराष्ट्रीय मानांकन राखल्याने परदेशी बाजारपेठा काबीज करण्यास स्पर्धकांना तोंड देता येणार आहे. दुधातील भेसळ हा मुख्य धोका थांबून दुधाची तूटही रोखता येणार आहे.मात्र, याला गावागावांतील दूध संस्थांकडून विरोध होत असून, हाताच्या बोटावर मोजण्याइतपत गावांतच बल्क कुलर योजना सुरू आहे. या गावांतही सर्व संस्थांनी सहभाग नोंदविला नसून, बल्क कुलर म्हणजे दूध संस्थांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया काही संस्थांच्या संचालकांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केल्या.यात या संस्थांनी दूध संकलनात मिळणारी वाढ मिळणार नसल्याने संस्थेच्या आर्थिक ताळेबंदावर परिणाम होऊन संस्था बंद पडण्याची शक्यता वर्तविली. ज्या संस्थेत हा बल्क कुलर प्रकल्प राबविला जात आहे, अशा गावांतील एकाच संस्थेचा फायदा होणार आहे, असा संस्थांचा दावा आहे. याचबरोबर प्रत्येक संस्थेतील सेवकांच्या रोजगारावर कुऱ्हाड पडणार असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे भविष्यात संस्था नामशेष होण्याची भीतीही संस्थाचालकांनी बोलून दाखविली.वाहतुकीतही बचत :बल्क कुलरमुळे गावातच दुधाची साठवणूक करून गुणवत्ता व दर्जा टिकविण्याबरोबर वजन व त्याची नोंदही अद्ययावत यंत्रणेमार्फत करण्याची सोयदूध बिलांची बिनचूक देवघेवकॅनमधून वाहतूक करताना होणारी दुधामधील घट कमी होणार